Category: मुंबई

Mumbai news

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (  संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  पर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले. उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल,  देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल,  जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

 राज्यातील रोजगार हमी योजनेतील कामगारांचे आंदोलन

राज्यातील रोजगार हमी योजनेतील कामगारांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वेतन व सेवाशर्तींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवठा करताना नियमांचे पालन होत नसून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी अन्याय सहन करत तक्रारी आहेत. त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व समान कामासाठी समान वेतन या तत्वांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. काही विभागांमध्ये एका खासगी कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पुरवठा केला जात असून, या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप आहे. कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये प्रत्यक्षात खासगी मध्यस्थांचा सहभाग वाढल्याने रोजगार हमीचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याची टीका होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सेवा बजावूनही कायमस्वरूपी दर्जा, वेतनवाढ किंवा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आऊटसोर्सिंग पद्धतीचा सखोल आढावा घेऊन स्पष्ट धोरण आखावे, कर्मचाऱ्यांचे हक्क निश्चित करावेत आणि नियमबाह्य नियुक्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा या व्यवस्थेमुळे शोषण वाढून प्रशासकीय यंत्रणेत असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे- ॲड. एस. के. शेट्ये

मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे- ॲड. एस. के. शेट्ये अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्टच्या जागेवर अनधिकृतपणे  राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात, परंतु ज्या बंदर व गोदी कामगारांनी मुंबई पोर्टच्या विकासासाठी परिश्रम करून बंदराचा नावलौकिक केला, त्या गोदी कामगारांना मुंबई पोर्टच्या जागेवर घरे मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते  ॲड. एस.के.शेट्ये  यांनी काढले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. मुंबई पोर्ट प्राधिकरण आउटडोअर डॉक्स स्टॉफ श्री सत्यनारायण महापूजा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी  दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोदी विभागातील  कामगार कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ‘कुटुंब किर्रतन’  हे नाटक दाखविण्यात आले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री.सुधाकर अपराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोदी कामगारांनी कमी कामगार संख्येत काम करून मुंबई बंदराची प्रगती केली आहे. मात्र अद्यापही बोनसचा समझोता करार होऊन देखील अंतिम करारावर सह्या झाल्या नाहीत. स्टॅगनेट झालेल्या कामगारांचा प्रश्नही प्रलंबित आहे. तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती मिळून जे अधिकारी झाले, त्यांना पगारवाढीत न्याय मिळावा. या व इतर उद्योगधंद्यातील कामगारांच्या मागण्यांसाठी भारतातील केंद्रीय कामगार संघटना १२ फेब्रुवारीला भारत बंद करणार आहेत, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन केले.  या कौटुंबिक  सोहळ्यात नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी मारुती  विश्वासराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर,  पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट  ट्रस्ट एस.एसटी. आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अंकुश कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे सुंदर निवेदन पूजा समितीचे सल्लागार विजय सोमा सावंत यांनी केले. कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी आलेल्या गोदी कामगारांच्या कुटुंबीयांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते.

पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींची तरतूद

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींची तरतूद महामार्ग व शहरी विकासाला गती देणारा अर्थसंकल्प मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या १२.२ लाख कोटी रुपयांच्या…

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्‌डाण-२०२६ चे शानदार आयोजन

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्‌डाण-२०२६ चे शानदार आयोजन राजेंद्र साळसकर मुंबई -महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी वि‌द्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यालय मराठी, हिंदी, उर्दू माध्यम)…

खारदांडा कोळीवाड्याच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करा – वर्षा गायकवाड

खारदांडा कोळीवाड्याच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करा – वर्षा गायकवाड मुंबई: मुंबईतील खारदांडा, कोळीवाडा हा गावठाण भाग असून येथील रहिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या  गावठाण क्षेत्रातील बांधकामांबाबत स्वतंत्र व स्पष्ट नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत खार दांडा कोळीवाडा येथील बांधकामांबाबत महानगरपालिका तसेच अन्य यंत्रणांकडे प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींवर कारवाई स्थगित ठेवण्याबाबत शासन आदेश काढावा आणि येथील मालकी हक्काच्या जमिनीवरील बांधकामांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून बांधकामे नियमित करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड म्हणतात की, कोळी समाज हा महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण किनार पट्टीवरील सर्वात जुना, म्हणजे ‘आद्य’रहिवाशी मानला जातो. १५ व्या शतकापासून मुंबईच्या किनारपट्टीवर वसलेल्या या समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून, त्यांना ‘मुंबईचे मूळ रहिवासी’ म्हणून ओळखले जाते. हे समाज बांधव सागरी संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारे आहेत. सदर भागातील इमारतींच्या दुरुस्ती व बांधकामाबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियमातील ठोस व स्पष्ट नियमावली अद्याप तयार झालेली नाही, त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यास अडचणी येत असून, मालकी हक्काच्या जमिनीवरील अत्यावश्यक दुरुस्तीची कामेही करता येत नाहीत. या तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेत काही स्थानिक घटकांकडून रहिवाशांवर तक्रारी दाखल करून महानगरपालिका व न्यायालयीन माध्यमातून खंडणीची मागणी केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. खार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून,संबंधित तक्रारी व पुरावे उपलब्ध आहेत. खंडणी न दिल्यास गरीब व सामान्य रहिवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बेघर केले जात असल्याच्या घटना घडत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.  सरकारने याची दखल घेऊन येथील गरीब व गरजू रहिवाशांना खंडणीखोर प्रवृत्तीपासून संरक्षण द्यावे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

सुजाता पाटील नवी मुंबईच्या महापौर होणार

सुजाता पाटील नवी मुंबईच्या महापौर होणार नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्याशी दोन हात करून नवी मुंबईत एकहाती सत्ता आणणाऱ्या वन मंत्री गणेश नाईक यांनी धक्कातंत्राचा वापर करीत नेरुळ लगत असलेल्या सारसोळे गावातील…

लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा कोल्हापूर : एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असं वक्तव्य एकनाथ…

राष्ट्रवादीने विलिनीकराणाआधी भाजपाशी चर्चा करावी: फडणवीस

राष्ट्रवादीने विलिनीकराणाआधी भाजपाशी चर्चा करावी: फडणवीस मुंबई : अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं आज स्पष्ट…

भाजपाच्या पियुष गोयलांनी केले प्रफुल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष !

भाजपाच्या पियुष गोयलांनी केले प्रफुल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष ! मुंबई  : अजित पवारांच्या निधनामुळे अवघा महाराष्ट्र दुखात असतनाच आज भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचे सांगितले…