Category: मुंबई

Mumbai news

मिरा -भाईंदरकर नागरिकांवर पाणीटंचाई आणखी तीव्र

 एमआयडीसीची १० टक्के, तर स्टेमचीही २० टक्के पाणीकपात मिरा -भाईंदर :पावसाने ओढ दिल्याने शहरातील नागरिकांसाठी पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एमआयडीसीकडून १० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता स्टेम प्राधिकरणानेही २० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. ही कपात २४ जूनपासून लागू होणार असून त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने मे महिन्यात १० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानुसार एमआयडीसीकडून मिरा-भाईंदरला होणारा पाणीपुरवठा महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी स्टेम प्राधिकरणाने कोणतीही कपात लागू केली नव्हती. आता स्टेमने २० टक्के पाणीकपात जाहीर केल्याने शहरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात वगळण्याची आहे. या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरा-भाईंदरला पाणीकपातीमधून मागणी केली होती. मात्र, ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. सध्या एमआयडीसीच्या १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना दर ४२ तासांनी पाणीपुरवठा केला जात आहे. स्टेमच्या नव्या २० टक्के कपातीनंतर हा कालावधी ४२ तासांवरून तब्बल ५५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी अधिक हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.

१९ वर्षांच्या रुद्रप्रताप पांडेचा मुंबईत धमाका

 ६५० किलो लेग प्रेस करून रचला नवा जागतिक विक्रम! राजेंद्र साळसकर मुंबई-द्द,अफाट शारिरीक ताकद आणि कधीही न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मुंबईच्या एका १९ वर्षांच्या तरुणाने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला…

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश

ठाणे- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला.…

आदिवासींच्या प्रश्नांवर अंबरनाथ तहसीलदारांची तीन तास चर्चा; पाणीटंचाईसह विविध समस्यांवर निर्णय

००००००० ठाणे : आदिवासी कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तहसीलदार अमित पुरी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी…

बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला सिटूचा जाहीर पाठिंबा

ठाणे- मुंबईकरांना वाहतुकीची अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक बेस्ट उपक्रमाच्या आजी, माजी व वेटलीज कामगारांनी केवळ आपल्या आर्थिक मागण्यांसाठीच नव्हे तर अत्यावश्यक सार्वजनिक बेस्ट सेवेचे अस्तित्व टिकविण्यासाठी, बेस्टच्या मालकीच्या बसेसचा ताफा…

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

ठाणे : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यातील एकल महिला,…

संपूर्ण मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे आणि ती अविरत चालवणारा प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुंबईचा कणा आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते आमदार सुनिल प्रभु यांनी दिंडोशी बस आगाराला भेट दिली आणि तिथे उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्या बेस्ट कर्मचाऱ्यांची व कामगार प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, त्यांच्या अडचणी आणि त्यांना भेडसावणारे विविध शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न प्रत्यक्ष समजावून घेतले. मुंबईकरांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजीव साबडे यांच्या ‘खाऊगल्ली’ या पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांच्या ‘खाऊ गल्ली’  पुस्तकाचे लज्जतदार प्रकाशन बुधवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (रवींद्र नाट्य मंदिर) होणार आहे.…

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे…

दादर येथे साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष…