Category: मुंबई

Mumbai news

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम मुंबई : भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या विजय मल्याला आज मुंबई हायकोर्टाने भारतात परतण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. विजय मल्या याने भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला शेवटची संधी दिली. मध्यसम्राट मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त इशारा देताना स्पष्ट केले. भारतात कधी परतणार किंवा भारतात परणार आहात की नाही ? याबाबत मल्याला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश याआधी न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा मल्याला तो भारतात आल्यावरच त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मल्ल्याला फरारी घोषित केल्यानंतर आणि लंडनमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच त्याने एफईओएला आव्हान दिल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीने महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी केला. दुसरीकडे, कायद्याचे स्वरूप पाहता, मल्या हा प्रत्यक्ष भारतात परतल्याशिवाय त्याची बाजू ऐकली जाऊ शकते, असा दावा त्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.

क्षण आनंदाचा…अभिमानाचा!

क्षण आनंदाचा…अभिमानाचा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले.

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले रमेश औताडे मुंबई :  लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या मंत्रालयात अण्टी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीनं सापळा रचून एका क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले. अन्न व औषध प्रशासन…

चायनिज वर पिझ्झा भारी

चायनिज वर पिझ्झा भारी स्वाती घोसाळकर मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला.…

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ?

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ? राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार…

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…

  दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष!

३० वे समर्थ खो-खो शिबीर दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष! मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे. परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे.  संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक ३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू अनिल ठाणेकर मुंबई – राज्यातील शासकीय रुग्णालयांतील सेवांवर शुल्क आकारण्याबाबत जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ रद्द करावा आणि…

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

  राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार..

राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न… मुंबई :    स्व. अजितदादा पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान”  राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली  विधानभवन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.या नव्या अभियानामुळे पक्षाला मजबूती देण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.  पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी हीच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगर म्हणाले. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा घेत “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे,कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक,शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.