Category: मुंबई

Mumbai news

नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू करा

रमेश औताडे मुंबई : मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे लोकशाहीच्या हिताचे तर होतेच, पण ते आणीबाणीपेक्षाही अधिक भयानक होते. वर्तमान शासनाने ‘मिसा’ कायद्यानुसार आणीबाणीच्या काळात जेलमध्ये राहिलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर लोकशाही आणि अस्मितेसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांनाही शासनाने पेन्शन घोषित करून त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. नामांतर शहीद भीम सैनिक दिनानिमित्त इंदौरा, १० नंबर पूल येथील शहीद स्मारकात आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुधा जनबंधू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी दामू दादा कावरे, प्रवीण आवळे, प्रा. रमेश दुपारे, चरणदास गायकवाड, राजू कांबळे, जयदेव चिंवडे, वैशाली तभाने, नरेश खन, विद्यानंद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्तपदावर मनिष जोशी, गजानन गोदेपुरे यांच्या शिफारशीवर आक्षेप

 नियमबाह्य असल्याचा नारायण पवार यांचा आरोप ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी विद्यमान उपायुक्त मनिष जोशी आणि गजानन गोदेपुरे यांच्या नावांची सर्वसाधारण सभेतून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.…

 टिटवाळ्यात शाळेसमोरच जीवघेणा खड्डा

केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर कल्याण : टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या भिंतीलगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने भला मोठा खड्डा खोदून ठेवला असून, या धोकादायक कामामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अगदी लगतच गटार उपलब्ध असतानाही पावसाचे पाणी त्यामध्ये वळविण्याऐवजी रस्त्यालगत खोल खड्डा खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्याचबरोबर पालक, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा विद्यार्थी, पालक किंवा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू करताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्याभोवती संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा रात्री परावर्तित होणारी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, “करतो… पाहतो… माणूस पाठवतो…” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही दुरुस्ती अथवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शाश्वत व्यवस्था करावी, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त करत, “प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादा निष्पाप जीव गमवावा लागणार आहे का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. ०००००००

 ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम राबवण्यात यावे – आदिती तटकरे

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे: शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये व वसतीगृहांमध्ये सहज उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांना मोठा…

ठाण्यात प्रथमच ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान

००००००००० ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतकालातील ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आशीर्वाद फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने “राष्ट्रजागृती : आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी…

‘१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे’

 स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर ठाणे : केंद्रीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नरेश म्हस्के हे निवडून आल्यापासून मुंबई आणि ठाणे उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी संसदेत आवाज उठवत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेचे कामकाज गोंधळ घालून ठप्प केले आहे. आज खासदार नरेश म्हस्के यांना संसदेत बोलायची संधी मिळताच त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर आवाज उठविला. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे. २०२४ मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रुळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा चारपट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने ‘सुपर-डेन्स क्रश लोड’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, दरवाज्यांवर लटकून प्रवास करणे आणि अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचे नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले. संसदीय समित्या आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याची खंतही नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून सर्व १२ डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रेकमध्ये ऑटो-डोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी तसेच स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही  नरेश म्हस्के यांनी  स्पष्ट केले.

आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार

रमेश औताडे मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ९ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मराठ्यांचे वादळ धडकणार असून आता आर या पार ची लढाई दिल्लीत लढणार.  असा इशारा  अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाज ३५ वर्षे संघर्ष करत आहे.  मात्र न्यायालयीन कसोटीवर टिकेल असे कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. वेळोवेळी सरकारने मराठा समाजाला आश्वासन दिले होते. प्रत्येक वेळी आनंदोत्सवही साजरा केला; मात्र आरक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे. नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या भावना अधिक काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही सरकारला मुदत दिली आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याअगोदर आरक्षणाचा योग्य निर्णय घ्यावा. सरकारने जर गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले नाही तर, देशातील मराठा समाजबांधवांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमराव मराठे, लक्ष्मण शिरसाठ, पंजाबराव काळे, राहुल पाटील आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

सत्ताधारी भाजपातर्फे १० ऑगस्टला ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा

 महायुतीत भाजपा शिवसेना आमने सामने मिरा-भाईंदर: मिरा-ईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत…

 पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी ३५ पदके पटकावली

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय व ‘मूट कोर्ट’चे आज उद्घाटन

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…