Category: मुंबई

Mumbai news

‘फोर बीन ठाणे क्लीन’चा या उपक्रमाचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ (Solid Waste Management Rules 2026) प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्यावर प्रभावी प्रक्रियेबाबत (Capacity Building) घनकचरा…

जागतिक योग दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात योगाभ्यास

ठाणे : जागतिक योग दिनानिमित्त रविवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास केला. यावेळी योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य कसे राखता येते याबाबत…

“सकल आदिवासी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला मदत

कल्याण : ‘सकल आदिवासी संस्था’ तालुका कल्याण, यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, पालीवली येथे सदिच्छा भेट देण्यात आली. सकल आदिवासी संस्थेच्या संस्थापिका तथा सचिव योगिनी कोसराबे, अध्यक्षा सुचिता बारापात्रे, कोषाध्यक्ष…

देशातील मोठ्या लोकसंख्येला मधुमेहापासून वाचवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात – ओम प्रकाश शर्मा

०००००००००० ठाणे, मधुमेह शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वेगाने पसरत असून, ही एक गंभीर समस्या बनत आहे. मधुमेहाच्या प्रतिबंधाबद्दल जनजागृती करणे, उपचार करणे आणि औषधांचे वाटप करणे यासाठी १५ वर्षांपासून कार्यरत…

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे ठामपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ठाणे- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.…

श्रेयस जायभाये, रितू सर्वोत्तम जगताप

– स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिर मुंबई :   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिक सहाय्यक केंद्र संचलीत ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळातर्फे झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिरात शालेय लहान गटात श्रेयस…

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीत महेंद्रशेठ यांचे महत्त्वाचे योगदान: रामशेठ ठाकूर

महेंद्रशेठ घरत यांचे बॅडमिंटनसाठी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व उलवे, ता. २० : “महेंद्रशेठ घरत हे गेली अनेक वर्षे कामगारांसाठी उत्तम काम करीत आहेत. आता तर जागतिक पातळीवर कामगारांच्या हक्कासाठी लढतोय. त्याने उत्तम फिटनेस राखली आहे, तो साठीतही तरुणच असेल, एवढी त्याने व्यायामाने तब्बेत सांभाळली आहे. त्याला खेळाची आणि खेळण्याचीही आवड आहे. त्यामुळे खेळाडूंना तो नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. त्याने अनेक चांगले गुण आत्मसात केलेत. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्याचे भरीव योगदान आहे, याची मला जाण आहे,” असे माजी खासदार रामशेठ ठाकूर गुरुवारी म्हणाले. योनेक्स-सनराईझ रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी १६ ते १८ जून रोजी घेण्यात आली. त्याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रामशेठ ठाकूर बोलत होते. बॅटमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडने याचे आयोजन केले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे प्रायोजक होते. त्यांनी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व स्विकारले होते. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे देशात अव्वल असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. त्यांनी आपले सासरे दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावे शिक्षण संस्था सुरू करून उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणाऱ्या शाळा सुरू केल्या आहेत. उच्च गुणवत्ता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, या कामात मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. १०० कोटींच्या घरात त्यांनी त्यासाठी खर्च केले आहेत, जेणेकरून खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील. आज देशभरातून उलवे नोडमध्ये नागरिक राहायला आलेत, त्यांना आणि त्यांच्या मुलांना या स्टेडियमचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे येथील खेळाडू येत्या काळात जागतिक पातळीवर चमकतील, असा मला ठाम विश्वास आहे. येथील बॅडमिंटन खेळाडूंना सहकार्य करीत आलो आहे, यापुढेही करणार आहे.” या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. १८४ खेळाडूंनी २५ गटांमध्ये २६३ प्रवेशिका पाठविल्या. स्पर्धा मुले व मुलींसाठी एकेरी आणि दुहेरी प्रकारात ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला गट अशा विविध वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, वाय. टी. देशमुख, साईकुमार जी., माताप्रसाद त्यागी हे विशेष उपस्थित होते. या प्रसंगी रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना सुमारे ३ लाखांची रोख बक्षिसे व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय, मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 रायला देवी तलाव सुशोभीकरणाचा निधी झिरपला कुठे ?

 मागील सात – आठ वर्षांच्या कालावधीत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची चौकशी करण्याची केली मागणी ठाणे : मागील आठ वर्षांच्या कालावधीत रायला देवी तलाव आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण या तलाव आणि परिसराची सध्याची परिस्थिती पाहता महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे झिरपला आहे असा सवाल समाजसेवक आणि स्थानिक नागरिक नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. पाण्यासारखा पैसा खर्चूनही रायला देवी तलाव आणि परिसराची बकाल अवस्था का आहे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून संबंधिंतावरी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिवराळे यांनी केली आहे. यासंदर्भात नरेंद्र (रवी) हिवराळे म्हणाले, तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेने २०१९साली सुमारे साडे दहा कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यात तलावाची खोली वाढवण्याबरोबर तिथे संरक्षक भिंत बांधण्याची अट होती. पण  न्यायालयीन आदेशामुळे सिमेंट काँक्रिटची भिंतीच्या ऐवजी गॅबियन वॉल बांधण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला.  त्यानुसार   तलावाची रुंदी कमी करून केवळ  केवळ अडीच बाजूला गॅबियन वॉल बांधण्यात आली. याशिवाय तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठे पंप लावून त्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला. हा उपसा करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे तिथे असणारे जलचर, भारतीय प्रजातीची कासवं मरण पावलीत. याशिवाय तलावाची सध्याची परिस्थिती पाहता त्याठिकाणी तलावाची खोली किती वाढवण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या तलावात कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नयेत असे स्पष्ट निर्देश असताना त्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम केलेले पहायला मिळते. या कामासाठीही नंतर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोप नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केला.  अर्धवट सुशोभीकरणामुळे तलावाच्या उत्तर दिशेला रानटी झुडपं उगवली असून त्याठिकाणी कुठल्याही वेळेला प्रेमी युगल बसलेली आढळतात. याशिवाय पश्चिम बाजूला उत्तर भारतीय.  नागरिकांच्या छट पूजेकरता तात्पुरत्या छोटे पाण्याचे हौद तयार करण्यासाठी विटा आणि भुसा वापरण्यात आला होता. आता एवढे दिवस उलटून गेल्यावरही त्याठिकाणी तो भुसा तसाच पडून असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपोळलकर यांच्या कडे केली होती. ही मागणी जरी रास्त असली तरी त्याठिकाणी केवळ एकच सुरक्षा चौकी बांधण्यात आली आहे. तलावाचा एकूण परिसर पाहता त्याठिकाणी किमान पाच ते सहा सुरक्षा चौकींची आवश्यकता असल्याचे नरेंद्र मोदींनी (रवी) हिवराळे यांनी सांगितले. तलावाची सध्याची बकाल अवस्था पाहता अमृत योजनेच्या माध्यमातून मिळालेले चार कोटी रुपये, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नागपूरच्या कंत्राटदाराने कुठे खर्च झाला याची चौकशी करावी अशी आग्रही मागणी नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केली आहे. मागील आठ वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही बकाल अवस्थेत असलेला रायला देवी तलाव आणि परिसर सर्वसामान्यांसाठी केव्हा खुला होणार असा सवाल नरेंद्र ( रवी) हिवराळे यांनी उपस्थित केला आहे.

फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे योग दिन उत्साहात साजरा!

मुंबई: फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सूर्यनमस्कार चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष.…

मैत्रीबोध परिवाराद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

रमेश औताडे मुंबई : मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला उपस्थित होते.  या प्रसंगी  गोपाल कृष्ण अग्रवाल, आमदार  महेंद्र सदाशिव थोरवे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे  योगाचा अनुभव केवळ आसने आणि शारीरिक व्यायाम यापुरता मर्यादित न राहता, शरीर, मन आणि चेतना यांच्या एकात्मतेच्या रूपात घेता आला. कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी गणेश वंदना तसेच भारताची प्राचीन योगिक कला असलेल्या मल्लखांबाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब ही शक्ती, लवचिकता, संतुलन आणि शिस्त विकसित करणारी भारतीय परंपरेतील एक अद्वितीय कला आहे.