Category: मुंबई

Mumbai news

‘दलित संघटनांचे एकता धरणे ‘!

२१ ऑगस्टला आझाद मैदानात अनुसूचित जातींचे उप वर्गीकरण   मुंबई, : अनुसूचित जाती, जमातींचे उप वर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाच्या निषेधार्थ उत्तर भारतातील अनेक दलित संघटनांनी येत्या बुधवारी  २१…

 उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प ,रस्ते कामे मार्गी लागणार

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची ग्वाही कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार राजेंद्र साळसकर     मुंबई : मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गणेश खणकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. गोयल यांनी सांगितले की,या बैठकीमध्ये कांदिवली येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 20-25 वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मार्ग आजच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होणार आहे असेही गोयल यांनी नमूद केले. गोयल यांनी सांगितले की उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे.बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत अशी माहिती गोयल यांनी दिली. कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या 6-8 महिन्यांत सेवेत रुजू होईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली.या बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. मुबईकरांची वाहतुकीची समस्या सोडवून जीवन सुखकर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. आकुर्ली पश्चिम द्रूतगती मार्गावरील अंडरपासचे काम रखडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ते काम येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली. सहपोलीस आयुक्तांशी चर्चा करून वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची विनंती करून एक सर्वसमावेशक योजना तातडीने आखली जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याच्या दिशेने रखडलेल्या गृह आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए) नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करून घेणार असल्याची माहितीही गोयल यांनी यवेळी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मां के नाम’ या योजनेनुसार उत्तर मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेतर्फे एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. 0000

10 प्रातिनिधिक युवा लाभार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी लाभ

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेत निवड झालेल्या नवी मुंबई : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली असून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,…

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार प्रशासन लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्याची पार्श्वभूमी आहे. या संकल्पनेनुसार शासन आणि प्रशासन सदैव लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येथील जिल्हा…

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची बँकेबाहेर गर्दी; पैसे मिळाल्यानं आनंद !

भिवंडी- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भिवंडी शहरातील अजूनही…

नवी मुंबई येथे धुरकट वातावरण, रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषण पुन्हा सुरू !

नवी मुंबई : पावसाळ्यात पावसाच्या शिडकाव्याने वातावरण स्वच्छ होते, मात्र आता पावसाची उघडीप सुरू असून वाशी सेक्टर २६ येथे पुन्हा धुरकट वातावरण पसरून दर्प वास सुटला होता. त्यामुळे एमआयडीसीमधील रासायनिक…

संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

रमेश औताडे   मुंबई : गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेने नवी मुंबईत एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले…

शिवसेना उपनेते व आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मुन्नाभाई यांचे सहकार्य दीपक शर्मा, अनिल शर्मा, शिवा सिंग, विशाल बाबू आणि संजय सुतार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा आणि फ्रेम…

मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वरळी सीलिंग भारतीय ध्वजाच्या तिरंग्यात उजळून निघाला होती.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील १७ पोलिसांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले…