Category: मुंबई

Mumbai news

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : येत्या ५ जुलै  ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून…

प्रकाश आंबेडकरांनी माविआसोबत यावे

वर्षा गायकवाडांचे आवाहन मुंबई : लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत असा विश्वास नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीसोबत यावं, आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया असं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मीही भीमकन्या आहे. मलाही पाठिंबा दिला असता तर समाधान वाटलं असतं. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी सोबत यावं असं आवाहन मी करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

अंबादास दानवेंचे निलंबन मागे 

मुंबई  : विधान परिषद सभागृहात शीवीगाळ करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांचे निलंबन त्यांच्या माफीनंतर मागे घेण्यात आले.  कॉग्रेसनेते राहुल गांधीं यांनी संसदेत हिंदूत्वावर केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या गदारोळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिविगाळ केली होती. विधिमंडळात शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसाकरीता निलंबन मंगळवारी  करण्यात आले होते. आज त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याच्या त्यांच्या विनंतीवरून त्यांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तो बहुमताने संमत करण्यात आला. गेल्या सोमवारी अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात होते त्यावेळी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्यांच्या पक्षाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.  दरम्यान आज दानवे यांनी झाल्या वक्तव्या बाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला तो सहमत करण्यात आला. उद्या शुक्रवार ५ जुलैपासून दानवे कामकाजात भाग घेतील.

अजि म्या देव पाहीला !

स्वाती घोसाळकर मुंबई : मुंबईच्या क्रिकेट पंढरीत आज जग जिंकणारे क्रिकेटच देव अवतरले. या देवाचे दर्शन घेण्यासाठी अवघी मुंबई आज रस्त्यावर लोटली. अजि म्या देव पाहिल्याच्या थाटात क्रिकेटच्या या भक्तांनी आपल्या दैवतांचे…

बेलापूर व तुर्भे विभागात 9 अनधिकृत रेस्टॉरंट, बार व पबवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल / बार आणि रेस्टॉरंट / लेडीज बार / पब / लॉज / हुक्का पार्लर यांच्यावरील कारवाई तीव्रतेने राबविण्यात येत…

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी धडक मोर्चा

रमेश औताडे     मुंबई : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने २३ जुलै रोजी मंत्रालय आरसा गेट सहित सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंच टाईम मध्ये…

सुट्टीच्या दिवशी नमुंमपा कर संकलन केंद्रात 10 कोटी 19 लक्ष मालमत्ता कर जमा

नवी मुंबई : सन 2024-2025 वर्षातील पहिल्या सहामाहीची मालमत्ता कर देयके भरण्याचा अखेरचा दिनांक 30 जून रोजी रविवार असल्याने व त्यापूर्वीही 29 जून रोजी शनिवारची कार्यालयीन सुट्टी असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात…

शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र सुधारणा करा-आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड     नवी मुंबई : सेक्टर १६ वाशी येथील नमुंमपा शाळा क्रमांक २८ मध्ये अचानक भेट देत तेथील कामकाजाची व सेवांची बारकाईने पाहणी केली आणि शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र…

युवा बॅडमिंटनपटू अनुश्रीचे दुहेरी यश..

मुंबई : जुहु येथील श्रीमती रामदेवी शोभराज बजाज आर्य विद्या मंदिर‌ शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेली युवा बॅडमिंटनपटू अकरा वर्षीय अनुश्री शिरीष मोडलिंबकरने विलिंग्डन जिमखाना ,खार रोड येथे संपन्न झालेल्या…

वस्ताद पाटील यांंना शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांना त्यांनी गेल्या ३० वर्षात क्रीडा (कुस्ती) , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या…