Month: August 2026

केडीएमसी महापौरांनी केली आधारवाडीतील आदिवासी वस्तीची पाहणी

पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान, संकुलात वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासंबंधी गंभीर समस्या उघडकीस आल्या. संकुलात सर्वत्र पसरलेली घाण आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी सांगितले की, रहिवाशांना केवळ आधारवाडीतच नव्हे, तर नगरपालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी संकुलातील सर्व प्रमुख समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या भेटीमुळे आदिवासी वस्तीला भेडसावणाऱ्या दीर्घकाळच्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

कल्याणमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात

कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर…

जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी–एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य कोणतेही राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या…

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; ३० हजार स्पर्धकांची नोंदणी

अनिल ठाणेकर ठाणे : येत्या ३० ऑगस्टला होणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक स्पर्धकांनी…

खुटल (बा) मध्ये घरकुल घोटाळा!

पक्क्या घरवाल्यांना लाभ, बेघर गरिबांना डावलले राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील खुटल (बा) ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी एकूण ३२५ लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत तयार करण्यात आली आहे. मात्र या यादीवर गावातील ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्यांच्याकडे आधीच पक्के स्लॅबची घरे आहेत अशा सुस्थितीतील व्यक्तींची नावे घरकुलाच्या यादीत घेण्यात आली आहेत. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, जे पत्र्याच्या झोपडीत राहतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे अशा गरीब कुटुंबांची नावेच सर्वेक्षण यादीत घेतली गेली नाहीत. घरकुलासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बोगस कारभाराविरोधात ग्रामस्थांनी १८ ऑगस्टला झालेल्या बोगस ग्रामसभेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेने तात्काळ ग्रामपंचायतीच्या विरोधात पंचायत समिती मुरबाड येथे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन केले. या आंदोलनात संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेर स्थळ पाहणी करून यादीची तपासणी करावी. यादीतील प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून पक्के घर असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांची नव्याने पाहणी करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि किसळ ग्रामपंचायत सरपंच कॉ. कविता वरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, तालुका अध्यक्ष जगदीश शिद, उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, तालुका प्रवक्ता बाळा दळवी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००

 महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबरपासून

अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांची माहिती रायगड-लिबाग : अशोक गायकवाड महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली काढण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ मार्च या कालावधीत महात्मा जोतिराव फुले…

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

रमेश औताडे मुंबई: इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

रमेश औताडे मुंबई : दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले. 0000000

अभियान सन्मानच्या ऐंशीव्या पुष्पात चाळीस कलाकार रंगमंच आविष्कार घडवणार

कलाश्रमने स्वतंत्र भारताचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा केला. योगायोग म्हणजे ‘मी पाऊस पहिला’ हे ऐंशी पानांचे पुस्तक प्रकाशित होत आहे. ऐंशीव्या पुष्पात निसर्गकवी ना. धों. महानोर कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना गीतांजली अर्पण केली जाणार. ऐंशीवे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता पंकज विष्णू उपस्थित रहाणार. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था गेली नऊ वर्षे ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवत असते. दिवंगतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सोमवार, ३१ ऑगस्ट,  दुपारी ३ वाजता, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, तिसरा मजला, लघु नाट्यगृह, प्रभादेवी येथे या उपक्रमाचे ८० वे पुष्प म्हणजे काव्य सादरीकरण नृत्य, गायन, वादन यांना प्राधान्य देणारा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धक कवी आणि इतर कलाकार असे चाळीस कलाकार आपला रंगमंच अविष्कार येथे घडवणार आहेत. अभिनेते पंकज विष्णू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने १५ ऑगस्ट निमित्ताने स्वतंत्र भारताचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला. परंतु योगायोग म्हणजे या संस्थेचे हे ८० वे पुष्प आहे. यानिमित्ताने ‘मी पाऊस पाहिला’ हा स्पर्धक कवींचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. तो सुद्धा ८० पानांचा आहे. शिवाय या उपक्रमात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. याही उपक्रमाचे हे ८०वे पुष्प आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे याच महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांच्या ‘अजंठा’ या चित्रपटातील पाऊस गीतावर ३० कलाकार येऊन गीतांजली अर्पण करणार आहेत. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांची असून लेखन, दिग्दर्शन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केलेले आहे. ‘मी पाऊस पाहिला’ या शिर्षकात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ‘मी पाऊस पाहिला’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या निमित्ताने याच नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. हा काव्यसंग्रह निवृत्त पोलीस अधिकारी आणि आदर्श गृहिणी शुभांगी जौंजाळ यांना अर्पण केला जाणार आहे. कार्यक्रमाला डॉ. कामिनीदेवी देसाई यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या रंगारंग कार्यक्रमात चंचल कांबळे, पूजा मंत्री, खुशी जाधव यांची नृत्य अदा पाहायला मिळणार आहे. रविकिरण पाटील, प्रीतम शिंगे, ज्ञानेश्वर भगत, संजना जाधव, मंजुषा साष्टे यांचा स्वरसाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्योती शिंदे, सविता जाधव, प्रिया राजपूरकर, सावित्री कदम यांच्यावर सोपवलेली आहे. अमित सोळंकी हे संगीत समन्वयक तर रोहन वानखेडे यांची प्रकाशयोजना या कार्यक्रमाला लाभलेली आहे. पुस्तक प्रकाशन आणि ‘ते आज काव्य झाले’ ‘मी पाऊस पहिला’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ००००००

मुरबाडमध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप शिबिर

राजीव चंदने मुरबाड :  कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भारत सरकारच्या अल्मिको मुंबई व जिल्हा प्रशासन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्यक साहित्य वाटप योजनेअंतर्गत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार ३१ ऑगस्ट, सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुणबी समाज हॉल, मुरबाड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे आयोजित केले आहे. या शिबिरात केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले जाणार आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या (काखेतील व हातातील), वॉकर, अंधांसाठी काठी, श्रवणयंत्र, कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, कृत्रिम हात-पाय व इतर सुमारे चोवीस प्रकारचे साहित्य समाविष्ट आहे. शिबिरासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – अ) गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी – १) वय साठ वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डची छायाप्रत २) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत ३) पासपोर्ट आकाराचा एक फोटो ब) दिव्यांग बांधवांसाठी – १) दिव्यांग प्रमाणपत्राची छायाप्रत २) आधार कार्डची छायाप्रत ३) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत ४) पासपोर्ट आकाराचा एक फोटो या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी व नोंदणी करून घ्यावी आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किसन कथोरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उल्हास बांगर ९२६०४२००७०, रामभाऊ दळवी ९२०९४०८९९९, मोहन गडगे ९९२२७०१०००, दिपक पवार ८३०८५३५२००, जितेंद्र भावार्थे ९८९०९२५०५६ यांच्याशी सम्पर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.