Month: August 2026

 मुंबई स्नायपर्सच्या विजयात जेना सूर्या चमकली

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग साउथ मुंबई मॅनियाक्सवर दोन गुणांनी मात मुंबई, २७ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात, १३-वर्षांखालील मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई स्नायपर्सने साउथ मुंबई मॅनियाक्सचा ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२) असा पराभव केला. या विजयात जेना सूर्याने मोलाची भूमिका बजावली. गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत स्नायपर्सच्या आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या जेनाने सर्वाधिक २४ गुण नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. साउथ मुंबईकडून इंचारा कडलीने १७ गुण मिळवले. तत्पूर्वी, रायगड क्रॉसर्सने ४५-१९ (मध्यंतर १८-१०) असा सहज विजय मिळवला. रायगड क्रॉसर्सकडून वाणी मेनन (११ गुण), टियाना सिक्वेरा (१० गुण) आणि बरजाताने (८ गुण) सर्वाधिक योगदान दिले. मुलांच्या गटात चुरशीच्या सामन्यात, साउथ मुंबईने मुंबई स्निपर्सवर एका गुणाने विजय मिळवला. विजेत्या संघाकडे मध्यंतरापर्यंत २९-२८ अशी निसटती आघाडी होती. त्या आधी, एका एकतर्फी सामन्यात जेबी नवी मुंबईने पुणे ग्लोबल स्पोर्ट्सवर ७१-३५ (मध्यंतर ३६-२४) असा विजय मिळवला. निकाल (मुली): रायगड क्रॉसर्स (वाणी मेनन ११, टियाना सिक्वेरा १०, बरजाता ८) विजयी विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स स्ट्रायडर्स (रिया जैन ६) – ४५-१९ (मध्यंतरापर्यंत १८-१०). मुंबई स्नायपर्स (जेना सूर्या २४) विजयी विरुद्ध साउथ मुंबई मॅनियाक्स (इंचारा कडली १७) – ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२). मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी. मुंबई स्निपर्स (जोहान जोशुआ ३०, झायाद एस. ११) – ६०-5९ (HT: २९-२८). जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २5, अभिर शेट्टी १२, ज्ञान पारेख १०) पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – 7१-३5 (३६-२4) असा पराभव केला.

बॉम्बे जिमखाना स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० प्रवेशिका

मुंबई, २७ ऑगस्ट: ५९ व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० इतक्या प्रवेशिका (एन्ट्रीज) आल्या आहेत. बॉम्बे जिमखाना येथील ग्लास-बॅक कोर्ट्सवर २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण…

पारमिता धर्मादाय न्यासातर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस…

दाक्षिणात्य चित्रपटासाठी ‘समर्थ’ ला चित्रपटगृह नाकारले

रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले. यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे साकडे घालण्यात आले आहे. ‘समर्थ’ चित्रपटाची कथा संकल्पना साकार करणारे निर्माते रवींद्र पाठक यांनी या संदर्भात आपली कैफियत मांडतांना सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांनी केलेल्या समाजप्रबोधनाचे विचार समाजासमोर आणण्यासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याचवेळी दोन मोठे बहुचर्चित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु समर्थ चित्रपट लोकप्रियता मिळवू लागला. सुमारे दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहिला. विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साठी आम्ही हा चित्रपट सवलतीच्या दरात दाखविले. आणखीही काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहण्यासाठी तयारी दाखविली. त्याचवेळी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि समर्थ या मराठी चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही चित्रपटगृह नाकारण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपट जी कमाई आम्हाला मिळवून देणार आहे ती कमाई आम्हाला समर्थ चित्रपट लावून मिळणार नाही, मग आमचे नुकसान कोण भरुन देणार? असे उर्मटपणे उत्तर ऐकायला मिळते. या चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षकांनी दर्जेदार म्हणून गौरविले आहे. अशा परिस्थितीत जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृह नाकारण्यात येत असतील तर काय होणार? असा उद्विग्न सवालही समर्थ चे निर्माते रवींद्र पाठक यांनी केला आहे. शंकर महादेवन, पंडित संजीव अभ्यंकर, आर्या आंबेकर, जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, रोहित राऊत यांनी गीते गायली असून  केदार पंडित आणि रोहित राऊत हे संगीत दिग्दर्शक तर आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत आणि दिग्दर्शक योगेश फुलफगर आहेत.

मुंबई लाइट फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीच्या इमर्सिव्ह प्रोजेक्शन मॅपिंगसह कुलाब्यातील मुंबईचे ऐतिहासिक अफगाण चर्च उजळले. (छाया: शत्रुघ्न सिंग)

 गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घ्या

महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना वा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते तसेच गल्लीबोळांतील विजेच्या तारांची (वीजवाहिन्या) उंची लक्षात घेऊनच गणेशमूर्तीची उंची व रथाची रचना निश्चित करावी. त्याचप्रमाणे मंडप आणि रोषणाईसाठी वीज संचाची मांडणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जावे. अपघात टाळण्यासाठी केवळ प्रमाणित आणि कुशल विजेच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घ्यावे. गणेश मंडळांसाठी वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने अत्यंत सोपी केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करून त्वरित तात्पुरती वीज जोडणी मिळवता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, तसेच विजेच्या तारा किंवा खांबाजवळ मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.