Category: मुंबई

Mumbai news

 अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय

अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा पाठपुरावा मुंबई / रमेश औताडे दावडी.ता.खेड येथील जमीन गट नं ३२४/१/क व ३२४/५ मधील साडेचार एकर क्षेत्राचा ताबा गेली पाच वर्षे चांगुणाबाई गव्हाणे व राणी गव्हाणे यांना मिळत नव्हता. प्रशांत बेडसे  तहसीलदार खेड यांच्या १५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत प्रशांत बेडसे तहसीलदार, डॉ.नितीन सुर्यवंशी भुमी-अभिलेख उप अधिक्षक खेड यांच्या सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार ताबा प्रक्रियेची अंमलबजावणी आज दावडी येथे करण्यात आली. यावेळी उप अधिक्षक भूमी-अभिलेख डॉ.नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे,माणिक गायकवाड मंडल अधिकारी पिंपळगाव,भुकरमापक नामदेव कोल्हे व महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होता.खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.यावेळी चांगुणाबाई गव्हाणे व प्रतिवादींमधील वादाचे सामंजस्याने निराकरण करण्यात आले. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा सत्कार करताना अशोकराव टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते. चांगुणाबाई गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड वासिम सामलेवाले यांचेमार्फत रिट याचिका दाखल केली होती.सरकारी अभियोक्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयास सात,दिवसात ताब्याची अंमलबजावणी करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्याशी चर्चा करून गव्हाणे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. २० फेब्रुवारी रोजी हद्द दाखवून ताबा देण्याची प्रक्रीया उपअधिक्षक भूमी-अभिलेख खेड नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या उपस्थितीत पुर्ण करण्यात आली.

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे  चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी अरविंद जोशी मिरा -भाईंदर : जनतेच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना जनतेचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच त्याचे चित्रिकरण करण्यास मनाई करण्याचा अजब निर्णय मिरा भाईँदर महापालिकेने घेतल्याने गोंधळ उडाला.…

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली. लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ रद्द टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल न्युयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर लागू केलेले…

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द स्लग- पाच टक्के आरक्षण रद्द  शासन निर्णयाविरोधता मुंबई उच्च न्यायालयात याचिका मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढून शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी तसेच निमसरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना देण्यात येणारे ५ टक्के आरक्षण रद्द केले. २०१४ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड एजाझ नक्वी यांनी याचिका दाखल केली आहे. शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अचानक असं काय झाल की राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेल पाच टक्के आरक्षण रद्द केलं? असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत असल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले २३ डिसेंबर २०१४ रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्के झाले होते. काँग्रेस नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी  प्रभाकर शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता  २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.  स्थायी समितीच्या  सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.

 शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग

शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक  उमेश मूरकर तसेच त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला. सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (मल्लखांब प्रशिक्षक), आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर), बप्पासाहेब थोरात (अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, अनिल घुगे, फुलचंद कराड, नेहा साप्ते, समृद्धी देवळेकर, निलेश गराटे, साहिल उतेकर उपस्थित होते. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री विघ्नेश मूरकर यांच्यासह विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांभळे, भूपेश वैती, सय्यद मोहमद, श्रेयांक मौर्य, शिवांक मौर्य, अथर्व काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू सिद्धत गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पदयात्रा, मान्यवरांचे स्वागत, शिस्तबद्ध नियोजन व समन्वय यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे यावेळी दिसून आले.

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत…

 ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.…