Category: मुंबई

Mumbai news

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत संदीप चव्हाण मुंबई:  स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारत रत्न किताब दिल्यास या किताबाची प्रतिष्ठा वाढेल अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त…

 गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेने सुरु केले विधायक कार्य मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार रमेश औताडे मुंबई : सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खत विक्रीसाठी वेगवेगळे परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाच बसतो. एकच राष्ट्रीय परवाना प्रणाली लागू झाल्यास देशभर एकसारखी, दर्जेदार आणि योग्य दरातील खते शेतकऱ्यांना सहज मिळू शकतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन पीक उत्पादन वाढावे, यासाठी खत व सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या धोरणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत  परिषदेत व्यक्त करण्यात आले. ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ही दोन दिवसांची परिषद झाली. परिषदेत बोलताना भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले की, शेतीची खरी ताकद माती, पीक आणि शेतकरी यांच्यात आहे. माती निरोगी नसेल तर उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे संतुलित खत वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी सांगितले की, सूक्ष्म खतांनी गेल्या अनेक वर्षांत पीक उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. शेतकरी, खत उत्पादक, बियाणे उद्योग आणि प्रक्रिया उद्योग यांनी एकत्र काम केल्यास शेती अधिक फायदेशीर होईल. सूक्ष्म खते, जैविक खते आणि विशेष खतांना जलद मंजुरी बनावट व निकृष्ट खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई चांगल्या दर्जाच्या भारतीय खतांच्या निर्यातीला प्रोत्साहन नियम सोपे करून शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवणे एकूणच, या शिखर परिषदेत शेतकऱ्यांना योग्य खत, योग्य वेळी आणि योग्य दरात मिळावे, तसेच शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी, यासाठी सरकार आणि उद्योगांनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश…

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप रमेश औताडे मुंबई: इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात…

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन रमेश औताडे मुंबई : कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन नामदेव ढसाळांच्या जयंतीदिनी रविवार १५ फेब्रुवारी रोजी नीलकमल लाॅन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे उद्घाटक असून,कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, महा.राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म.भा.चव्हाण हे परिसंवादप्रमुख असून कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष आहेत असे टाव्हरे यांनी सांगितले.साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,काव्यसंमेलन,गुणवंतांचा सन्मान   याचे आयोजन केले आहे. कनेरसर येथे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरे साहित्य संमेलन झाले होते. खेड येथे नामदेवराव ढसाळ यांचा जन्म झाला असून कनेरसर येथे शालेय शिक्षण झाले होते.ढसाळ हे मुंबई येथे उपजिवीकेसाठी गेले व तीच  त्यांची कर्मभूमी ठरली.साहित्य क्षेत्रात तसेच दलित पँथर च्या माध्यमातून त्यांनी अलौकिक योगदान दिले आहे.विश्व साहित्यिक म्हणून त्यांची गणना होते. भारत सरकारने नामदेवराव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता.विद्रोही कवी- लेखक म्हणून ढसाळांची गणना होते.गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले होते.हाडकी हाडवळा,मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे,गांडु बगीचा,तुही यत्ता कंची, मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले, या सत्तेत जीव रमत नाही,प्रियदर्शनी, खेळ व इतर विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली आहे. खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक,साहित्य प्रेमी यांनी ढसाळांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन टाव्हरे यांनी केले आहे.

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती अनिल ठाणेकर मुंबई, शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.  त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कोणतेही सोहळे, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार नाहीत. तसेच शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने त्या दिवशी कोणत्याही सोहळ्याचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन न करता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ  एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत, असे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ओला-उबरचा आज संप

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाइक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियनने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.  तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार…