Category: मुंबई

Mumbai news

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही- नितेश राणे

मालवण- भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे  प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी चौके वाघवणे येथे बोलताना केले. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके वाघवणे येथील ‘नॅनी ग्रँड रिसॉर्ट’ येथे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण अभियान कार्यशाळेस भेट दिल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पालकमंत्री राणे यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, प्रमुख वक्ते अभिजित सामंत उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, आज एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. भाजपा कार्यकर्ता हा अभिमान आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप. कार्यकर्त्यांना  दिलेला शब्द पाळला जातो तो पक्ष भाजप. एकजुटीने काम करा, आपला पक्ष मजबूत करा. कार्यकर्त्यांनी  पक्षासाठी आपला वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विधान परिषदेसाठी पालघर भाजपचा आग्रह

नगरसेवक जास्त असल्याचा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाला मतदारसंघ न सोडण्याची भूमिका योगेश चांदेकर पालघरः विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले, तरी महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे, ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगरमधील जागांसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. पालघरला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत कधीच प्रतिनिधीत्त्व मिळाले नसल्याने तसेच या वेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या शिवसेनेपेक्षा तिप्पट असल्याने पालघरच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, असा आग्रह भाजपच्या सर्वंच शाखांनी धरला आहे. तशा भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एक सदस्य निवडून द्यायचा आहे. या मतदार संघावर यापूर्वी शिंदेसेनेचा वरचष्मा होता; परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे शिंदेसेनेचे वर्चस्व कमी झाले असून आता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पालघर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करीत असतात; परंतु ठाणे आणि पालघर या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने फक्त नगरसेवकच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपचा मतदारसंघावर ठाम दावा ठाणे-पालघर मतदार संघात १,०३० नगरसेवक असून भाजपचे ४४४, तर शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक आहेत. युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. पालघर स्थानिक स्वराज्य मतदार संघातून यापूर्वी शिंदेसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ ८ जून २०२२ मध्ये संपुष्टात आला; परंतु त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका न झाल्याने विधान परिषदेसाठी निवडणूक झाली नव्हती. सांबरेंच्या शिंदेसेनेला पाठिंब्यानंतरही भाजपचेच पारडे जड शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक असले, तरी जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे २० नगरसेवक त्यांना मदत करू शकतील. त्यामुळे त्यांची संख्या ३४६ होईल. दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक आहेत. भाजपबरोबर त्यांचे सध्या बिनसले आहे. अर्थात त्यांची मते महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता कमीच दिसते. भाजपशी जरी जमत नसले, तरी राज्य सरकारशी जुळ‍वून घ्यायची त्यांची मानसिकता लक्षात घेतली, तर त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांची मते निर्णायक ठरतील. राष्ट्रवादी (अजित पवार)चे २९ नगरसेवक महायुतीच्या बाजूने असतील. महाविकास आघाडीकडे फक्त दीडशे नगरसेवक महाविकास आघाडीला नगरसेवकांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसचे ४७, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ३८, उद्धवसेनेचे १८, समाजवादी पक्षाचे ६ व इतर काही नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा अधिक होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिंदेसेनेला मदत केली होती. दुसरीकडे छोट्या पक्षांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार, हे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मनसे ६, माकप ६, एमआयएम ५, कोणार्क विकास ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १ व नऊ अपक्ष नगरसेवक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजार होतो. त्यामुळे उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाचा यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. कोण असतील मतदार? ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर, डहाणू, जव्हार या नगरपालिका तसेच शहापूर, मुरबाड, वाडा, विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीचे नगरसेवक ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान करतील. कुणाचा आग्रह? पालघर शहर भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, वीणा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक जयेश आव्हाड, वाड्याच्या नगराध्यक्षा रीमा गंधे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक, सरचिटणीस अशोक वडे तसेच महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना ठाणे-पालघर मतदारसंघासाठी आग्रही का  आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्याचे सांगून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. 0000000000

मुरबाडच्या समस्यांवर ‘बाळ्यामामा’ ॲक्शन मोडवर

आरोग्य, एसटी, शिक्षणाच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही राजीव चंदने मुरबाड : “जनतेचे प्रश्न हीच माझी प्राथमिकता” या भूमिकेची प्रचिती देत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा शनिवारी थेट मुरबाडकरांच्या भेटीला पोहोचले. शिवनेरी…

– महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Unit-11   कल्याण : महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा टप्पा ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक कल्याण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. “कुस्तीचा विकास… खेळाडूंचा सन्मान… महाराष्ट्राचा अभिमान” या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या चळवळीला ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वस्ताद, पैलवान, कुस्ती आयोजक आणि कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. कुस्ती क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पैलवानांचे हक्क, वस्तादांचा सन्मान आणि पारंपरिक कुस्तीच्या संरक्षणासाठी ही संघटना ताकदीने काम करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पैलवान संग्राम कांबळे यांनी संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि आगामी राज्यव्यापी बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ठाणे जिल्ह्यात संघटनेची मजबूत पायाभरणी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती संघटना ठाणे जिल्हाप्रमुखपदी पैलवान जितेंद्र भगत यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातून सुरू झालेली ही चळवळ आता ठाणे जिल्ह्यात भक्कमपणे रुजली असून, येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करून कुस्ती क्षेत्रासाठी पारदर्शक, सक्षम आणि शाश्वत व्यासपीठ उभारले जाईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेले ठाणे जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद चैनू लोखंडे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे, जय मल्हार कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष गोरख खळदकर, ननगरसेवक अविनाश गायकवाड, देवीदास जाधव, नंदू पाटील, विनोद पाटील, दिनेश थळे, संतोष बोधले, राजू चौधरी, नगरसेवक जयवंत भोईर, संकेत भोईर, महाराष्ट्र पोलीस नवनाथ शिर्के, वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी, आयोजक, मान्यवर आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले. 0000000000  

ईशा नेत्रालयातर्फे “समर किड्स फन इव्हेंट” संपन्न

कल्याण : ईशा नेत्रालयातर्फे मायोपिया अवेअरनेस वीक २०२६ निमित्त “समर किड्स फन इव्हेंट” चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विशाखा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. पुष्पांजली यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व नेतृत्व मानसी विशे यांनी केले. ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागी मुलांची बाल नेत्रतज्ज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. सिद्धार्थ वोरा यांनी मायोपिया जागरूकता विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. पालकांना मुलांच्या डोळ्यांची काळजी, स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम आणि नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सर्व मुलांना ड्रॉइंग किट्स देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी कुटुंबाला कॉम्प्लिमेंटरी जेल आय मास्क भेट देण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला पालक व मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बाल नेत्र आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम विशेष ठरला. 0000000000

 महागाईने त्रस्त जनतेवर पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक

वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन मुंबई : महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. इंधन दरवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे पेट्रोल डिझेलचा आवश्यक तेवढा साठा देशात आहे हे सांगत होते. पण विधानसभा निवडणुका होताच पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असा इशारा दिला होता आणि राहुल गांधी पुन्हा एकदा खरे ठरले, मोदी सरकारने निवडणुका होताच इंधन दरवाढ केली. मागील महिन्यातच एलपीजी सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती तर दुप्पट केल्याने हॉटेलसह खाद्य पदार्थ बनवणारे छोटे व्यवसाय संकटात आले व खाद्य पदार्थांचे दरही वाढले आता पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढेल. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी सबसीडी देऊन जनतेला दिलासा दिला आणि महागाईची झळ बसू दिली नाही, पण मोदी सरकार मात्र जनतेला कोणत्याच प्रकारे दिलासा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई, बेरोजगारी, यासह जनतेच्या प्रश्नात काहीच स्वारस्य नाही. जनता पिचलेली असताना पंतप्रधान मात्र विदेशी दौरे करत चॉकलेट वाटत फिरत आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पेट्रोलचा पर्याप्त साठा आहे हे सांगत आहेत पण राज्यातील काही भागात पेट्रोल पंप बंद आहेत. आजच काही प्रसारमाध्यांनी मुंबईतील दादर सायनमध्येही पेट्रोल पंप बंद असल्याच्या बातम्या दिल्या. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत पोहचल्या तरी मुख्यमंत्री फडणवीस जागे झालेले दिसत नाहीत. खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलची टंचाई होणार नाही व महागाईची झळ जनतेला पोहचणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.. 00000

राज्यपालांच्या पुढाकाराने आजपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका आज मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत २६ मेला सकाळी ११ वाजता…

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये जेएसडब्ल्यूच्या वेदांश कुशवाहाने आपला संघ सहकारी आयुष वर्माचा चुरशीच्या लढतीत ११-४, १४-१२, १३-१५, ११-८ असा पराभव केला. राऊंड ऑफ ६४ फेरीच्या आणखी एका सामन्यात, अव्वल मानांकित उत्तराखंडच्या अंश त्रिपाठीने अदीव देवैयावर ११-३, १२-१०, ११-४ असा सहज विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला. निकाल – पुरुष मुख्य ड्रॉ (राऊंड ऑफ ६४): १-अंश त्रिपाठी विजयी वि. अदीव देवैया ११-३, १२-१०, ११-४; वेदांश कुशवाहा विजयी वि. आयुष वर्मा ११-४, १४-१२, १३-१५, ११-८; संकल्प आनंद विजयी वि. मिशाल दारूवाला 11-5, 11-8, 11-8; कुणाल सिंग विजयी वि. अजय देशमुख ११-५, ११-४, ११-६; शाहबाज खान विजयी वि. कृष्ण दरवाडा ११-६, ११-८, ११-४; वेदांत पटेल विजयी वि. दिना करण 11-1, 11-4, 11-1; आर्यमान सिंग विजयी वि. उत्सव सेन११-८, ११-९, ११-८; प्रदीप मलिक विजयी वि. आदित्य शेट्टी ११-२, ११-२, ११-०; हर्ष राणा विजयी वि. अजिंक्य पाटील 11-3, 11-3, 11-8. ००००० Unit-7

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये…

ओंकार टिळकची अपयशी झुंज

 एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन येथे सुरु असलेल्या ११ व्या एम सी एफ राज्य…