Category: मुंबई

Mumbai news

– तिसरी मुंबई मास्टर्स स्क्वॉश स्पर्धा

अव्वल मानांकित राजपालला पराभवाचा धक्का मुंबई, 6 ऑक्टोबर: जिद्दीने आणि निर्धाराने खेळताना वरिंदर सिंगने अव्वल मानांकित संजय राजपालवर 11-7, 5-11, 11-8,12-10 असा शानदार विजय नोंदवत स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…

नंदू नाटेकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धा

पुण्याच्या दर्शन पुजारी व पूर्वा बर्वेला एकेरीत विजेतेपद मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनरायझर्स नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरीत अनुक्रमे…

शहाड उड्डाणपुल होणार चारपदरी

डोंबिवली, ता. ६ : शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत; मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर…

कमलाबाई कडवे स्मृती कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ६० मुलींमध्ये चुरस  

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणारी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे,…

काशिमिऱ्यात घोडागाड्यांची शर्यत

  ६ घोडे जप्त, तिघांना अटक वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्‍या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून ६ घोड्यांची सुटका केली आणि ३ जणांना अटक करण्यात आली आहे. वरसावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) या प्राण्यांसाठी काम करणार्‍या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि घोड्यांची सुटका केली. या कारवाईत ओवीन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक केली आहे. घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेच्या कलम २९१, २८१, १२५, ३(५) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिंबधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी भाईंदरच्या उत्तन गाव परिसरात राहणारे असून ऊरूस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत ६ घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येखखील पशू आश्रमात ठेवण्यात आले आहे.

..तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार

कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कत्तलखान्याच्या मुद्यावरून शहरातील राजकीय वातावरण पेटणार आहे. उत्तन येथील शासकीय जागेवर ४० कोटी रुपये खर्चून कत्तलखाना उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मिरा भाईंदर महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कत्तलखान्यास मिरा भाईंदर भाजप पक्षाने विरोध केला आहे. या संदर्भात रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. मुळात या कत्तलखान्याची गरज नव्हती. कत्तलखाना उभारण्याचा निर्णय इतक्या झटपट पद्धतीने घेण्यात आला असल्यामुळे त्यातील निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. शहराला गरज नसताना नागरिकांच्या माथी हा कत्तलखाना लादला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करून पालिका मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी यावेळी दिला. मिरा भाईंदर शहरात उत्तन येथे उभारण्यात येणारा नवा कत्तलखाना हा आमदार गीता जैन यांच्या मतदारसंघात आहे. जैन या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने त्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. या कत्तलखान्यास शहरातील जैन समाजासह अन्य स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गीत जैन या देखील स्वतः जैन समाजातून येतात. कत्तलखान्याच्या मंजुरीमुळे गीता जैन यांचे ‘दाखवण्याचे व खाण्याचे दात वेगळे आहेत’ असे आरोप मेहता यांनी केला. निवडणुकीत कत्तलखाना मुद्याचा वापर मिरा भाईंदर शहरात हिंदूंसह मुस्लिम व ख्रिस्ती समाजातील नागरिक मोठ्या संख्यने राहतात. मांसहारी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वतंत्र कत्तलखाना उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र शहरात वर्चस्व असणार्‍या जैन समाजाला या कत्तलखान्यास विरोध आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन-मारवाडी समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी कत्तलखान्याला विरोधाचा मुद्दा भाजपने उचलला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा राजकीय फायदा उठविण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा १० ऑक्टोबरला दसरा मेळावा

 श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, अरुण गोडबोले, सोमनाथ घार्गे आदी मान्यवरांना सातारारत्न जाहीर मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी, विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप, कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास  धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड.पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे. याशिवाय सातारभूषण पुरस्कार सन्माननीय किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु.भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात येणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ  देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी  सोन वाटप करून दसरा साजरा केला जातो.अधिकाधिक सातारकरांनी यावेळी उपस्थित रहावे ,असे आवाहन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००

कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटी

सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे भूमिपूजन कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच पहिल्या टप्प्यात भगवा तलाव येथील आदेश्र्वर चौक ते विकास हाईट्स (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली. भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे आदी उपस्थित होते.

अमराठी खासदाराने मराठी भाषेला दिला मान-सन्मान

माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार… राजेंद्र साळसकर मु़ंबई : घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. तमाम मराठी जनांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. उत्तर मुंबई तून दोनदा महाराष्ट्रात प्रथम येऊन प्रचंड मतांनी निवडून खासदार पदी निवडून आलेल्या गोपाळ चिनय्या शेट्टी या अमराठी खासदाराने निवडून आल्यानंतर सन २०१४ पासून सातत्याने संसदेत व संसदेच्या बाहेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे ही मागणी सातत्याने लावून धरली एवढेच नव्हे तर त्याचा पाठपुरावा केला. आज मराठी अस्मितेसाठी कटिबद्ध असणारे व मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला गेला. उत्तर मुंबई मध्ये अन्य भाषिक मतदारां बरोबरच मराठी भाषिक जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले व मला भरभरून मतदान केले त्या मराठी भाषिक जनतेचे ऋण मी यामुळे थोड्याफार प्रमाणात फेडू शकलो याचा मला आनंद आहे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी एक खारीचा वाटा उचलला यासाठी अनेकांनी प्रयत्न केले यात भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांचेही योगदान असल्याचे तसेच अनेक मराठी  वृत्तपत्रांचा देखील मोठा वाटा असल्याचे  प्रतिपादन शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले. मराठी भाषेने देशासाठी केलेल्या सांस्कृतिक योगदानाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन सत्कार प्रसंगी बोलताना शेट्टी यांनी व्यक्त केले. मी जनसेवक ह्या नात्याने यापुढेही गोर-गरीब जनतेची सेवा करत राहणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सागितले. इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक रविराज पराडकर यांनी देखील एका कर्नाटकी खासदाराने मराठी साठी दिलेले योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. मराठी वर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते व विविध स्तरातील अनेक मान्यवर मोठया प्रमाणात या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.

शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

रमेश औताडे मुंबई : गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे विद्यालयातील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या, ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार शिक्षण विभागाला लेखी देऊनही कारवाई होण्यास विलंब का लागत आहे ? असा सवाल गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी यावेळी केला. रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली. निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले. त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत  शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.