Category: मुंबई

Mumbai news

स्वच्छता कार्यात महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी सक्रिय होण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : ‘स्वच्छ शहर’ ही आपल्या नवी मुंबईची ओळख असून ती कायम राखण्यासाठी तसेच स्वच्छतेची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जोडीने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी सक्रिय व्हावे तसेच आपल्या शहराचा नावलौकिक उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक विभागाने करावयाची कामे तसेच राबवावयाचे उपक्रम याविषयीच्या अपेक्षा तपशीलवार सांगत त्या अनुषंगाने गतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. स्वच्छता कार्यामध्ये नागरिकांचा सहभाग सर्वात महत्वाचा असून नागरिकांनी दररोज आपापल्या घरातूनच    कच-याचे वर्गीकरण करणे व वर्गीकृत कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत वेगवेगळा देण्याची सवय अंगिकारावी याकरिता त्यांच्यापर्यंत सातत्याने हा संदेश पोहचविण्याची गरज आयुक्तांनी विशद केली. तसेच सर्व विभागांमध्ये स्वच्छतेच्या मोहीमा राबवून त्यामध्येही लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याचप्रकारे एपीएमसी मार्केटमध्येही कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यावर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. मोठ्या सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर अधिक कृतीशील व्हावे असे निर्देशित करण्यात आले. शालेय व महाविदयालयीन विदयार्थी हे या शहराचे भविष्य असून त्यांच्या मनावर आत्तापासूनच स्वच्छतेचा संस्कार व्हावा या भूमिकेतून शालेय व महाविदयालयीन पातळीवर स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे तसेच स्वच्छता शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर व्यापक स्वरुपात राबविण्यात यावा असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विदयार्थ्यांना आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पुढे काय प्रक्रिया होते याची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शाळांच्या अभ्यास भेटी आयोजित करण्याची कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती मोहिमा राबवाव्यात त्याचप्रमाणे दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे प्रतिबंध करुन त्या ठिकाणी कापडी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी वेन्डींग मशिन बसवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या. याकामी महिला बचत गटांचे सहकार्य घ्यावे असे सूचित करण्यात आले. बेलापूर ते वाशी पर्यंत शहरातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून त्यावरून इतर शहरांतील हजारो नागरिक दररोज प्रवास करीत असून त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ज्याप्रमाणे शनिवारी यशस्वीरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ती ठराविक कालावधीनंतर नियमीतपणे राबविण्यात यावी व त्यासोबत शहरातील इतरही मुख्य मार्गांवर स्वच्छता मोहिमा लोकसहभाग घेऊन राबवाव्यात अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. सफाईमित्रांसाठी राबवावयाच्या कल्याणकारी योजनांची कार्यवाही तत्परतेने करावी यामधील विमाविषयक बाबींकरिता पोस्ट ऑफिसचे सहकार्य घेण्यात यावे त्याचप्रमाणे समाजविकास विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेची 10 टक्के अंमलबजावणी 15 ऑगस्टपर्यंत व्हावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छता विषयक कामांचा दैनंदिन आढावा घेता यावा याकरिता स्वतंत्र डॅशबोर्ड असावा अशा सूचना देतानाच स्वच्छता‍विषयक जनजागृतीची व्याप्ती विविध माध्यमांतून वाढविण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये एनएमएमटीच्या बसेसमध्ये फलक प्रदर्शन, उद्घोषणा याव्दारे स्वच्छता संदेश प्रसारित करण्याचे सूचित करण्यात आले. शहरातील मुख्य चौक, कॉर्नर, उदयाने याठिकाणच्या शिल्पाकृती व्यवस्थित करुन घ्याव्यात व त्याची स्थलनिहाय छायाचित्रे सादर करावीत अशा सूचना देण्यात आल्या. विविध उदयाने, पार्क याठिकाणी स्वच्छतागृहांची तसेच स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जलद कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. उदयानांमधील एका कोपऱ्यात नर्सरी निर्माण करणेबाबत कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय पार्किंग पॉलिसी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद पावले उचलावीत असेही निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत   मुंबई : राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांनासुध्दा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहातील समिती कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्राधिकरणाचे सहअध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वने विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव बुशरा सय्यद, रस्ते सचिव संजय दशपुते उपस्थित होते. राज्याच्या विकासात विविध प्रकल्पांचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यात ठिकठिकाणी पुनर्वसित गावठाणे उभारण्यात आली आहेत. मात्र अनेक पुनर्वसित गावठाणे अद्यापि ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरित झाली नसल्याने त्यांच्या विकासासाठी निधीची तरतुद करण्यात अडचणी येतात, त्यामुळे त्यांचा विकास रखडतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ त्यांच्या ताब्यात घ्यावीत. या गावठाणांना १८ नागरी सुविधांसह विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्याचबरोबर पुनर्वसित गावठाणात अनेक वर्षापासून वाटपाविना रिक्त असलेले भूखंड संबंधित प्रकल्पातील बाधितांना द्यावेत, त्यानंतर सदर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना द्यावेत, त्यानंतरही शिल्लक राहिले तर राज्यातील इतर प्रकल्पग्रस्तांना या प्राधान्य क्रमानुसार देण्यात यावेत, अथवा कोणी हे भूखंड घ्यायला तयार नसतील तर नियमाप्रमाणे त्यांचे लिलाव करावेत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोयना धरण प्रकल्पबाधीत गोकुळ, रासाटी, हेळवाकमधील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधीत शिवनदेश्वर प्रकल्पबाधीत गावांसाठी कोयना भूंकप पुनर्वसन निधीतून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा. सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पामध्ये शंभर टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यांमध्ये चारशे रुपयांवरून दरमहा एका कुटूंबाला एका वर्षासाठी तीन हजार रुपये वाढ करणे, तसेच याच प्रकल्पातील सावरघर येथील २९ कुटूंबाची खास बाब म्हणून रोख रक्कम देवून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्यातील गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातील सुकळी (ता.धारूर) येथील प्रकल्पग्रस्तांचे खास बाब म्हणून पुनर्वसन तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूर लघू पाटबंधारे प्रकल्पातील कुरळी व घामापूर (ता.उमरखेड) गावातील पात्र प्रकल्पग्रस्त कुटूंबाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्याचा‍ निर्णय घेण्यात आला. घेण्यात आलेला निर्णय खालीलप्रमाणे – *राज्यातील पुनर्वसित गावठाणे ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत;पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देणार *दरडीने, भूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा;राज्यातील अनेक वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांना न्याय मिळणार *कोयनेतील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित गावांना विशेष निधी;सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ *यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूरसह बीड जिल्ह्यातील गुणवंती प्रकल्पातील पात्र बाधितांचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय 0000

 वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस

 मुंबईत काँग्रेसला नवी ताकद व उर्जा देण्याचे वर्षा गायकवाड यांचे काम.   मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत प्रा. वर्षा गायकवाड यांनी एका वर्षात पक्ष मजूबत करण्याचे काम केले आहे. वर्षा गायकवाड यांनी मुंबईकरांचे प्रश्न घेऊन विधिमंडळासह रस्त्यावरही दोन हात करत सत्ताधारी पक्षाला जाब विचारला. शहरातील झोपडपट्टीवासियांचे प्रश्नी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांच्याबरोबरीने सरकारशी लढा दिला व आजही तो लढा सुरुच आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतही मुंबईतील सहा पैकी चार जागांवर विजय संपादन करून काँग्रेसची विजयी पताका फडवली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते आणि मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. खासदार राहुलजी गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा काढून देशातील वातावरण बदलवले. या यात्रेला मुंबईत विशेषतः धारावीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशाभरतीला इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर न्याय यात्रेची प्रचंड मोठी सांगता सभा झाली. मुंबईत १८ वर्षानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची एवढी प्रचंड सभा झाली, त्या सभेच्या नियोजनातही वर्षा गायकवाड यांचे योगदान मोठे होते. मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून मुंबईकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. नीट परिक्षेच्या पेपरफुटीनंतर मुंबईत रस्त्यावर उतरून भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. जनतेसाठी सदैव तत्पर असे वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड यांनी अनेक अडचणींचा सामना करत तानाशाही सत्ताधाऱ्यांशी दोन हात केले. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विचार मुंबईत घराघरात पोहचवण्याचे काम झाले. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या प्रमाणेच लोकांच्या मदतीसाठी त्या धावून जातात. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्या रुपाने दलित, वंचित, मागासवर्गीय समाजाला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कामाचा सपाटा सुरु असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे. ०००००

