नागरिकांनी मतदार यादी पडताळणी करुन घ्यावी
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना…
Mumbai news
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना…
उल्हासनगर महापालिकेचे आवाहन सुनिल इंगळे उल्हासनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले असून, या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या अभियानादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून निर्धारित कालावधीत संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीमध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादीची पडताळणी होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मतदाराचे नाव सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारी व अपील दाखल करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आपल्या घरी भेट देताच त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.
देशभरातील ८०० खेळाडूंचा सहभाग मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियम येथे राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन…
बौद्ध साहित्य संशोधकांसाठी मोलाचा संदर्भग्रंथ ठरेल – ज.वि. पवार मुंबई, प्रतिनिधी : काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशनास विलंब झालेल्या ‘अपरान्त’ जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज.वि. पवार यांच्या हस्ते रविवारी मुंबई…
मुंबई : बांद्रा येथील सेंट अँड्र्यूज कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राचार्या डॉ. सिबिल थॉमस यांच्यामुळे प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागत आहे आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात काम करावे लागत आहे. त्यांनी…
नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे टोरंट पॉवरला निवेदन दिवा : शहरातील सार्वजनिक गटारांमध्ये टाकण्यात आलेल्या विद्युत केबलमुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवर लिमिटेडच्या व्यवस्थापकांना निवेदन देत गटारांमधील विद्युत केबल तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक गटारे ही पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठीची सुविधा असून त्यामध्ये विद्युत केबल टाकल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो. परिणामी मुसळधार पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच अपघात, साथीचे आजार आणि विद्युत सुरक्षेचे धोकेही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय गटारांमधून टाकलेल्या केबलमुळे ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गटारांची नियमित साफसफाई, गाळ उपसा आणि पावसापूर्वीची देखभाल करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात दिले आहे. त्यामुळे गटारांमध्ये कचरा आणि गाळ साचून पाणी तुंबण्याची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे भगत यांनी म्हटले आहे. ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवरने संबंधित यंत्रणांसोबत संयुक्त पाहणी करून सार्वजनिक गटारांमधून टाकण्यात आलेल्या सर्व विद्युत केबल तात्काळ हटवाव्यात किंवा पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा होणार नाही अशा सुरक्षित पर्यायी मार्गाने त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे काम करण्यापूर्वी संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेऊन तांत्रिक निकषांचे पालन करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिला आहे. 00000
डॉ.प्रीती करवंदे आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांचे कौतुक अशोक गायकवाड रायगड-कर्जत : मुसळधार पावसामुळे मोहिली (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजता एक…
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश ठाणे (09): ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना…
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत लावण्यात आली १५०० झाडे कल्याण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या तर्फे व पद्मडॉ. दत्तात्रय धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त कल्याण पूर्वेतील भाल टेकडी, भाल क्रिकेट मैदान, भाल गांव याठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत एकूण १५०० झाडे लावण्यात आली. या अभियाना अंतर्गत प्रामुख्याने दीर्घायुषी व जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मदत होईल. अभियानास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उद्यान निरीक्षक तथा उपायुक्त संजय जाधव, बदलापूर वनविभाग अधिकारी संजय धारवणे, राजू शिंदे, वैभव वाळिंबे, वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा नगरसेवक किरण भांगले, कल्याण वनविभाग अधिकारी निलेश आखाडे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक निलेश खंबायत, कैलाश जोशी, पल्लवी जोशी, स्वप्नाली केणे, आकांक्षा भोईर, माजी नगरसेवक प्रकाश तरे, जगदीश तरे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे तसेच भाल गावातील नागरिक, श्रीसदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.
बातमी इम्पॅक्ट मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानमध्ये पावसाळ्यात नालेमय बनलेल्या रस्त्यावरून पायी चालत जाणे किंवा ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणे अत्यंत जिकिरीचे बनले होते.त्यामुळे ९ रोजी प्रसिद्ध…