Category: मुंबई

Mumbai news

 उल्हासनगर महापालिकेतील समिती सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध

आज जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा उल्हासनगर दि 20(सुनिल इंगळे ):- उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच नऊ विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पदांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आज या प्रक्रियेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले असून ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका सभागृहात सर्व सभापतींची घोषणा जाहीर केली. उल्हासनगर महापालिकेच्या विविध समित्यांसाठी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध निवड निश्चित झाली होती. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कुलवंत सिंग सोहता याची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कौर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांची निवड घोषित करण्यात आली. सोमवारी झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी आमदार पप्पू कालानी, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण आशान,शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या संशोधकांना राष्ट्रीय पेटंट प्राप्त

कल्याण: के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील पीएचडी विद्यार्थी अनिकेत मराठे यांच्या संशोधनाअंतर्गत गोगलगायींच्या प्रजातींचे सहज आकलन व्हावे ह्या उद्देशाने एक उपकरण विकसित केले आहे. ह्या उपकरणासाठी त्यांना राष्ट्रीय पेटंट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अनिकेत मराठे हे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे प्राणिशास्त्र विभागात सहा. प्राध्यापक असून पेंढरकर महाविद्यालयातील डॉ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी करीत आहेत. कॅ.डॉ. वर्षा नरवडे आणि अर्जुन शाहू यांचेदेखील पेटंट यशस्वीपणे नोंद होण्यासाठी सहकार्य लाभले आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे ह्यांनी डॉ.  महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधनाभिमुख व्हावे ह्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करून संस्थादेखील सर्वतोपरी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.  याप्रसंगी डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय भोळे हे देखील उपस्थित होते. 0000000000

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल 

  मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते आजतागायत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ व महापालिकेच्या…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात खासगी व्यक्तीला राहण्यासाठी घर

सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी कल्याण: कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात शासकीय जमिनीवर नियमांची पायमल्ली करून खासगी व्यक्तीला कायमस्वरूपी राहण्यासाठी घर बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

केडीएमसी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथमध्ये सामंजस्य करार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिपत्याखालील कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील  शक्तीधाम रुग्णालय यामध्ये रुग्णसेवा देण्याकरिता सामंजस्य करार तत्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करण्याच्या…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश मुंबई  : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील  घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार बद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी  दिले आहेत. विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र ८ डी/१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रायांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकार विल्हेवाट लावण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याचे तक्रार समोर आले असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  

आयुष्य विकलांग होण्यापूर्वी सावध व्हा – डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी

मुंबई / रमेश औताडे “मेंदूचा विकास अपुरा असणे या ‘ऑटिझम’ आजाराची सुरुवात गर्भाशयातूनच होते. ऑटिझम आजार तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मुलाच्या आयुष्याला विकलांग करण्यापूर्वीच त्याला ओळखा व ऑटिझमचे निर्मूलन करा”, अशी माहिती ‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’ चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन, शिवसेना मेडिकल हेल्प सेल , माझा ‘सु’ संकल्प अभियान आणि करुणा सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटिझमग्रस्त रुग्णांसाठी मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचे आयोजन येत्या २६ एप्रिल, रोजी म्हैसूर ऑडिटोरियम, किंग्स सर्कल समोर, माटुंगा ईस्ट येथे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना मेडिकल हेल्प सेल चे प्रमुख मंगेश चिवटे व इतर डॉक्टर पालक उपचार मुक्त रुग्ण पालक उपस्थित होते.

वाहन चालक मालकांच्या अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले जाते अशा अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार राज्यामध्ये सोशल मिडीयावर आपण सर्व पहात आहोत. गाडी खाली असतानासुध्दा ऑनलाईन नाहक चलन टाकला जातो. राज्यातील शहरी भागामध्ये वाहतुक पोलिस शुल्लक कारणावरून वाहन चालकांकडून मोठया प्रमाणात पैसे वसुली करतात. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर टोल नाक्याच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने लुटमार चालू आहे असे डॉ एल एच पाडुळे यांनी सांगितले. राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवीन धोरण तयार करणे. वाहन चालकांच्या अपघाती मृत्यु पश्यात त्याच्या परिवारास मदत म्हणून तात्काळ १० लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावे. राज्यातील सर्व महामार्गावर प्रती १०० किलोमीटर अंतरावर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती गृह बनवावे. महाराष्ट्र राज्य सरकारने वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. अशी मागणी त्यांनी केली.

पनवेलमध्ये लेन्सकार्टचा निषेध आणि आंदोलनाचा इशारा

पनवेल(प्रतिनिधी)-  लेन्सकार्ट  कंपनीच्या काही शाखांमध्ये कार्यरत हिंदू कर्मचाऱ्यांवर त्यांच्या धार्मिक आचरणांबाबत निर्बंध घातले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, काही शाखांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू, टिळा, गंध लावण्यास तसेच हातावर धार्मिक दोरा धारण करण्यास मनाई करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी हिंदू सण साजरे करण्यावरही बंधने घालण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो भारताच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. या संदर्भात नवीन पनवेल युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष मयूर कदम यांनी पनवेल येथील लेन्सकार्ट व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, भारत हा विविध धर्मांचा देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार व धार्मिक परंपरांनुसार आचरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कंपनीकडून विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालणे हे अयोग्य व निषेधार्ह आहे. म्हणूनच, संबंधित प्रकार तात्काळ थांबवून कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची हमी द्यावी. या संदर्भात कंपनीकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास नवीन पनवेल युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेन्सकार्ट व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. यावेळी मयूर कदम यांच्या समवेत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ड्रग्स प्रकरणानंतर टिटवाळ्यात सुरक्षेचा विषय गंभीर

 नागरिकांची पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी कल्याण : टिटवाळा परिसरात अलीकडे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (एम.डी.) प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी एकत्र येत टिटवाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर राबवण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करताना ॲड. अविनाश शिळकंदे (उच्च न्यायालय वकील व उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना), दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके व रोहित जोशी उपस्थित होते. याआधी पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक करत मोठी कारवाई केली होती, ज्याचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र त्यानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेटमुळे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टिटवाळा परिसर झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणात नवीन रहिवासी येथे स्थायिक होत आहेत. मात्र भाडेकरू आणि नव्या रहिवाशांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे होत नसल्याने संशयास्पद हालचालींना खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने काटेकोर पडताळणी यंत्रणा राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सखोल कोंबिंग ऑपरेशन राबवून ड्रग्स विक्री व पुरवठा साखळी मोडीत काढण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक भाडेकरूची अनिवार्य पोलीस पडताळणी, सोसायट्यांनी रहिवाशांची संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिक-पोलीस समन्वय वाढवणे या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. टिटवाळ्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ठोस आणि प्रभावी कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.