Category: मुंबई

Mumbai news

सायनमध्ये १ ऑगस्टपासून ट्रॅफीक जाम !

 शीव उड्डाणपूल वहातुकीसाठी बंद मुंबई : येत्या एक ऑगस्टपासून आपण मुंबईच्या दिशेने येणार असाल तर सायनला टाळा. कारण एक ऑगस्टपासून येथे ट्रॅफीक जाम होणार आहे. शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे. या…

 स्वच्छता कार्याचे पुणे पूरग्रस्तांकडून प्रशंसात्मक आभार

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने केलेल्या     नवी मुंबई : पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत. पुणे येथे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे 115 जणांचे पथक तयार केले व त्यांना 2 जेटींग मशीन व आवश्यक स्वच्छता साधनांसह शनिवारी सकाळी एनएमएमटीच्या 2 बसेसने पुण्याकडे रवाना केले. त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, नितीन महाले, नवनाथ ठोंबरे व विजय काळे यांच्यासह साफसफाई कामाचे नियोजन केले व सोबतच्या 2 स्वच्छता पर्यवेक्षक आणि 100 हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरही त्याठिकाणी फवारण्यात आली. या पथकाने ज्या आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केले त्याची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे. 00000

 झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!

अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!     मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झालेले नाही. उलटपक्षी ज्या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्यात आली आहे, त्यानुसारच चटईक्षेत्रफळ वितरित करण्यात आले असून ते योग्य आहे, अशी भूमिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नगर विकास विभागाला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचे कायदेशीर मत सोबत जोडले आहे. अशा १८ योजनांना पालिकेकडून याआधीच अभय मिळाले असले तरी भविष्यात अशा योजना मंजूर करावयाच्या किंवा नाही, याबाबत संदिग्धता असल्यामुळे अनेक योजना प्रतीक्षेत आहेत. झोपु योजनांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत ३३(१०) अशी तर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण सदनिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या नियमावलीत ३३(११) ही तरतूद आहे. यासाठी झोपु प्राधिकरण नियोजन यंत्रणा आहे. या दोन तरतुदी वगळल्या तर इतर सर्व तरतुदींसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण असून यापुढे झोपु प्राधिकरणाने ३३(१२)(ब) (रस्त्यावर असलेले अतिक्रमण वा अडथळे दूर करुन संबंधितांना सामावून घेणे) तसेच ३३(१९) (व्यावसायिक वापर केल्यास पाच इतके चटईक्षेत्रफळ) या तरतुदींसोबत झोपु योजना संलग्न करू नयेत तसेच संलग्न केलेल्या योजना रद्द कराव्यात, असे पत्र झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या पत्राबाबत झोपु प्राधिकरणाने नगरविकास विभागाला स्पष्टीकरण करून आपला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नगरविकास विभाग काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ३३(१२)(ब) अंतर्गत पाच तर ३३(१९) अंतर्गत १३ झोपु योजना आतापर्यंत मंजूर झाल्या आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. प्राधिकरणाने या पत्रात म्हटले आहे की, ३३ (९) म्हणजे समुह पुनर्विकास वगळता कुठल्याही तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद आहे. या तरतुदीसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. उर्वरित तरतुदींसाठी कुठेही महापालिका आयुक्त असा उल्लेख नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. ३३(१२)(ब) या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याचे पत्र महापालिकेनेच पहिल्यांदा दिले होते. आताही महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडूनच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत झोपु प्राधिकरणाने माजी न्यायमूर्ती भोसले यांचे मत घेतले असून त्यांनाही महापालिका आयुक्तांना असे करता येणार नाही. फार तर याबाबत राज्य शासनाकडे दाद मागावी, असे भोसले यांनी म्हटले आहे.

सर्वेश जावळेचा वाढदिवस कायम स्मरणात राहील असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा

मुंबई : अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन साठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND (NAB) ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त…

देश उभारणीतील खाजगी क्षेत्राचा अत्यल्प सहभाग चिंताजनक

मुंबई : आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पावशतकापेक्षा अधिक काळ उलटला. याकाळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणार्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देश उभारणीच्या कार्यात दिलेले अत्यल्प योगदान निराशाजनकच…

 लघुवाद न्यायालयात ३२ प्रकरणे निकाली

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद     मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण २५४ पैकी ३२ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर, अतिरिक्त मुुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम व श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. न्यायाधीश एस. एन. गोडबोले, ए. जे. फटाले, वकील उषा गुप्ता, उज्वला घोडेस्वार यांनी लोकअदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक आर. के. हजारे, आर. के. कुळकर्णी आणि कर्मचारी वृंद यांनी केले. ०००००

 ‘खारफुटी पर्यावरणशील संवर्धन दिन’ साजरा

ऐरोली खाडीकिनारा स्वच्छ करत लोकसहभागातून   नवी मुंबई : युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात ‘खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून माझी वसुंधरा अभियानाचेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिना-यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून या विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख श्री.विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या खाडीकिना-याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले. ००००

नवी मुंबईत विविध विभागांत एकाच वेळी आठ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नो‍टीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ     मुंबई दि. 28. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी  शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 00000

रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद -पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.महिला बालविकास विभाग, रायगड अंतर्गत बालकल्याण समिती व पोलिस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण सन्मान सोहळा व ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बेलत होते. यावेळी कोकण मार्गदर्शक ऍडव्होकेट सीमा अदाते, बाल कल्याण समिती सदस्य डॉ गाणार, ऍड श्रीमती झेमसे,जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन जयवंत गायकवाड, कॅलिडा रिहॅबचे डॉ. प्रशांत, डॉ. संतोष पवार, डॉ. अक्षय पाटील उपस्थित होते. या वेळी बालकांच्या क्षेत्रात कायद्याला अनुसरून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन पोलीस अधीक्षक घार्गे व बालकल्याण समिती चे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे व सदस्य यांचे हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या प्रति काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करून बालकांप्रती काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा उत्साह निर्माण करणे. बालकांची जास्तीत जास्त काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेऊन बालकांचे पुनर्वसन करणे तसेच तनावाचे व्यवस्थापन करणे. यासाठी कॅलिडा रिहॅब सेंटर व भूमिका फाउंडेशन चे मोठे योगदान व मार्गदर्शन मिळाले. याबाबत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक करून बालकल्याण समितीला धन्यवाद दिले.या कार्यक्रमात बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड (कर्जत), राजेंद्र मायने (महाड), निवृत्ती बोराडे (माणगाव), श्रीमती प्राची पांगे, श्रीमती माधुरी घाडगे, श्रीमती वर्षा पाटील तर नवी मुंबईचे सुनील होलार, अभिजीत मोरे, दत्तात्रय पवार, संतोष पिलाने, श्रीमती प्रणिता भाकरे, श्रीमती सारिका बोराटे, रेल्वे पोलीस आदी उकृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल धुळे यांचा निरोप समारंभ करून उपस्थित संस्थेच्या व संपर्क बालग्रामचे विनायक पाटील,संपर्क बाल ग्रामचे खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे जि.प. जयवंत गायकवाड ,डॉ विशाल गाणार, ऍड आधाते ऍड झेमसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 00000