Category: मुंबई

Mumbai news

 विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला निषेध

 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जवाबदार असून त्यांनी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास घुगे, स्वप्निल शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे. भरती प्रक्रियेतील कठीण गैरव्यवहार ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील कथित अन्याय तसेच विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु असंवेदनशील सरकारने अद्याप पर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी व युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक व अन्यायकारक असल्याची भावना समाजात वाढत आहे. या सर्व जनविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करत असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले. यावेळी दिलेल्या निवेदनात  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या कंपनीने ब्लॅक लिस्टेड आहेत त्या व अशा कंपन्यांमधील संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये. एनटीए संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्य प्रणाली लागू करावी. पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय जाहीर करावे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत व त्यासाठी कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल (प्रतिनिधी) – मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश…

कल्याण डोंबिवली महानगर साहित्य भारतीच्या वतीने कालिदास जयंती उत्साहात 

कल्याण : कल्याणच्या नमस्कार मंडळ सभागृहात रविवारी कालिदास जयंती कार्यक्रम पार पडला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारतीच्या कल्याण-डोंबिवली महानगराचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. महानगर कार्याध्यक्ष अश्विनी मुजुमदार यांनी प्रास्ताविक…

 पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या : खासदार सुनील तटकरे, नारायण राणे यांचे प्रशासनाला निर्देश

 दिशा समितीच्या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर रत्नागिरी | अशोक गायकवाड राज्य आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम…

आझाद मैदानात अजून किती वर्ष न्याय मागायचा

रमेश औताडे मुंबई : प्रत्येक वेळी आश्वासन देणाऱ्या सरकारने एकदा सांगून टाकावे की आम्ही अजून किती वर्ष आंदोलन करायचे असा सवाल करत शेतकरी लोकनेते रमेश हिंदुराव यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी भाई आकाश निर्मळ आणि रमेश हिंदुराव त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले. उपविभागीय अभियंता दत्तू गीते ३ वर्ष भिंवडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात सेवा पूर्ण होऊनही त्यांची बदली का झाली नाही. एक कोटी १७ लाख ७२ हजार ६४८ इतक्या रकमेचे वाढीव बिल काढल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आझाद मैदानात न्याय मिळणार आहे की फक्त आश्वासनच असा सवाल रमेश हिंदुराव यांनी केला आहे.

झाडांच्या पडलेल्या फांद्या मुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ –  भरत चव्हाण

00000 अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीप्रमाणे कारभार सुरू असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा फटका २८ लाख ठाणेकरांना बसला. पावसाच्या काळात झाडाच्या पडलेल्या फांद्या वेळीच उचलल्या न गेल्यामुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत केला. तसेच पावसाळ्याच्या काळात अग्निशमन, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्कालीन विभागाने एकत्रितपणे समन्वयाने काम करावे, अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळा लांबल्यानंतर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची अपेक्षा होती. परंतु, पहिल्याच पावसात मोठ्या संख्येने झाडे पडण्याबरोबरच पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपत्कालीन विभागाचा बोजवारा उडाल्याचे ठाणेकरांनी पाहिले. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अर्धे काम कोपरीत, तर अर्धे काम तीन हात नाका येथे सुरू होते. चेंदणी कोळीवाड्याजवळ रेल्वे बोगद्याखाली सातत्याने पाणी साचत असल्याची तक्रार केल्यावर, एसटीपी विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या सामान्य ठाणेकरांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. कोपरीमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी झाडाच्या पडलेल्या फांद्या उचलल्या जातात. तो कोपरी पॅटर्न ठाणे शहरात लागू करावा, अशी सूचना भरत चव्हाण यांनी केली. कोपरीहून पटणी पूलापर्यंत पूल उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. परंतु, भूमाफियांकडून सर्रास अतिक्रमणे करून खाडी बुजूवूचाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही वर्षांनंतर पूल उभारण्याची गरजही लागणार नाही, असा टोला भरत चव्हाण यांनी लगावला. ठाण्यात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध केले आहेत. मात्र, आजही अनेक भागातील वाहतूककोंडी अधिक भीषण होत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. वाहतूक कोंडीत शाळांमधील मुले अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून कार्य करावे, अशी सूचना नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. मॅरेथॉनच्या प्रतिकाचा पुतळा गायब ठाणे शहराला मॅरेथॉनचा इतिहास आहे. मॅरेथॉननिमित्ताने कोपरीत तीन फूटांचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, तो मुसळधार पावसानंतर गायब झाला आहे. त्याच्या चोरीबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही, याकडेही नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले. 00000000000

पारमिता धर्मादाय न्यासाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) या शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय विकासकामे करणाऱ्या संस्थेच्या वतीने नालंदा विद्यालय, कल्याण (पूर्व) येथील इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत…

पावसाळ्यातील उपाययोजना संदर्भात श्वेतपत्रिका काढावी : नम्रता कोळी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची संकटे आल्यास महापालिकेने हाताळण्याची परिस्थिती, उद्भवलेल्या अडचणी, त्या दूर करण्यासाठी आलेले…

 ठाण्यातील नालेसफाईचा गाळ कागदोपत्री अंबरनाथच्या जमिनीवर?

 भाजप नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप, निविदांच्या चौकशीची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील नालेसफाईतून काढलेला गाळ चक्क अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली व दिवा येथील जमिनीवर टाकण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र, शहरातील खाडी परिसरातच गाळ फेकला गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यांची छाननी न करताच बेकायदेशीरपणे नालेसफाईच्या तांत्रिक निविदा मंजूर केल्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी महासभेत सोमवारी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. प्रत्यक्षात बहुसंख्य नाल्यांची सफाई झाली नाही. तर किरकोळ गाळ काढून खाडी परिसरातच फेकला गेला. महापालिकेच्या नियमानुसार, गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडे स्वत:ची किंवा भाड्याची जमीन असावी. मात्र, दिवा, मुंब्रा, माजिवडा आणि उथळसर येथील कंत्राटदारांनी एकाच व्यक्तीच्या दिवा येथील जमिनीवर गाळ टाकल्याची नोंद आहे. एका कंत्राटदाराने ठाण्यापासून ४० किलोमीटरवरील अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली येथील जमीन दाखविली. तसेच या जमिनीचा जुना सातबारा दाखविला असून, महापालिकेला दिलेल्या `एनओसी’वर पाचपैकी केवळ एकाच मालकाची नोंद आहे. दिवा येथील जमीनमालकाने स्टँम्प पेपरऐवजी साध्या कागदावर `एनओसी’ दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी केली. अंबरनाथ तालुक्यातील जमिनीवर गाळ टाकण्यात आलेला नाही, असा थेट आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच संबंधित कंत्राटदारांकडून गाळ वाहून नेताना जीपीएस ट्रॅक रेकॉर्डिग प्रशासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी करीत अर्चना मणेरा यांनी त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची विनंती महासभेत केली. चौकट कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणे, खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू बोरिवडे येथील मैदानाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील काळ्या यादीतील कंत्राटदाराला नियमबाह्यपणे हे कंत्राट दिले गेले. या कंत्राटदाराने खड्डा खोदताना कोणतेही बॅरिकेड व सुरक्षा फलक लावले नव्हते. या प्रकरणी कंत्राटदारावर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही महापालिकेकडून दंडात्मक वा कंत्राट रोखण्याची कारवाई झालेली नाही. संबंधित कंत्राटदार हा काळ्या यादीत असल्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार करूनही अद्यापी, मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राट रद्द करावे. तसेच मुलाच्या कुटुंबियांना कंत्राटदार व महापालिकेने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी दिली. 0000000000

 माळशेज घाटात अभुतपुर्व सौंदर्य

 पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अविनाश उबाळे ठाणे : पावसाळा मोसम सूरु होताच सहयाद्रीच्या उंच पर्वत रांगेतील माळशेज घाटातील डोंगर माथे,हे हिरवेगार दिसतात जशी काय डोंगरांनी हिरवी शाल परिधान केल्याचा भास होतो.आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच डोंगर माथ्यावरुन खोसळणारे धबधबे व रिपरिप पाऊस व पांढऱ्याशुभ्र धुक्यात दिसेनासे होणारे डोंगर जणू काही आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास आपणास होतो.चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि पावसाळ्यातील गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि धुक्यांत हरविलेल्या वाटा असा अद्वभूत नजरा प्रत्यक्ष अनुभवयाचा असेल तर पावसाळ्यात माळशेज घाटाची सफर करायलाच हवी असं हे माळशेज घाट सध्या पावसाळ्यात  पर्यटकांना भुरळ घालत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो उंच डोंगर माथे,घनदाट असं जंगल,दुर्मिळ वन्यप्राणी,पशुपक्षी, यांचा मुक्त संचार घाटातील नागमोडी रस्ते वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग,उंच डोंगर माथे व खोल दऱ्या,पक्षांचा किलबिलाट पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यांत लपलेले डोंगर आणि धुकं व पाऊस यांचा शिवाशिवीचा खेळ रस्त्याकडेला मुक्तपणे संचार करणारी वानरं हा सारा अनमोल ठेवा माळशेज घाटात आहे.पावसाळ्यात तर येथील धबधब्यांत चिंब भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येतात पावसाळ्या मोसमात पर्यटकांनी माळशेज घाटाल विशेष अशी पसंती दिली आहे.निसर्गाची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे वळत आहेत.  मुंबई ,ठाणे,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापूर,डोंबिवली,शहापूर ,मुरबाड, कर्जत,नगर पुणे,नाशिक,या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत असतात घाटात येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम दर्शन होतं ते इथल्या जंगली वानरांचं रस्त्यावर घाटात वानरांचे तांडेच तांडेच येथे पहावयास मिळतात माळशेज घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो असे शहापूरचे पर्यटक गजानन वरकुटे यांनी बोलतांना सांगितले.माळशेज घाटा जवळील स्थानिक आदिवासी येथे आवळे,रानभाज्या,विकतांना नजरेस पडतात तर घाटात गरमागरम  चहा,वडापाव,भाजलेले कणीस, विक्रीतुन स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो आहे हे विशेष आहे . माळशेज घाटात जायचे कसे – माळशेज घाटात जाण्यासाठी खाजगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा,नगर,पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट व येथे निवासस्थांन उपलब्ध आहेत.तसेच येथे भोजनासाठी असंख्य लहान मोठे हॉटेल व ढाबे मुरबाड,सरळगाव,टोकावडे,व माळशेज घाटा पर्यंत रस्त्याकडे ला पाहण्यास मिळतात.