Category: मुंबई

Mumbai news

 ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’

अभियानात रेल्वे स्टेशन, बस डेपो व वर्दळीच्या जागी सखोल स्वच्छता मोहीमा     नवी मुंबई : दररोज नियमितपणे करण्यात येणा-या स्वच्छतेप्रमाणेच काही दुर्लक्षित जागांची सफाईदेखील विशेष मोहीमेव्दारे करण्यात यावी अशा प्रकारच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनांनुसार आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning) राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागात विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  संजय तायडे यांच्या पुढाकाराने घणसोली रेल्वे स्टेशन व परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्टेशन्सच्या स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाची असली तरी नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकरिता आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत रेल्वे स्टेशन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या घणसोली रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत पोलीस प्रशिक्षण घेत असलेले दळवी ॲकेडमीचे होतकरू युवक – युवती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सहभागी झाले होते. तसेच राजीव गांधी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अधिकारी  संजय तायडे यांच्या समवेत उप मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी  विजय पडघन तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांनी विशेष योगदान दिले. सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे येथील पेट्रोल पंपांवरील शौचालय सफाईची विशेष मोहीम स्वच्छता अधिकारी  संजीव रोकडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मित्रांसह राबविली. तसेच कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  सुनिल काठोळे यांनी स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने कौपरखैरणे बस डेपोमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली. अशा सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे दुर्लक्षित जागांप्रमाणेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणांचीही स्वच्छता केली जात आहे. ०००००

आता फैसला १३ जुलैलाच- जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे याचा फैसला आता १३ जुलैलाच होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.  मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या…

पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर

मुंबई : देशात नीट आणि  युजीसी परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने २८८ मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता काँग्रेसनेही सर्वच्य सर्व २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून स्वबळाची चाचपणी केली आहे. येत्या १० जुलैपर्यंत…

१४८ कोटींच्या ‘वॅाटर टॅक्सी’ला पर्यावरणीय मंजुरीच नाही

नवी मुंबई : नवी मुंबई आणि मुंबईला सागरी मार्गाने जोडण्यासाठी बेलापूर- नेरूळ खाडी किनारी सिडकोने वॅाटर टॅक्सी हब बनवले आहे. 148 कोटी खर्च करून उभारलेल्या या जेट्टीला पर्यावरणीय परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती अधिकारात उघड झाली आहे. शहरात…

पोलिसांतील ” माणसां “चे आझाद मैदानात आंदोलन

रमेश औताडे  मुंबई : कर्तव्य पार पाडत असताना घर दार सोडून वेळेचे बंधन झुगारून जनतेचे रक्षण करणारे पोलिस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आमच्याही काही मागण्या आहेत. त्या…

‘सरकारने लुटली तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ 

महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने मुंबई  : महायुती सराकारच्या महागाई विरोधातील घोषणांनी पावसाळी अधिवेशनाच्या आजचा आठवा दिवस दणाणला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’,…

सूर्याचा कॅच अन् आम्ही काढलेली विकेट कधीच विसरता येणार नाही !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तुफान बॅटींग मुंबई:   क्रिकेटच्या मैदानावर सुर्यकुमार यादवने पकडलेला कॅच आणि दोन वर्षापुर्वी आम्ही ५० जणांनी राजकाराणाच्या खेळपट्टीवर काढली विकेट कधीच विसरता येणार नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

विधानपरिषदेत आता आरपारची लढाई

११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात स्वाती घोसाळकर मुंबई   : आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा ट्रेलर म्हणून ज्या विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे पाहिले जात आहे तेथे आता आरपारकी लढाई होणार हे आज स्पष्ट झाले. विधान…

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा-आदिती तटकरे

अशोक गायकवाड     मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास…