Category: मुंबई

Mumbai news

देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

रमेश औताडे मुंबई : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभर वृक्ष लागवड संकल्प केला असून स्वतः २६ हजार ७०० वृक्ष महाराष्ट्र व गोवा या राज्यात लाऊन पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला आहे. अशी माहिती पर्यावरण बचाओ आंदोलनाचे प्रणेते व इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक अध्यक्ष अशोक एन. जे. यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना अशोक एन जे म्हणाले, भारतात तरुण वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यांना सोबत घेत हि जनजागृती सुरू आहे.  बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि फसवणूक अशा अनेक समस्यांमध्ये  खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढायचे असेल तर तरुणांच्या हाती पर्यावरण रक्षणाची जवाबदारी दिली पाहिजे असे अशोक त्यांनी सांगितले. ७०० कोटी झाडे लावण्याचा महासंकल्पामध्ये  तरूण वर्ग सहभाग घेत आहे. त्यांनी घेतलेला पर्यावरण रक्षणाचा वसा इतर तरूणांनीही घ्यावा म्हणून हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हे पर्यावरण  जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

मुंबई उपनगर संघाची निवड

 राज्यस्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धा मुंबई : येत्या १३ ते १५ सप्टेंबर रोजी आडगाव, नाशिक येथे एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन- महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात बोरीवली (पश्चिम) येथील सुविद्या प्रसारक संघ आणि बीमा नगर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या ८ खेळाडूंची निवड झाली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये प्रमुख प्रशिक्षिका व राष्ट्रीय पंच सौ. संचिता देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू सराव करतात. सहाय्यक प्रशिक्षक आशिष देवल हे देखील कार्यरत आहेत. हे दोघेही “मल्लखांब लव” या संघाच्या माध्यमातून मल्लखांब, एरियल स्पोर्ट्स, जिमनॅस्टिक, योगा व भारतीय व्यायामाचे नियमित प्रशिक्षण वर्ग चालवतात. गेल्या राज्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेत यंदा देखील मुंबई उपनगरचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री आहे. या राज्य स्पर्धेतून झाशी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. निवड झालेले खेळाडूं मुली :- नॅशनल डेव्हलपिंग ग्रुप ( ८ ते ११ वर्ष मुली ) १) जिआना  रजक २) शिवाई पोवार मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुली ) १) सान्वी सावंत २) आर्या जाधव ज्युनियर ग्रुप ( मुली ) १) अमोलिका श्रोत्री मुलांमध्ये :- मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुले ) १) शौर्य नाईक सब ज्युनियर ग्रुप (१५ ते १७ वर्ष मुले ) १) निरंजन अमृते ज्युनियर ग्रुप (१८ ते २० वर्ष मुले  ) १) द्वारकाधीश पाटील

वंचितचा विधानसभेसाठी नवा फंडा !

मुंबई : आगामी निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवा फंडा लढविला आहे. सर्व आदीवासी संघटनांना एकत्र आणून आता केवळ राखीवच नाही तर खुल्या जागांवरही वंचित आघाडी उमेदवार उभे…

 गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश   मुंबई : गणेश उत्सवात नागरिकांचे प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएला केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहोचता यावे, हा या विस्तारित सेवेचा उद्देश आहे. याबद्दल बोलताना मंत्री लोढा म्हणाले “महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांचे सुंदर देखावे पाहण्यासाठी भक्त रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतात. २४ तास सुरु असलेल्या मुंबईमध्ये भक्तांची घरी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मेट्रो सेवेच्या वेळेत आणि फेऱ्यांमध्ये बदल केले आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल, सुव्यवस्था राखली जाईल आणि प्रत्येकाला सणाचा आनंद घेता येईल. विस्तारित सेवांचा तपशील: अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे: १. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा) २. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४ सेवा) ३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा) ४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा) ५. दहिसर (पूर्व)  ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४ सेवा) ६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४स ेवा) 00000  

वीज कर्मचाऱ्यांना घसघशीत वाढ; आता महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ मिळाली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल १९ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. तीन्ही…

धुसफूस संपवा, कामाला लागा

अमित शहांचा महायुतीला ‘महासल्ला’ मुंबई : गेल्या काही दिवसात महायुतीतील बढ्या नेत्यांमध्ये होत असलेल्या जाहिर आरोप प्रत्यारोपाची केंद्री गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ…

रिपब्लिकन पक्षाला (खोरिपा) महाविकास आघाडीने गृहीत धरू नये – उपेंद्र शेंडे

मुंबई : रिपब्लिकन पक्षाने (खोरिपा) लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी महविकास आघाडीला पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय सांगितला होता त्यानंतर राज्यभरात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता त्यामुळेच महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले होते ह्या विजयात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चा खारीचा वाटा आहे आता राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अशावेळी आम्ही राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या भेटीसाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत मात्र कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या भेटी होत नाहीत त्यामुळे जर महाविकास आघाडीला रिपब्लिकन पक्षाची (खोरिपा) गरज नसेल तर तसे कळवावे परंतु रिपब्लिकन पक्षाला गृहित धरू नये असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी सांगितले आहे रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा २५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे ह्या जन्मशताब्दी सोहळाचा प्रचार करण्यासाठी आज मुंबईत आझाद मैदान येथे पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी सांगितले की दि १२ सप्टेंबर पासून विदर्भाचा दौरा करणार आहेत ह्या दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे ह्यावेळी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुचना करण्यात येणार आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची याचा आढावा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे सुद्धा भाऊ निरभवणे यांनी सांगितले पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष सलीम सय्यद, फरहाना ताई पठाण, इस्माईल मनियार उपस्थित होते अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे  यांनी दिली आहे.

आदी वंदू तुज मोरया…

 निवडणूकीच्या धामधुमीत आज आपल्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आदी…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते गणपतीची दुपारची आरती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यासंदर्भात बालाजी आढळकर, सखाराम बोडके, उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपुस करीत त्यांना दिलासा दिला. यावेळी वर्षा निवासस्थानी कर्तव्यावर असलेले पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते देखील यावेळी आरती करण्यात आली.

गणेशोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता प्रचार

नवी मुंबई : या वर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले असून विविध माध्यमांतून हे आवाहन नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या करिता आधुनिक सोशल मिडीयाच्या ऑनलाईन माध्यमांप्रमाणेच पारंपारिक मुद्रित माध्यमांचाही प्रभावी उपयोग करण्यात येत आहे. गणेशोत्सव कालावधीत श्रीगणेशासमोर पूजन करतांना आरत्या म्हटल्या जातात हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला असून दुमड पानांच्या स्वरुपातील या आकर्षक आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपारिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत व दुस-या बाजूस स्वच्छता विषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिंक जलस्त्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थित करण्यात आले. हे आरती संग्रह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सोसायट्या व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपारिक माध्यमाचा उपयोग करुन स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ००००