Category: महाराष्ट्र

Maharashtra News

दहा माओवाद्यांना छत्तीसगडमध्ये खात्मा

छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा  माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले अभिवादन

रत्नागिरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उप जिल्हाधिकारी मारुती बोरकर, रोहयो उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनीही अभिवादन केले.

‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न,बाकी सगळे पॅटर्न भंगारात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली विरोधकांवर तोफ लातूर : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत अशी तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली. महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूर येथील गरुडा चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्धवस्त करून टाकला. महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी सेट केला आहे. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील. मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. ते खरे असून त्याचा आपण दहा वर्षे अनुभव घेतला आहे. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे व्हिजन आहे. त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे, असा टोला लगावला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी टू जी स्कॅम, स्पेस घोटाळा, कोळसा घोटाळा, नॅशनल हॅराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे काम सुरु आहे. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधक संविधान धोक्यात आल्याचे बोलत आहेत. पण पंतप्रधानांनी संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगितले आहे. जय श्रीराम म्हटल्यावर रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा. तसाच राग आता विरोधकांना येत आहे. तेच लोक आता मुह मे राम बगल मे चुरी घेऊन फिरत आहेत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो राम का नहीं वो किसी काम नही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान आपल्या देशाने ३० वर्षे अस्थिर सरकारे बघितली आहेत. त्यांच्या काळात झालेली देशाची अधोगती आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार बघितला आहे. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत या देशाने स्थिर सरकार बघितले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात आहे. त्यांचा उद्देश जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात अतृप्त आत्मा ते गुजरातमध्ये स्रीयांच्या अब्रुचे लुटेरे

निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शा‍ब्दिक वार पुणे :  महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना…

अजित पवार धमकी बहाद्दर- संजय राऊत

नाशिक : अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली…

सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार- जरांगे

आंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या आग्रहासाठी सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार आहे यासाठी येत्या १ मेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे, असे…

‘घोषणा करतात ४०० पारची, चर्चा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची’

चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल  सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात ४०० पारचा नारा देतात आणि संपुर्ण भाषणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करतात अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर केली.…

‘दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याचा गप्पा सांगू नका’

थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार छायाचित्र ओळ-जरंडी येथील महायुतीच्या सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार दुसऱ्या छायाचित्रात उमेदवार रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना तिसऱ्या छायाचित्रात जनसमुदाय…. सोयगाव : अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे … जालना लोकसभाचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे— महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतारा फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारनात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपा च्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता… यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवने,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदनताई पाटील,धृपाताबाई सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा बाई काळे यांनी आभार मानले.

दादांना ‘सोसायटीत’ जायची वेळ आली- पवार

कोल्हापूर : आताचे अजितदादा हे भाजपाचे दादा आहेत. आमच्या सोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार सभा घ्यायचे, पण आता कुठं बसले आहेत, तर बारामतीत सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत?. अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांवर…

मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही?- पवार

नगर : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत.  सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची…