Category: मुंबई

Mumbai news

लाडक्या बहिणींना काँग्रेस दोन हजार रुपये देणार !

सांगलीत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची घोषणा सांगली : महाराष्ट्रातील बहीणींवर सगळ्याच राजकीय पक्षांना प्रेमाचे भरते आले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आज थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री…

शिल्पकार आपटेच्या मुसक्या आवळल्या

कल्याणमधिल घरून अटक पाच दिवसांची पोलिस कोठडी राजन चव्हाण मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधिल राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी फरार असलेला वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेच्या…

कॅबिनेटमध्ये ‘एकच वादा’वरून लाडक्या बहीणींचे ‘भाऊ’ भिडले

स्वाती घोसाळकर मुंबई : लाडकी बहीण कुणाची यावरून सध्या महायुतीत जोरदार श्रेयवादाची लढाई सुरु आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळून ‘माझी…

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची बॅडमिंटन स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी!!

मुंबई : विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन मुले बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच के एम अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठाणे विभागातील ३३ महाविद्यालयातील तब्बल २०१…

तर अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल  –  अण्णासाहेब कटारे

रमेश औताडे मुंबई : सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती-जमाती मध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वाद होतील व अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल असे मत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देशातील प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र  आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी अण्णासाहेब कटारे यांनी  केली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे . मुंबईमध्ये पक्षाची ताकत भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केला.

 नंदिनी, अमृता, श्रेयश, तन्मय, गणेश, दिनेश ठरले सर्वोत्तम लिफ्टर

जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप स्पर्धा मुंबई : पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप या स्पर्धेत नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे, दिनेश पवारने अनुक्रमे आपापल्या गटात सर्वोत्तम लिप्टरचा मान मिळवला. रॉयल गार्डन, मुद्रे, कर्जत येथे सदर स्पर्धा पार पडली. सुधाकर परशुराम घारे (माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा  समिती रायगड जिल्हा परिषद,) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने ही स्पर्धा आयोजित केली होती.  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले. या स्पर्धेच्या क्लासिक सब ज्युनिअर मुलींच्या गटात नंदिनी उपर .(बॉडी लाईन जिम खोपोली), जूनियर मुलींच्या गटात अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब, खोपोली) ह्या “किताब विजेत्या झाल्या. सब ज्युनिअर क्लासिक मुलांच्या गटात श्रेयश जाधव (आयर्न मॅट जिम, खोपोली), जूनियर मुलांच्या गटात तन्मय पाटील (संसार जिम, पेण), सीनियर क्लासिक पुरुष गटात गणेश तोटे (फिट ऑन जिम, पनवेल) आणि मास्टर्स (४९,५०,६०, आणि ७० वर्षावरील स्पर्धक) स्पर्धेत दिनेश पवार (स्पार्टन जिम, लौजी खोपोली) हे किताब विजेते ठरले. सांघिक विजेतेपद जी व्ही आर जिम, कर्जत यांना मिळाले. उप विजेतेपद हनुमान व्यायाम शाळा, पेण यांनी पटकावले तर तृतीय क्रमांक बॉडी लाईन जिम, खोपोली यांना मिळाला. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि सचिव अरुण पाटकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेत मुंबईचे गोपीनाथ पवार, सुरेश धुळप,  जितेंद्र यादव, अंकुश सावंत, प्रशांत सरदेसाई, साहिल उतेकर, पुण्याचे विजय पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. 0000

 डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व दै.लोकमत संचलित ’गणेश दर्शन स्पर्धा २०२४’ चा

 शालेय विद्यार्थ्यांच्या गणेश मूर्ती वर्कशॉपने  श्री गणेशा… मुंबई : ४ सप्टेंबरला डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व दै.लोकमत संचलित गणेश दर्शन स्पर्धेचा श्री गणेशा संपन्न झाला. ठाण्याच्या कोरम मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांचे…

पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांना दिला वेग

रस्ते, वाहतूक, रुग्णालय, एसआरए प्रकल्प, पाणीपुरवठ्याचे प्रश्न लागले मार्गी राजेंद्र साळसकर मुंबई : उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी बोरिवली येथे व्यापक आढावा बैठक घेतली. दोन तासांच्या मॅरेथॉन सत्रात बीएमसी, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासह विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोयल यांनी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि निर्धारित मुदतीत ते पुर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि एसआरए, म्हाडाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली. मुदत देताना काळजी घ्या खासदार पियूष गोयल यांनी अधिकाऱ्यांना मुदत निश्चित करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. प्रकल्पातील गुंतागुंत मलाही समजते. कृपया मला फसवू नका. येत्या सणासुदीच्या काळात जनतेला त्रास देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भगवती रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ऑक्टोबरच्या अखेरीस रुग्णालयाचा पहिला सहा मजला सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. पुनरावलोकन केलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे- भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास: परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. कोस्टल रोड भाईंदरपर्यंत अपूर्ण एसआरए प्रकल्प: देवीपाडा आणि इतर भागात जेथे काम रखडले आहे अशा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मढ-वर्सोवा पूल बांधकाम: कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प. चारकोपमधील एफएसआय शुल्क: चारकोपच्या सेक्टर ८ आणि ९ मधील एफएसआय शुल्कांवर चर्चा आणि निर्णय. नवीन पाणी पाइपलाइन: उत्तर मुंबईत पुरेसा पाणीपुरवठा होईल याची दक्षता घेणे. आकुर्ली ब्रिज अपडेट: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुलाच्या बांधकामाची प्रगती. कोस्टल रोडचा भाईंदरपर्यंत विस्तार: मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या विस्तारामुळे रस्ते संपर्कात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अतिरिक्त विषयांमध्ये दहिसर चेकनाका पार्किंग झोन, कौशल्य विकास केंद्र आणि ३७ एकर जागेवर सुविधा निर्माण करण्यात येतील. दहिसर टोलनाका स्थलांतरित करणे, तलावांचे गाळ उपसणे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि एक पेड माँ के नाम अभियान या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली. उत्तर मुंबईसाठी गोयल यांची बांधिलकी बैठकीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना पियूष गोयल म्हणाले, उत्तर मुंबईचे उत्तम मुंबईत रूपांतर करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. आम्ही ‘संपूर्ण सरकार’ विकासाच्या जवळ जात आहोत. शिक्षण, क्रीडा, गृहनिर्माण किंवा वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये योगदान दिल्याचा मला सन्मान वाटतो. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका घेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, त्यामुळे समन्वय आणि सर्वांगीण नियोजन, जलद निर्णय घेणे आणि संसाधनांचे पूर्ण ऑप्टिमायझेशन एका व्यासपीठावर सुधारते ज्यामुळे अडथळे दूर करण्याचा मार्ग मोकळा होतो. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सर्व आमदार यांनी वर्षानुवर्ष केलेले प्रयत्न आणि सखोल अभ्यास यावर मी सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून सर्व मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या नंतर आपापल्या मतदारसंघाचे सर्व महत्वपूर्ण  निर्णयाबद्दल उपस्थित आमदार आपण सर्वांना माहिती देतील. केंद्रीय मंत्री खा.पियूष गोयल आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.…

घरगुती गणेशोत्सवावर अयोध्येतील राममंदिराचा प्रभाव

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घराघरांतील तयारीही अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत सर्वांमध्ये उत्साही वातावरण होते. त्यामुळे श्री रामाच्या रूपातील गणेशमूर्ती…

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५…