Category: मुंबई

Mumbai news

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ  रमेश औताडे मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार  दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख मृत्यू हृदयरोगामुळे होतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ . कौशल छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली. जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “ हार्टस्ट्राँग ” हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. ३१ वर्षीय एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. तो दिसायला फिट असतानाही हा प्रकार घडला. “फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे,” असा महत्त्वाचा संदेश ते देतात. रुथ अँड सोशल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अजित पवारांचा घातच झालाय

अजित पवारांचा घातच झालाय एअर हॉस्टेस पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप  वैमानिकाला उशीर व्हायला मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?”  शेवटच्या क्षणी वैमानिकच नव्हेतर विमानही बदलले मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात हा घातच होता असा आरोप आमदार आणि अजित…

खुशखबर ! जमिनीसाठी ‘एन.ए.’ गरज नाही

खुशखबर ! जमिनीसाठी ‘एन.ए.’ गरज नाही मुंबई : शेतजमिनीवरील बांधकामासाठी ती बिगरकृषी म्हणजेच एन.ए ( नॉन अग्रीकल्चर) करून घेण्याची आता गरज नाही. राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठं बदल करण्यात आलाय. आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र…

मुंबई, ठाण्यात महिला राज

मुंबई, ठाण्यात महिला राज स्लग- मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे भाजपाच्या पहिल्या महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर ० ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या  शर्मिला पिंपळोलकर महापौर तर भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर ० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर-उपमहापौरांना दिल्या…

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर…

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले. प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते. पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२ अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-० महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३ मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८

  अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम!

कै. उमेश शेणॉय स्मृतीप्रित्यर्थ पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धा-२०२६ अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम! क्रीडांगणाला ‘अजितदादा पवार क्रीडा नगरी’ नाव शुक्रवार पासून रंगणार खो-खो क्रीडा जल्लोष मुंबईतील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच! अमर हिंद मंडळाच्या वतीने, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ डायनॅमिक प्रायोगिक व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. वेग, डावपेच, चपळाई आणि व्यावसायिक दर्जाचा थरार अनुभवण्यासाठी ही स्पर्धा क्रीडारसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’चे नामकरण या प्रतिष्ठित स्पर्धाकालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणाला ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणामुळे स्पर्धेला अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असून, क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची नोंद होणार आहे.…

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे  अनिल ठाणेकर मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

  भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात

भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात उरण येथे जनजागृती १५ तारखेला रथयात्रेचे आयोजन मुंबई : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर सचिव प्रकाश कांबळी, खजिनदार शलाका पांजरी…

अजितदादांच्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

अजितदादांच्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या ३ महत्वपुर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत…