Category: मुंबई

Mumbai news

ऐका हो ऐका…मुंबई-गोवा हायवे ३ महिन्यात होणार

मुंबई : कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा मार्ग आता पुढील ३ महिन्यात पुर्ण करणार असल्याचे चॅलेंज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारले आहे.  माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६…

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

मुंबई : (अशोक गायकवाड )—राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, शेलेश नवाल यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली. ‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

गुड मॉर्निंग स्पोर्टस् १४ वर्षाखालील गटात चषकाचे मानकरी ठरले.

स्पर्श फाउंडेशन आयोजित स्वर्गीय सामानाधिकारी यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा – २०२६. मुंबई :- भैरवनाथ मंडळाने स्पर्श फाउंडेशनने आयोजित केलेल्या तृतीय श्रेणी पुरुषात विजेतेपद पटकाविले. १४ वर्षा खालील गटात हा मान…

संजीवन तज्ञांची मुंबईत परिषद  

रमेश औताडे मुंबई : प्रत्येक हृदय शस्त्रक्रियेमागे एक डॉक्टर टीम असते आणि त्या टीमच्या केंद्रस्थानी परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) असतो, जो पेशंटचे  हृदय  चालू आहे की नाही याची खात्री करत असतो. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर टीम निघून जाते. मात्र परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) पेशंट शुद्धीवर येईपर्यंत असतो. त्यांची सध्या देशात संख्या फार कमी आहे. ती कशी वाढेल यासाठी इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजीची २६ वी वार्षिक परिषद मुंबईत सुरू झाली आहे. इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजी ची २६ वी वार्षिक राष्ट्रीय परिषद आघाडीच्या कार्डियाक केअर तज्ञ, परफ्यूजनिस्ट, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू झाली. परिषदेचे नेतृत्व आय एस इ सी टी चे अध्यक्ष राजेंद्र कोकणे  लोकनाथ तिवारी, जगन्नाथ काळुगडे, विकास माळी, रवींद्र सावर्डेकर, शशिकांत मेमाणे, योगेश लुडबे, रफिक शेख, आयसेक्टॉनचे सचिव रवींद्र सावर्डेकर यांच्यासह वरिष्ठ कार्यकारी सदस्य करत आहेत.

 भरत कोळी व नीलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत

पीएम बाथ कॅरम स्पर्धा मुंबई: जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी. एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब, चर्नी रोड येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…

 कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन कॅनेडियन शिष्टमंडळासाठी स्वागत कार्यक्रम मुंबई : (अशोक गायकवाड )—जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ‘ लेटर ऑफ इन्टेंट’ देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी. कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ पी अनबलगन यांनी राज्य शासनाच्या उद्योग धरण आणि ‘ इज ऑफ डूइंग बिझनेस’ विषयी सादरीकरण केले. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांविषयी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एज्युसिटी, मेडिसिटी एरोसिटी, खारघर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र याविषयी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी नवी मुंबई येथे विदेशी विद्यापीठांसाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व राज्यातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले. तसेच मित्रा संस्थेच्या वतीने राज्यातील विकासाच्या परिवर्तनाविषयी चित्रफित दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी केले. कार्यक्रमाला कॅनडियन शिष्टमंडळातील प्रतिनिधी, विद्यापीठांचे प्रतिनिधी, भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास

व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास राजेंद्र साळसकर मुंबई : वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून ते एक कला कॅनव्हास ठरू शकते, याची प्रचिती व्यंगचित्रकार, लेखक, कवी आणि अमूर्त कलावंत प्रदीप म्हापसेकर यांच्या…

 शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात

शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात मंडळाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप, रक्षक संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई येथील वाशी परिसरात शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळातील पर्यवेक्षकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर शासनाच्या या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या या मंडळाला ४६ वर्षाहून अधिक काळ लोटला असताना, आजही या मंडळात कामगार मंत्री व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार, संगनमत आणि हप्तेखोरीच्या आरोपांनी मंडळातील वातावरण गढूळ झाल्याची चर्चा सुरक्षा रक्षक व कामगार विभागात सुरू आहे. काही सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे की, मंडळातील अध्यक्ष, सचिव, निरीक्षक, क्लार्क आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमतामुळे खाजगी सुरक्षा ठेकेदारांकडून नियमित आर्थिक व्यवहार (हप्ते) चालतात. ‘पोस्टिंग, ड्युटी वाटप, हजेरी नोंदणी, कंत्राट नूतनीकरण अशा प्रत्येक टप्प्यावर दबाव टाकला जातो. पैसे दिले तरच काम सुरळीत चालते,’ असा गंभीर आरोप काही रक्षकांनी केला आहे. काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, सुरक्षा रक्षकांकडून दरमहा कपातीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. वेतनवाढ, पीएफ, ईएसआय, सुट्ट्या आणि इतर हक्कांबाबत सातत्याने टोलवाटोलवी केली जाते. ‘मंडळ सरकारचे आहे. पण निर्णय मात्र खाजगी ठेकेदारांच्या फायद्याचे घेतले जातात,’ असा आरोपही करण्यात आला आहे. अध्यक्ष व सचिव बघ्याची भूमिका घेत आहेत. कामगार मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असा कारभार शक्य नाही, असा दावा काही कामगार संघटनांनी केला आहे. ‘तक्रारी दिल्या जातात; पण त्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातो,’ असा आरोप एका संघटनेच्या नेत्याने केला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार युनियनचे नेते लक्ष्मणराव भोसले यांनी निवेदन देत मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक लेखापरीक्षण आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कायद्याची व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार मंत्री यांना २० पानाचे सविस्तर एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात मी असे म्हटले आहे की, कामगार कायद्याप्रमाणे व शासनाच्या शासन निर्णयात जे म्हटले आहे ते जर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मनावर घेतले तर व त्याची काटेकोर अंमलबजाणी केली तर सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल. मात्र कामगार मंत्री यांचे बगल बच्चे खाजगी ठेकेदार यांना नाराज करू शकत नाहीत. म्हणून कामगार मंत्री पण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांनी दिला आहे आहे. काही अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. “मंडळाचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालतो. काही नाराज घटकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. शासन चौकशी करेल, आम्ही सहकार्य करू,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण आमचेच हक्क असुरक्षित आहेत,”  शासनाने तातडीने सर्वंकष चौकशी करून, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि रक्षकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या सर्व आरोपांमुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता शासन आणि कामगार मंत्रालयाकडून ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन रमेश औताडे मुंबई : बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडी  प्रदेशाध्यक्ष लीनाताई अहिर यांनी आझाद मैदानात २१ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अद्याप सुरू केले आहे. कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी त्यांनी  ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, संबंधित चालक व जागा मालकांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी लीनाताई अहिर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारून महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. लीनाताई अहिर यांनी प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निश्चित कालमर्यादा द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा अनेक नवनवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ . चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा व मार्गदर्शनपर भाषणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील प्राचार्यांपासून सर्व शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.