Category: मुंबई

Mumbai news

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे २८ नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई :भारतातील पोर्ट उद्योगात सर्वात जुनी असलेली १०४  वर्षाची  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आहे. स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या…

मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक कायदेशीरच

 वरळी येथील हिट अँण्ड रन प्रकरण : मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोघांची अटक कायदेशीर ठरवून त्यांच्या याचिका फेटाळला. दरम्यान, याचिकांवरील युक्तिवादाच्या वेळी एखाद्या व्यक्तिला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते. मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले होते. तसेच. गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते ? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतका घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली मिहीर याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना केली होती. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. परंतु, सर्वकाही माहिती असूनही आपल्याला अटकेचे कारण सांगितले नाही हा मिहीर याचा दावा आश्चर्यकारक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. प्रकरण काय ? मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर मद्याच्या नशेत भरधाव बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे.

 मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची

 प्रल्हाद पै यांचे प्रतिपादन कर्जतच्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद सोहोळा उत्साहात   मुंबई, : ‘माणूस आनंदी असला की शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि या हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो. मानसिक…

व्यवसाय परवाना नुतनीकरणाबाबत जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची ड, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले सर्व व्यवसाय (उदा. खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक…

भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित

भिवंडी  : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीलादेखील बसतो. ही जाळपोळ थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला…

अनधिकृत बांधकामे निष्कासन करणेसाठी महानगरपालिकेने कसली कंबर

भिवंडी : आज दि.२५/११/२०२४ रोजी मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अजय वैद्य यांचे अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके, उप-आयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांचे समवेत अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी बैठक पार…

विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर

नवी मुंबई : नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकांतील इ.1ली ते महाविदयालयीन शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे…

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री…

राज ठाकरेंना धक्का मनसेचेही इंजिन जाणार सिध्देश शिगवन

मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणूकीत लागलेल्या अनाकलनीय निकालाचा सर्वाधिक फटका हा राज ठाकरेंच्या मनसेला बसला आहे. १३८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही आणि आवश्यक असलेली मतेही मिळाली नसल्यामुळे पक्षाची…

एकनाथ शिंदे, अजित पवार शिवसेना, राष्ट्रवादीचे गटनेते

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने एकनाथ शिंदे यांची निवड केली. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदासोबतच…