Category: मुंबई

Mumbai news

केडीएमसीच्या वतीने ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी

 ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे. कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’  तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात  मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल. महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.

ठाण्यात विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न

००००००० ठाणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे…

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारानंतर राजकीय वातावरण तापले

 शिवसेना शिंदे व ठाकरे गट आक्रमक कल्याण : कल्याणमध्ये कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, “ही घटना कल्याण-डोंबिवलीसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.” दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “लाडक्या बहिणींच्या नावाने राजकारण केले जाते, पण महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली. या घटनेनंतर कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलचे उल्हासनगरमध्ये मेडिकल सेंटर सुरू

डोंबिवली, २१ जून : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने उल्हासनगर येथे नवीन फोर्टिस मेडिकल सेंटर सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. या केंद्रामुळे उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना…

एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आरती परब दिवा : एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात २० जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच मन एकाग्र व शांत राहते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने आणि प्राणायाम करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे एस. एम. जी. विद्यामंदिर प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन आनंददायी, उत्साहपूर्ण आणि आरोग्यदायी संदेश देणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Heading – कल्याण पुर्वेत केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल

 नाल्यातील कचरा जैसेथे असल्याने पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कल्याण : कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५० – ५० हाँटेलच्या मागून वाहणाऱ्या नाल्यामध्यील कचरा जैसे थे असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. या नाल्यामध्यील कचरा न काढल्याने तुंबापुरीचा फटका सखल भागातील घरांना बसु शकतो यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५०- ५० धाबा मागील बाजु एकवीरा अपार्टमेंट शेजारील नाला अद्यापही देखील कचरा आणि प्लास्टिक पिशव्या यांच्या गर्तेत सापडला असून यंदा १९ जून ओलांडलेले असले तरी पावसाचा तपास नाही. अशी परिस्थिती असताना लाखो रूपये नालेसफाईसाठी प्रशासन खर्च करते पंरतु ठेकेदाराने या नाल्यासंर्दभात दुर्लक्ष का केले आहे. की,पावसाची वाट पाहत पहिल्या पावसात नाल्यातील कचरा वाहून जाण्याची वाट पाहत आहे, असा आरोप यानिमित्ताने होत आहे. नाल्यातील कचरा  सफाई तसेच तळापर्यंत गाळ न काढल्यास या नाल्याच्या तुंबापुरीमुळे परिसरातील सखल भागातील घरामध्ये पहिल्या पावसात घरामध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी डोळसपणे या नाल्याची सफाई कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता, या नाल्याची यापूर्वी सफाई केली होती, नाल्यात अद्यापही देखील कचरा आणि स्वच्छता नीट झाली नसेल तर, नाल्याची स्वच्छता संदर्भीत एजन्सी मार्फत करून घेणार असल्याचे सांगितले. ००००००००००

 ट्रान्सफॉर्मरमुळे उद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ

विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा अनिल ठाणेकर ठाणे : उद्यानात लहान मुले खेळत असतात, तर वयोवृध्द नागरिक फेरफटका मारत असतात, या कारणांमुळे वर्तकनगर येथील उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांच्या आदेशाला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवत एमएसईबीला परवानगी दिली आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त असून काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी `काम थांबवा’ अन्यथा २३ जून रोजी पालिका मुख्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत भीमनगर येथील बिल्डिंग नं. ५४ च्या पाठीमागे ठाणे महापालिका निगा व देखभाल करत असलेले म्हाडाचे उद्यान आहे. एमएसईबीने या उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्याची विनंती केल्यानंतर म्हाडाने ठाणे मनपाकडे `ना हरकत पत्र’ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला होता. उद्यानाच्या जागेत असलेले मंदिर तसेच प्रवेशद्वाराकरीता जागा उपलब्ध नसलयाने आणि ट्रन्सफोर्मर मधून स्पार्क किंवा शार्ट सर्किट सारखी दुर्घटना घडल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, या कारणांमुळे उपायुक्तांनी ना हरकत प्रमाण पत्र देऊ नये असे स्पष्ट केले होते, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे. उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत बांधकाम खात्याचे किरण भोये, संदीप गायकवाड, रणधीर राणे, सुधीर गायकवाड, शहर विकास विभागाचे रविशंकर शिंदे यांनी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबरोबरच उद्यानही म्हाडाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. लहान मुलांच्या जीवशी खेळणाऱ्या  या अधिकाऱ्यांचा विक्रांत चव्हाण यांनी निषेध केला असून या  अधिकाऱ्यांच्या निलंबासाठी व ट्रन्सफोर्मर  बसवू नये या मागण्यांसाठी  २३ जून पासून पालिका मुख्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिला आहे. 0000000000

 संवेदनशील कल्याणकराने सुरू केलीय माणुसकीची नवी चळवळ ‘हॉस्पिटल लिफाफा’

 मुकुल गरे यांचा हृदयस्पर्शी उपक्रम कल्याण :  लग्नसमारंभात आपण आनंदाने जातो. मंडप सजलेला असतो, सनईचे सूर घुमत असतात, नवदांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अशा वेळी आपण खिशातून लिफाफा काढतो आणि…

 कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला

 वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा  हिंदु जनजागृती समितीची मागणी कल्याण : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात ‘भारतीय बालरोग अकादमी’ द्वारे लहान मुलांच्या पूरक आहार पत्रकात ‘गोमांस’  खाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि शासनाने गोमातेला ‘राज्य माता’ घोषित केले असतांना सरकारी रुग्णालयात असा बेकायदेशीर प्रचार करणे हा कायद्याचा भंग व शासनाचा थेट अवमान आहे. याप्रकरणी दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुनील पवार यांनाही दिले आहे. हे निवेदन रवींद्र नलावडे, अशोक सावंत, गोविंद प्रसाद दुबे यांनी सुपूर्त केले. या निवेदनाची प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकड़ेही पाठवली आहे. हिंदु धर्मीय जनमानसात गाईला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असून गोहत्येला महापातक मानले गेले आहे; तसेच आईचे दूध न मिळणाऱ्या बालकांसाठी गोमाता हीच दुसरी माता असते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर कोवळ्या बालकांना गोमांस खाण्यास प्रवृत्त करणारी ही विकृत धारणा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. आज एकीकडे पाश्चात्य देश भारतीय वंशाच्या देशी गाईंचे महत्त्व ओळखून मानसिक शांतीसाठी ‘काऊ थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्याच देशातील गीर, साहिवाल आणि देवणी यांसारख्या दुर्मिळ प्रजातींची संख्या घटत आहे. अशा स्थितीत भारतातील एका जबाबदार आरोग्य संस्थेकडून गोमांस भक्षणाला छुपे प्रोत्साहन दिले जाणे हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर गैरप्रकाराचा जाहीर निषेध करत हिंदु जनजागृती समिती प्रशासनाकडे ही आग्रही मागणी करत आहे की, भारतीय बालरोग अकादमी  या संस्थेवर आणि वाशी महानगरपालिका रुग्णालयातील ज्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या विघातक पत्रकाला परवानगी दिली, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच नवी मुंबई क्षेत्रातील व राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून ही विवादास्पद व आक्षेपार्ह पत्रके तात्काळ जप्त करून ती नष्ट करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात यावेत. प्रशासनाकडून यावर वेळेत आणि ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही घनवट यांनी दिला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी

 शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचे केडीएमसी आयुक्त, महापौरांना पत्र कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही बांधकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामांना आवश्यक परवानग्या आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे.  तसेच ही बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आणि बांधकामांच्या वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मासिक महासभेमध्ये नगरसेवक मंदारं हळवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अनधिकृत बांधकाम व अनागोंदी कारभाराबाबत तहकुबी ठेवलेली होती. या तहकुबी मध्ये दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचे मुख्य कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचा अंधाधुंदी कारभार व अनधिकृत बांधकाम. या तहकुबी मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामाबाबत नगरसेवक रोहन कोट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बाजार समितीच्या मंजूर नकाशामध्ये ८-४ येथे २० व्यापारी गाळ्याचे बांधकाम चालू आहेत. प्रत्यक्षात कृ. उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ३० जानेवारी २०२४ येथे २० गाळे बांधण्याचा ठराव करण्यात आला व त्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी २० दुकाने प्लस, १८ ऑफिस अशी घेण्यात आली. हे कोट यांनी पिठासन अधिकारी, आयुक्त व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगर रचना विभागात माहिती घेतली असता संचालक मंडळाचा ठराव बांधकाम घेताना नगर रचना विभागाला दिलेला नाही. नगर रचना विभागाकडून ही बांधकाम परवानगी कोणत्या अधिकारात देण्यात आले याचा अहवाल येणाऱ्या महासभेच्या २ दिवस आधी देण्याची मागणी रोहन कोट यांनी केली आहे. तसेच हा विषय गंभीर असून या प्रकरणाची आपण कसून चौकशी करावी व ही बांधकाम परवानगी रद्द करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी नगरसेवक रोहन कोट यांनी केली आहे.