Category: मुंबई

Mumbai news

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण द्वारा गरजूंना धान्यकीट व चिक्की वितरण

कल्याण : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याणच्या वतीने मंगळवारी अन्न क्षेत्रात सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत  निमित्ताने यंदाही संस्था संचालक व मान्यवरांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यकीट व चिक्की वितरण करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील आधार वाडी जवळ येथे असलेल्या अन्न क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज गरजू लोकांना भोजन व दरमहा धान्यकीटचे वितरण करण्यात येत आहे. या संस्थाचे सेवा कार्य मानव सेवा ही प्रभु सेवा ह्या पू. डोंगरे महाराज ह्यांनी दिलेल्या सुत्रांच्या प्रेरणेने होत आहे. यासाठी रामकृष्ण सेवा संस्थाचे संचालक जसु चंदाराणा,  विनु तन्ना मेहेनत घेत  आहे. याकामी छबिल कारीया, मितुल देसाई,  वंश चंदाराणा, सुभाष रायचूरा, राजिव चंदाराणा, भिखू कारीया, विष्णूकुमार चौधरी, अवधूत शेट्टे, रश्मी चंदाराणा, मोनीश चंदाराणा आदी लोकं सहभागी होत आहेत.

शाळेची बस आल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाची चिंता दूर

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय या शाळेसाठी प्रवासी बस आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता दूर झाली आहे. सद्यस्थितीत मराठी शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीला अनेक शाळा  सामो-या जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी…

भांडुप परिमंडलात पाच महिन्यात ८५३ वीज चोरट्यांना महावितरणचा दणका

५ कोटी ८५ लाखांची वीजचोरी उघड   भांडुप : महावितरणच्या भांडुप परिमंडलात अधिक हानी असलेल्या वीजवाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडील ५ कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. अधिक हानी असलेल्या ६० वीजवाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीजजोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदीं विविध उपाययोजनांमुळे महसुलात ४० लाख १४ हजार ५४१ युनिट विजेची भर पडली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये ठाणे मंडल कार्यालयांतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वाशी मंडल कार्यालयातील ४०२ जणांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी सापडली. तर पेण मंडल कार्यालयातंर्गत १९३ जणांकडे ५९ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. तर अधिक वीज हानी असलेल्या ६० वाहिन्यांवरील ४ हजार ६५२ सदोष वीजमीटर बदलण्यात आले. ४ हजार ३४५ जणांनी नवीन वीजजोडणी देण्यात आली. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १२४ ग्राहकांना पुनर्रजोडणी देण्यात आली. १३.४ किलोमीटर कमकुवत वीजतारा बदलण्यात आल्या व जवळपास १० किलोमीटर एरिएल बंच (इन्सुलेशन असलेली वाहिनी) बसवण्यात आली. परिणामी ठाणे मंडलात १० लाख २७ हजार ६७ युनिट, वाशी मंडलात सर्वाधिक २१ लाख ७९ हजार ४६१ आणि पेण मंडलात ८ लाख ८ हजार १३ युनिट विजेची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली. 00000

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतली विशेष मुलांची भेट

ठाणे : विशेष मुलांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, शाळा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे. याचबरोबर सामान्य मुलांबरोबर या मुलांचा…

कोपरखैरणे व ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल…

अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती – सारंग दर्शने

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भुषविणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले, किंबहुना अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी सोमवारी (ता.१३ जाने.) रोजी ‘अटलजींचा वसा आणि वारसा’ हे सहावे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक, सुहास जावडेकर उपस्थित होते. लेखक दर्शने यांनी, अटलजींच्या चरित्राचे पैलु उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. १९५० चे दशक ते १९७७ पर्यतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतीक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले. १९८५ – ८६ नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगुन दर्शने यांनी, अटलजींच्या प्रतिभाशाली राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भुषविले. त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले. कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटीशकालीन कायदे बदलुन दुरसंचार धोरणात आमुलाग्र बदल केले. अटलजींच्या या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. ज्यामुळे देशातील १०० कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करीत असुन त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले. नेतृत्वाचा कस लागणारे अनेक निर्णय अटलजींनी घेतले. ज्यात “बुद्ध पुन्हा हसला” या अणुस्फोटाच्या धाडसी निर्णयाचा समावेश आहे. अणुचाचण्यांपासून ते अंतराळ मोहिम आणि शैक्षणिक सुधारणांपर्यंतचे अनेक निर्णय घेतल्याने भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचालीचा पाया रचला गेला. किमान समान कार्यक्रम राबवताना अटलजींनी पक्षाच्या धोरणांचा कधीच विसर पडु दिला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत असते तर देशात समान नागरी कायदा कधीच पारित झाला असता, असे स्पष्ट करताना दर्शने यांनी अटलजींच्या नेतृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टी विषद केल्या. राजकारणापेक्षा कवी म्हणून चांगली कारकिर्द केली असती, डॉक्टरेट करायची राहुन गेली आणि अध्यापन क्षेत्रात काम करणे राहुन गेल्याची खंत देखील अटलजींनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशा कवी, राजकारणी आणि दूरदृष्टी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर भारताच्या वाटचालीवर पुढील किमान ५० वर्षे प्रभाव राहिल. असेही दर्शने यांनी सांगितले. ००००

कार्यवाही न केल्यामुळे जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार यांना २५ हजारांचा दंड

अशोक गायकवाड खालापुर :जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. सदर शास्ती बाबतच्या नोंदी जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे यांच्या सेवाबुकमध्ये नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे असेही सुधीर पाटील यांनी सांगितले आहे. पेण येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा पदाधिकारी सुधीर राजाराम पाटील यांनी पेण तहसील कार्यालय येथे कार्यालयीन माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर जन माहिती अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले होते.प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश देऊनही कार्यालयीन जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पेण, यांनी माहिती पुरविली नाही. त्यामुळे कायद्याचे कलम १८/१ अनुसार मा. माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे पाटील यांनी तक्रार केली होती. (तक्रार क्रमांक ६३५/२०२१). त्या तक्रारीच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. 000000

जी.एस.वैद्य आदरणीय व्यक्तिमत्व : संजय गायतोंडे

मुंबई : १९४६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत जी.एस.तथा गनाभाऊ  वैद्य यांचा मोलाचा वाट होता. बारीक चणीचा हा हाडाचा क्रिकेटप्रेमी भरतण्याची संधी म्हणजे गेली ६६ वर्षे सुरु असलेली बाळकृष्ण् बापट स्मृती…

कोकण विभागीय लोकशाही दिनी 5 अर्ज प्राप्त

नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी…

सीपीएमचे गुजरात राज्य अधिवेशन उपलेटा येथे उत्साहात संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : ११ व १२ जानेवारीला राजकोट जिल्ह्यातील उपलेटा शहरात कॉम्रेड सीताराम येचुरी नगर येथे सीपीआय(एम) चे २४वे गुजरात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात १० जिल्ह्यांतील १९२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी ५६ महिला प्रतिनिधी होत्या. तसेच तरुणांचाही मोठा सहभाग होता. अधिवेशनाची सुरुवात मगनभाई जिवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. शहीदांना पुष्पांजली अर्पण करून शोक प्रस्ताव घेण्यात आला. यांनतर उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद माजी राज्य सचिव प्रागजीभाई भांभी यांनी भूषवले. स्वागत समितीच्या अध्यक्षा किरणबेन कालावाडिया यांनी सर्वांचे स्वागत केले. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद व झायोनिझमचा आणि राष्ट्रीय क्षेत्रात नव-फॅसिस्ट आरएसएस-भाजपचा धोका स्पष्ट केला. यावेळी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच सीपीआय(एम) ची स्वतंत्र ताकद आणि प्रभाव वेगाने वाढवण्याची निकड देखील विषद केली.अधिवेशनात अहवाल दोन भाग्गत सादर करण्यात आला आणि दोन भागात त्यावर चर्चा झाली. राज्य सचिव एच.आय.भट्ट यांनी राजकीय भाग मांडला आणि केंद्रीय समिती सदस्य अरुण मेहता यांनी संघटनात्मक भाग मांडला. पहिल्या भागावर २४ प्रतिनिधींची भाषणे झाली आणि दुसऱ्या भागावर १७ प्रतिनिधींची भाषणे झाली. अहवाल एकमताने मंजूर झाला, तसेच प्रमुख मुद्द्यांवर १२ ठरावही करण्यात आले. पहिल्या दिवशी उपलेटा टाऊन हॉलमध्ये “शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. अशोक ढवळे, मुरलीधरन आणि दयाभाई गजेरा यांची भाषणे झाली. अधिवेशनात माजी राज्य सचिव सुबोध मेहता यांनी लिहिलेल्या “कम्युनिस्ट विचारसरणी” या गुजराती पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. उदय जोशी यांनी क्रेडेन्शियल अहवाल सादर केला. या अधिवेशनाने एकमताने ३० सदस्यांची नवीन राज्य समिती आणि कायमस्वरूपी निमंत्रितांची एकमताने निवड केली. नवीन राज्य समितीने एकमताने एच. आय. भट्ट यांची राज्य सचिवपदी फेरनिवड केली आणि ९ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ निवडले. मदुराई पक्ष काँग्रेससाठी ६ प्रतिनिधी, २ पर्यायी प्रतिनिधी आणि २ निरीक्षकांची निवड केली. मुरलीधरन यांनी समारोपाचे भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी संघटनेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. उपलेटा तहसील आणि राजकोट जिल्हा संचाने परिषदेसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानल्यानंतर, मोठ्या उत्साहात अधिवेशनाची सांगता झाली.