राष्ट्रवादी काँग्रेस राजर्षी शाहू महाराजांची जयंती राज्यभर विविध उपक्रमांनी साजरी करणार – सुनिल तटकरे

मुंबई दि. २५ जून – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांनी राज्यभर साजरी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत आला असून या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाही विचार या मूलमंत्राने दिनांक २६ जून ते १ जुलै या दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे. ३० जून रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘सामाजिक सलोखा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक, व्याख्याते व विचारवंत यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर ‘कृषी दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिनी’ त्या – त्या जिल्हयातील व तालुक्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालयात ‘तंत्रज्ञानयुक्त शेती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. 000

बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठयात उत्सवात संपन्न

लोकमाता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती   मुंबई :  बेस्ट कामगार अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने माता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक भरगच्च सुत्यउपक्रम राबवून मोठया उत्साहात जयंती उत्सवाचे अध्यक्ष श्री सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न केली. सर्व प्रथमतः माता अहिल्यामाई होळकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण सन्मानीय स्थानिक आमदार श्री अजय चौधरी यांनी करून प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना काबळे, प्रा.दादा धडस सर,बी जी गायकवाड गुरूजी, यांच्या शुभ हस्ते समई दिप प्रज्वलित करून जयंती उत्सव सोहळ्याचे उद्घाटन झाले, प्रतिमा पुजन जयंती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष श्री आंनदा जरग, सचिव श्रीअनिल कोळपे, खजिनदार दत्तात्रेय पुळके, श्री यशवंत मदने,सुरेश धायगुडे आदि सन्मानीय मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.सदर प्रंसगी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून बेस्ट कामगार सेवानिवृत्त बस निरीक्षक श्री रमेश कोळपे, बस चालक श्री शिवाजी कोळपे,यांचा पुष्पगुच्छ,शाल,फेटा, बेस्ट बस स्मृतीचिन्ह देऊन उपस्थितीत मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत झाले, प्रमुख पाहुणे आमदार श्री अजय चौधरी यांनी जयंती निमित्त शुभेच्छा देवून आपल्या भाषणात म्हणाले की,  ३१ मे २० २४ ला जयंती माता अहिल्यामाई होळकर होती, लोकसभा निवडणुकी काळ असल्याने व पावसाळ्यात शेतीचे कामे व बेस्ट उपक्रमातील आपले नौकरी दिवस संभाळून जवळपास आपण बेस्ट कामगारानी एक महिन्यानी ती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन कौतुक केले, पुढे आमदार चौधरी म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांची जयंती वर्ष भर ही साजरी केली तर ही अहिल्यामाई होळकरच्या थोर कर्तबगारी उपकाराची परतफेड करू शकत नाही,असे ते आवर्जुन म्हणाले. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त बेस्ट कामगार बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसा.मुंबई अध्यक्ष समाजभूषण सो ना कांबळे यांनी सविस्तर भाषणात माता अहिल्यामाई होळकर यांचा जीता जागता क्रांतीकारक इतिहास जयंती उत्सव सोहळ्यात प्रदीर्घ भाषणात वर्णन करताना म्हणाले की, इ.स.जन्म ३१ मे १७२५ पुण्यश्लोक माता अहिल्यामाई होळकर ग्रामीण दुर्गम खेडेगांव चौंडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर येथे वडील माणकोजी शिदे व आई सुशिला शिदे, माणकोंजी शिंदे हे गावचे पाटील होते,मल्हारराव होळकर यांच्या मागणीनुसार आठ वर्षांची मुलगी अहिल्यामाई  यांचे लग्न शनिवार वाडा पुणे येथे २० मे १७३३ मध्ये फक्त बारा वर्षांच्या खंडेराव होळकर होवून त्या सासरी इंदूरला जावून होळकराची सुन म्हणून क्रांतीकारक इतिहास घडविला तो पुढील आपणास सविस्तरपणे आपणास थोडक्यात सांगतो, कांबळे म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या समभावाचा आदर्श मिरवीत हिंदु मंदिरे,मशिद,चर्च,बौद्ध विहारे,आदि धर्मियांचे बांधली व देशभरातील मंदीराचा जीर्णोद्धार केला, विहिरी पानवटे, रस्ते,महारस्ते बांधून पर्यटनाला प्रोत्साहन देऊन मजुरांना काम मिळाले, विश्रामगृह, महिला साठी खास स्नानगृह त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेवून निर्माण केली, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण करून आपल्या राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या शूरवीर यशवंत फणसे या आदिवासी बहादूरा आपल्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला तडा दिला, धर्मातील रूढी पंरपंराचा आंधळेपणा कधीही स्वीकारला नाही,  पती खंडेराव याना वीरमरण आले असता आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या विनंतीवरून सती गेल्या नाहीत त्या तरुण वयात विधवा २९ व्या वर्षी होवून पती खंडेराव १७५४, मल्हारराव  सासरे १७६६, मुलगा मालेराव १७६७ च्या निधनानंतर त्यांच्या जीवनातील उत्तम राज्यकारभाराचे २९ वर्ष राघोबा पेशवाईचा पन्नास हजार फौज फाट्याला नामोहरम करून शरणार्थी आणून कंकण व महिला फौजेचा दणका देवून युक्तिवादाने लढाई जिंकून लाभल्याची जागतिक पुस्तकात नोंद असून आपला नातू नथाबा, त्यानंतर एकच वर्षात जावई यशवंत फणसे यांचे निधन व मुलगी मुक्ताबाई या १७९१ला आपल्या पती बरोबर सती गेल्या, त्यांनी इंदूरवरून राजधानी नर्मदा नदी च्या महेशवर हे वसाहत स्थापन केल्या ठिकाणी त्यांचे वृध्दापकाळाने ७० व्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ निधन झाले!एका खडतर जीवनाचा अंत झाला पण इतिहास रूपाने अहिल्यामाई होळकर आपल्यात जिवंत असल्याचा भास होतोय! त्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे मानता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लावता राज्याचा कोष समृध्द लोककल्याणसाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्याचे प्रदीर्घ आपल्या घणाघाती भाषणात प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना कांबळे यांनी ठणकावून सांगुन उपस्थितीत सर्व समाजातील व खास करुन धनगर समाजातील बंधूभगिनी अहिल्यामाई होळकर यांचा आदर्श घेतला तरच अहिल्यामाई होळकर जयंतीचा जल्लोष जागर सार्थकी होईल असे गौरवोद्गार काबळे यांनी काढून माता अहिल्यामाई होळकरच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन केले आमदार अजय चौधरी, प्रा. दादा धडस, श्री बी जी गायकवाड गुरूजीआदिने यांनी आपले विचार थोडक्यात प्रगट करून माता अहिल्यामाई होळकर यांचा संपूर्ण इतिहास प्रमुख वक्ते सो ना कांबळे यांच्या तोंडून ऐकल्याचे समाधान व्यक्त केले सदर वेळेस महिलांचा हळदी कुंकूसंमारभ मुलांच्या सांस्कृतिक भरगच्च विविध सुत्यउपक्रम कार्यक्रम राबवून बेस्ट कामगार परळ वसाहतीत माता अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव सोहळ्या मोठया उत्साहात संपन्न झाल्याचे बेस्ट कामगार नेते मुक्त पत्रकार समाजभूषण सो ना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

खासगी आस्थापनेवरील कोकण पदवीधर/शिक्षक मतदारांना विशेष दोन तासांची सवलत- अमोल यादव

 अशोक गायकवाड नवी मुंबई, : *कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील खासगी आस्थापनेवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी २६ जून, २०२४ रोजी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.* भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै,२०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/शिक्षक निवडणूकीमध्ये खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने अशा व्यक्तींना मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष दोन तासाच्या सवलतीचा लाभ घेऊन पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. ०००००० ००००

बुध्दिबळ दिनानिमित्त २० जुलैपासून आयडियल बुध्दिबळ महोत्सव

मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव  २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे  प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या  गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण  रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह  आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

मुंबई खो-खो संघटना तुषार सुर्वे व संजीव ठाकूरदेसाई यांचा  कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरव

मुंबई : मुंबई खो- खो संघटनेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या…

सिनियर पॉवरलिफ्टिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये

मुंबई :  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य सिनियर (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद -निवडचाचणी स्पर्धा – २०२४, २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये नागरिक सहाय्य केंद्र संचालित…

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंवई आयआयटीने  दिला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्या…