Category: महाराष्ट्र

Maharashtra News

MG स्पोर्ट्स क्लब पुणे टुर्नामेंटमध्ये उपविजेते

पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता शिवम ठोम्बरे, ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच्या अत्युत्तम ऑलराऊंड योगदानामुळे तो डोक्यावर ठरला. गोलंदाज म्हणून, शिवमच्या गोलंदाजीचे स्पेल्स महत्त्वपूर्ण क्षणांत निर्णायक ठरले, कारण त्याने सातत्याने ब्रेकथ्रू दिले जेव्हा टीमला त्यांची गरज होती. मैदानावर देखील त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय होते, एक शानदार कॅच घेतल्याने एका सामन्याचा कल बदलला आणि टीमला मोठा गती मिळवून दिला. शिवमचे दबावाच्या परिस्थितीत बॉल आणि क्षेत्ररक्षणात यशस्वी योगदान MGSC च्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. त्याच्या फलंदाजीतील योगदान देखील महत्त्वाचे होते, कारण त्याने टुर्नामेंटच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोलाचे धावा दिल्या. त्याच्या सर्वांगीण कौशल्यामुळे आणि खेळाकडे त्याच्या परिपक्व दृष्टिकोनामुळे तो MG स्पोर्ट्स क्लबसाठी एक अत्यंत प्रभावशाली खेळाडू ठरला आणि त्याला योग्य प्रमाणात मान्यता मिळाली. रौनित सिंग हा दुसरा प्रमुख खेळाडू होता, जो टीमचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उभा राहिला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि तणावाच्या परिस्थितीत सामन्याचा भाग्य बदलण्याची क्षमता त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आली. रौनितने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या, ज्यामुळे MGSC ला फायनलपर्यंत पोहोचायला मदत झाली, आणि त्याची फलंदाजी आणि शांतता त्याला टीमच्या फलंदाजीच्या रचनेतील कणा बनवून ठेवली. माझ खान देखील MGSC च्या फायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. त्याची स्थिर फलंदाजी, विशेषतः महत्त्वपूर्ण क्षणांत, टीमला आवश्यक ती आधार देत होती, ज्यामुळे टीम महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गावर राहिली. टीमचे गोलंदाज, ज्यात रामलखन राजभर आणि निशांत पिल्लाई यांचा समावेश आहे, हे देखील महत्त्वपूर्ण होते, कारण त्यांनी महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आणि विरोधकावर दबाव ठेवला. फायनलमध्ये, अनेक खेळाडूंनी, ज्यात विगनेश गवडे, शिवम शर्मा, अर्णव सापकाल, धैर्य अश्तेकर, वेदांत राजिवले, अनिकेत धावले, भाविक सोनी आणि अहमद खान यांचा समावेश आहे, मोठे योगदान दिले. MG स्पोर्ट्स क्लबचा फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्या सामूहिक कौशल्य आणि निर्धाराचे प्रतीक होता, आणि त्यांनी टुर्नामेंट गर्वाने आणि भविष्याच्या आशा भरण्यासह संपवला.

नवी मुंबईतील उत्तम माने यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १ सुवर्णपदक, ३ रौप्यपदक

अनिल ठाणेकर नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये  मीनाताई ठाकरे स्टेडियमवर  ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा  संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत,  नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ  नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ६५+ वर्षावरील गटात सहभागी होऊन १ सुवर्ण पदक व ३ रौप्यपदक संपादन केली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ८३० खेळाडू सहभागी झाले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. उत्तम माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असून ते नवी मुंबईत सानपाडा येथे स्थायिक झाले आहेत.  उत्तम माने यांचे सद्या ७० वय  असून तरुणांना लाजवेल अशी त्यांनी कामगिरी केली आहे. उत्तम माने यांनी हातोडा फेकमध्ये  सुवर्ण पदक जिंकले आहे तर भालाफेक मध्ये रौप्यपदक आणि थाळी फेक मध्ये रौप्यपदक तसेच ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ही रौप्यपदक जिंकले आहे. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते पारितोषिक वितरण व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष

 ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली हरिभाऊ लाखे नाशिक : नियोजनासाठी दरवेळी आव्हानात्मक ठरणारा नाशिकचा सिंहस्थ अवघ्या २२ महिन्यांवर आला असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दर मंगळवारी नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. एव्हाना सिंहस्थ नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होऊन तेथे पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाइल सरकारदरबारी पडून असल्याने नियोजनाला गती येण्यास अवधी लागणार आहे. नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे. सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.

शरद पवारपक्षाच्या गटनेतेपदी आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार…

हिंदुनो, तीन मुले जन्माला घाला !

सरसंघचालक भागवातांचे आवाहन नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील एका…

संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !

मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…

नाशिककरांना हुडहुडी!

 शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली अहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. शहरात गुरुवारी किमान १०.५, तर कमाल २७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान १०.६, तर कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि मंगळवारी किमान १०.८, तर कमाल २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. राज्यात नाशिकच्या खालोखाल अहिल्यानगर आणि पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी अहिल्यानगरमध्ये ९.४, तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडचा पारा घसरला निफाड : गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडीचा पारा सातत्याने घसरत असून, गुरुवारी कुंदेवाडी येथील निफाड गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीने सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुवारी मात्र चांगलीच वाढली होती. निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होईल. मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ००००

समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

हरिभाऊ लाखे नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.

प्रियंकां गांधीनी संविधान हाती घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली

नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची…

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

गळणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाणी वितरणाशी संबंधित विविध कामे शनिवारी करण्यात येणार असून त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणी पुरवठा वितरण विभाग यांच्यातर्फे विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि सहायक केंद्रांवर प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे यासह इतर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रात उच्चदाब खांब स्थलांतरीत करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात प्रवाह मीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या शिवाय सहायक जलशुध्दीकरण केंद्रात याच स्वरुपाची कामे केली जातील. सातपूर विभागातील मुख्य वाहिनीवर व्हॉल्व्ह आणि पाणी मापक मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाका येथील वाहिनीची गळती थांबविणे, प्रभाग १० मधील अशोकनगर येथे गळती लागलेल्या ९०० मिलिमीटर वाहिनीची दुरुस्ती, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील जलवाहिनीची दुरुस्ती, पाथर्डी फाटा येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, कशिश हॉटेलजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची गळती बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर कुंभाच्या वाहिनीवरील गळती बंद करणे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविणे व तत्सम कामे केली जातील. नाशिकरोड विभागातील उपनगर येथील संजय गांधी नगर वाहिनीतील गळती आणि पवारवाडी जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीची जेलरोड सिग्नलजवळ गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन व्यापक स्वरुपातील कामांमुळे शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाहूी. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. शनिवारी दिवसभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 000