Month: August 2026

शाम गावडे यांचे आकस्मिक निधन

मुंबई :  फोर्टचा राजा गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महादेव ऊर्फ शाम ( नाना) भिमाजी गावडे (वय ६५) यांचे अलिकडेच  ह्रदयविकाराने  आकस्मिक निधन झाले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावडे यांचे…

मुलुंड विधानसभा मतदारसंघ

आज मुलुंड विधानसभा मतदारसंघातील SIR संदर्भात तसेच विविध संघटनात्मक आणि कार्य आढावा बैठकीस कुडाळ-मालवणचे चे आमदार तसेच ईशान्य मुंबईचे संपर्कप्रमुख सन्माननीय निलेश नारायणराव राणे यानी उपस्थित राहून मतदारसंघातील सुरू असलेल्या…

राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू  करण्याची मागणी

मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सीजेपी  च्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र करणी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे सामाजिक शांतता भंग झाल्याचा आरोप करत राज्यात तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा,…

मातंग समाजाची ‘लहू बंधन’ मोहिमेतून क्रांतीची सुरुवात

रमेश औताडे मुंबई : महामानव लहुजी उस्ताद साळवे आणि पिवळा रंग हे समीकरण म्हणजे या महामानवाची निशाणी आहे. तोच धागा पकडत लहुजी वस्ताद यांची निशाणी म्हणून “ लहू बंधन “ सर्व समाज बांधवांच्या हातात बांधण्याचा संकल्प साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने झाल्याने  एका नवीन पर्वाची सुरवात झाली आहे. असे मत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले. अनेक लोक वेगवेगळ्या देवा धर्माच्या नावाने  वेगवेगळ्या रंगाचे बंधन बांधतात. पिवळे बंधन हे मातंग समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरेल असा संकल्प करत समाज बांधव संदीप नामवाड, संतोष थोरात, बाबुराव मुखेडकर यांनी राज्यभर समाज बांधवांच्या हातात हे पिवळे बंधन बांधून समाजाला एकत्र आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या बंधनांमुळे  समाज बांधवांमध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होईल. सकल मातंग समाज च्या वतीने पुढील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अंदोलनात सहभागी होण्यासाठी हे लहू बंधन बांधून समाजाच्या मागण्यांचे रणशिंग फुंकले जाणार आहे असे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी सांगितले. ००००

मुस्लिम वंचित समाज, युवक व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा संकल्प

मुंबई : मुस्लिमांतील वंचित समाज, युवक व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली येथे संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी मुंबईत…

 हितेश आणि चेतना मेहता यांनी साकारले विठोबा रखुमाई!

गुणवंतांच्या गौरवाने साजरी झाली लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी मुंबई : दहिसर मधील एन. एल संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात ‘उडान परिवार’ आणि  ‘रोटरी क्लब ऑफ दहिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुष लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यस्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सुरूवातीला ‘उडान परिवार ज्येष्ठ नागरिक कट्ट्या’चे मार्गदर्शक प्रवीण लाडे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लोकमान्यांचे महत्त्व कथन केले. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे, रोटेरीयन सुप्रसिद्ध लेखक श्रीरंग प्रभू, दिलीप नाबर, हितेश मेहता, विक्रम दवावाला, महेश वर्तक यांची भाषणे झाली. त्यातूनच ‘हातात हात, मनात विश्वास, सेवेने जोडू या, समाजाचा श्वास’ एकतेची ही ज्योत अशीच तेवत राहो. मानवतेचा दीप प्रज्वलित राहो’ ही सद्भावना  व्यक्त करण्यात आली.    रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष रोटेरीयन प्रकाश कामठे यांनी याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील उपस्थित आणि ‘विराज पर्व अकादमी’ भारतीय सैनिक, पोलीस दल भरती प्रशिक्षक विराज विजय नारकर यांना  गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उडान परिवार प्रमुख शिरीष बच्चुभाई पारीख आणि भारतीय दलित साहित्य अकादमी, बृहन्मुंबई अध्यक्ष दत्ताराम पुंजाजी घुगे यांना रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईचे  सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. सत्कारमूर्तींचे परिचय वाचन  रोटेरीयन हर्षा दवावाला, प्रिया कामठे यांनी केले. चेतना मेहता यांनी सूत्रसंचालन केले.  या कार्यक्रमातच आषाढी एकादशीला  निघालेल्या दिंडीत भगवान विठ्ठलाचे रूप घेतलेले हितेश मेहता आणि रुक्मिणीच्या रूपात चेतना मेहता हे दांपत्य अथकपणे १२ तास अन्नपाणी न घेता दिंडीत रथावर उभे होते. दहिसरकरांना त्यांनी साक्षात पंढरीच्या माऊलीचे दर्शन घडविले. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे यांच्यावतीने शेकडो ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन दीपक खेर यांनी केले. 0000

 नाना नानी पार्कसाठी ५० लाख रुपये देण्याची मंदाताई म्हात्रे यांची ग्वाही                                                              

मुंबई :नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर, सुसह्य होण्यासाठी आणि सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी  सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क बनविण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये निधी…

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचा, सांस्कृतिक कार्य विभागाला विसर?

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर आणि थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या आज १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात…