Category: मुंबई

Mumbai news

मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री…

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी २४ तारखेला असलेल्या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मुझप्पर हुसेन यांनी केले आहे. मीरा भायन्दर पत्रकारांशी वार्तालाप करत असतान ते बोलत होते.कायद्याचा कोणताही…

कर्जमुक्ती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत अटक

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन करताना शेतकऱ्यांना मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. शेतकरी नेते रविकात तुपकर यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनाही अटक करून किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर सुटका केली. पोलिसांना चकमा देत शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे काही शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा  बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन  मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु मरीन ड्राईव्ह परिसरात  पोलिसांनी रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या व सरकारच्या या भूमिकेविषयी यापुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 0000

टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांची फेरनिवड

मुंबई : टांकसाळ मजदूर सभेची वार्षिक सर्वधारण सभा टांकसाळमध्ये पार पडली. या सभेमध्ये संघटनेची नवीन कार्यकरिणी बिनविरोध निवडण्यात आली. यात टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के.…

नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या केंद्राविरुद्ध लढावे लागेल! – पृथ्वीराज चव्हाण

राजेंद्र साळसकर मुंबई : कामगार कायदे गुंडाळताना कुणाशी चर्चा नाही की संवाद नाही,  कामगार नको आहेत.  पण उद्योगपती हवे आहेत. केंद्र सरकारने संमत केलेले, कामगार हिताविरोधी चार कोड बिल राज्यात लागू करण्याचा डाव‌ महायुती सरकारचा आहे, तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे सरकार येणार नाही,याची काळजी कामगार वर्गाला घ्यावी लागेल,असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे कामगारांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना दिला. राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने संघटनेचे‌ आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११७ वी जयंती नुकतीच परेल च्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली‌.या प्रसंगी गं.द.आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागतपर भाषण केले. माथाडी कामगार कायदा दुरुस्ती विधेयक मांडणारे हे राज्य सरकार केंद्राने संमत केलेल्या चार श्रम संहिता राज्यात लागू करण्याचा मोका शोधू पाहत आहे.देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश‌‌ विकसित देशांच्या पंक्तीत असेल,असे दिवा स्वप्न दाखविणा-या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चालीविरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल, असे‌ आवाहन‌ राज्याचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कामगार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, मुंबई मधील कामगारांना एक लाख ४० हजार घरे देण्याचे धाडस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविले आहे.परंतु राज्याच्या महायुती सरकारने मागील सरकारने सोडतीत लागलेल्या घरांच्या चावी वाटपापलीकडे काहीच केलेले नाही. या सरकारने सत्तेवर आल्यापासून एकाही कामगारासाठी नवीन घर बांधलेले नाही. यापूर्वी मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या एनटीसीद्वारे चालविण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीचा निर्णय घेतला.परंतु आताचे केंद्र सरकार देशातील बंद पडलेल्या एनटीसीच्या २३ गिरण्या चालविणे आमचे काम नाही,असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.केंद्र सरकारने कोविडचे कारण पुढे करून चालू असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या बंद केल्या आहेत.आम्ही या प्रश्नावर  राष्ट्रीयस्तरावर लढा उभा केला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात,संघटनेने अमृत महोत्सवी वर्षाची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल.केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांना‌ श्रमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आजाराच्या कारणास्तव ते समारंभाला आले नाहीत. मानाचा गं.द.आंबेकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कॉंग्रेस कामगार नेते भाई जगताप यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कारखाने आणि आस्थापनातील कामगार १)(सिन्नर) येथील रिंग प्लस ऍक्वा कंपनीतील कामगार (सिटु) हरिभाऊ बाळाजी तांबे यांनी कामगार चळवळीतून,२) व्हीव्हीएफ इंडिया कंपनीतील कामगार सामाजिक क्षेत्रातील निस्पृह कार्यकर्ते दिलीप गणपत‌ खोंड (मुंबई) यांना सामाजिक क्षेत्रातून,३) पाच‌ कथा संग्रह प्रसिद्ध असलेले महिंद्रा मधील कामगार लेखक विलास पंचभाई (नाशिक) यांना साहित्यातून, ४) सरकारी आस्थापनातील‌ लिपीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू नेहा मिलिंद साप्ते यांना (मुंबई) क्रीडा क्षेत्रातून,५) विविधांगी कलेने सुपरिचित असलेले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कामगार संतोष दत्ताराम शिंदे (रत्नागिरी) यांना कला‌ क्षेत्रातून आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव विजेते कॉंग्रेसनेते आमदार भाई जगताप यांचेही यावेळी भाषण झाले. डॉ.शरद सावंत,राजेंद्र गिरी,प्रदीप मून,काशिनाथ माटल यांनी पूरस्कार निवड समितीचे काम पाहिले.गं.द.आंबेकर जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाटचालीवर एक माहितीपूर्ण चित्रफीत प्रकाशित करण्यात आली.या औचित्याने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गिरणी कामगारांच्या मुलांचा “आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे,रामिम संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक

मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी गणेशमूर्ती मातीची असावी अशा आग्रहाखातर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली. मात्र, मूर्तीकारांचे नुकसान होत असल्याचे कारण देत या निर्णयाला…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे वाढतोय गणेशभक्तांचा कल

मुंबई : भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. त्यामुळेच देश-विदेशातील श्रीगणेशोत्सवाची सजावट करताना कटाक्षाने प्लास्टर ऑफ पॅरिस अथवा थर्माकोलचा वापर टाळला जात असून त्याला पर्याय म्हणून पुठ्ठ्याच्या कागदापासून मखर…

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींनी घेतला नाटयप्रयोगाचा विशेष अनुभव

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असताना या कामात स्वच्छताकर्मींचे महत्वाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सेवाभावी कामाप्रती…

सरकारी कर्मचारी संघटनेची ‘द्वार सभा’

रमेश औताडे   मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि बृहन्मुंबई राज्य सरकारी संघटनेने दिलेल्या संपाच्या हाकेनुसार २९ ऑगस्टच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मिनिस्ट्रियल स्टाफ असोसिएशन आरोग्य सेवा  आयुक्तालय मुंबई आरोग्य भवन येथे द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे अध्यक्ष संजय मंडले, कोषाध्यक्ष विजय पोस्टूरे तसेच बृहन्मुंबई जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या महिला संघटक कविता ठोंबरे, जी एस टी संघटनेचे संतोष सरवदे उपस्थित होते. यावेळी संजय मंडले यांनी बेमुदत संपाची पार्श्वभूमी सांगत एन पी एस  NPS धारकांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चळवळ जाणून घेणे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्त्वाच्या आदेशाचे पालन करुन संपात १००% सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या संपामुळे जे लाभ मिळणार आहेत ते मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न संपाच्या माध्यमातून करुया तसेच उर्वरित लाभासाठी पुन्हा संघर्षाची तयारी ठेवावी लागली तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवा असे मत व्यक्त केले. तर कविता ठोंबरे यांनी विस्तृतपणे संपामध्ये मिळवलेल्या सर्व बाबींची मांडणी केली. महिला वर्गांनी सुद्धा नेहमीप्रमाणे याही संपामध्ये १०० टक्केसहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करुन संघशक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन केले. द्वारसभेच्या दरम्यान, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष विलास तरटे, उपाध्यक्ष  जितेंद्र नागवेकर व सचिव  बाबासाहेब साळवे इतर पदाधिकारी आणि आरोग्य भवन विभागातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. ०००००

सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सीसीटीव्हीची बसविल्याची खातरजमा करा- अमीत साटम

मुंबई: राज्याच्या विविध भागात महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अंधेरी (पश्चिम) येथील भाजपचे आमदार अमीत साटम यांनी झोन-९ चे पोलीस उपायुक्त राज टिळक रौशन यांना पत्र लिहून बीएमसी, शासन अनुदानित, ICSE आणि…