Category: मुंबई

Mumbai news

‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

 व्यंगचित्रांच्या माध्यमातून म्हणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुंबई : महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा भाग असलेल्या जुन्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत सोप्या, रंजक पद्धतीने पोहोचावेत या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे संपादक संजय मिस्त्री, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, चारूहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत, विवेक प्रभूकेळूसकर, उमेश कवळे आदी महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली म्हणी आणि वाक्प्रचारांवरील चित्रे समाविष्ट आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हजार काम एक चित्र करते आणि हजार अनुभवांचे ज्ञान एक म्हण देते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीतीने जसे नीतीमूल्ये शिकवली, तसेच काम या म्हणी आणि वाक्प्रचार करतात. जे सांगायला निबंध लिहावा लागेल ते एका ओळीची म्हण सांगते.” आजच्या पिढीपासून हा अमूल्य ठेवा दूर होत चालला आहे. तो पुन्हा रुजविण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे मत पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले. जुन्या काळातील म्हणी हसत-खेळत, हलक्या-फुलक्या पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हाच या पुस्तकामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. हे पुस्तक अॅमेझॉनवर तसेच ओला वाकोला बँक्वेट, सांताक्रूझ येथे उपलब्ध आहे. पुस्तकासाठी ९७०२3८६७६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दिव्यांग मुलांना ब्लाइंड काठी भेट

पारनेर : जिल्हा सहकारी बँक व जीएस महानगर बँकेचे दिवंगत माजी अध्यक्ष अॅड. उदयराव गुलाबराव शेळके यांच्या जयंतीनिमित्त  मुंबईतील शेकडो दिव्यांग मुलांना काठी वाटप (ब्लाइंड स्टीक) करण्यात आले. जीएस महानगर बँकेच्या…

रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान- आरती साळवी

मुंबई : रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे असा सामाजिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांनी अजित दादा पवार…

– जागतिक कांदळवन दिनी तरुणाई मैदानात, प्रशासन मात्र गायब!

 कांदळवन वाचवा… पर्यावरण वाचवा… भविष्यातील पिढ्या वाचवा! – पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासासाठी युवकांचे पोलिसांना शांततापूर्ण साकडे मिरा – भाईंदर जागतिक कांदळवन दिनानिमित्त आज भाईंदर (पूर्व) येथील जैसल पार्क खाडी परिसरात फॉर फ्यूचर इंडिया, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानामध्ये १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ७५० किलोहून अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला. या उपक्रमात पाटकर कॉलेज NSS युनिट, LRMC कॉलेज NSS युनिट, रॉयल कॉलेज NSS युनिट, तसेच शहरातील अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही या अभियानात सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना कांदळवनांचे पर्यावरणीय, जैवविविधता, हवामान बदल नियंत्रण तसेच किनारपट्टी संरक्षणातील राष्ट्रीय व जागतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ करून कांदळवन संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वच्छता अभियानानंतर उपस्थित पर्यावरणप्रेमी युवकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवन नाश प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर व आरोपपत्रांमधील कथित प्रक्रियात्मक त्रुटी, तपासातील विसंगती आणि मुख्य आरोपींना वगळल्याच्या आरोपांमुळे युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. युवकांनी निदर्शनास आणून दिले की, काही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींना वगळून इतर व्यक्तींवर जबाबदारी टाकल्याचा संशय निर्माण होतो, तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्यानुसार तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन येथील पर्यावरणीय गुन्ह्यांशी संबंधित दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तपासातील अनेक विसंगती प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात एसीपी, डिसीपी, अडिशनल सीपी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी देऊनही अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. उपस्थित युवकांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम पोलिसांविरोधातील आंदोलन नसून, पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास अधिक निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावा यासाठी केलेले शांततापूर्ण आवाहन आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये कोणालाही अभय मिळू नये, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहावा, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता अभियानानंतर युवकांनी हातात विविध जनजागृतीपर फलक घेऊन पोलिसांना शांततापूर्ण पद्धतीने साकडे घातले. “निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या”, “पोलीस जागे व्हा, पर्यावरण वाचवा”, “पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा”,…

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांमध्ये हिवताप, डेंग्यु आजारांबाबत जनजागृती

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विठ्ठल रूक्मिणी मंदिरांच्या आवारात व परिसरात तेथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांनी कुकशेत येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीर परिसरात आयोजित शिबिराला भेट देऊन त्याठिकाणी मांडलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली व आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शिबिराच्या मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विभागांमध्ये असलेल्या २१ विठ्ठल मंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करुन त्याठिकाणी भेट देणा-या एकूण ११२०९ भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच ४५ भाविक नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे याठिकाणी ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात कशी असतात हे दाखवून तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून डासोत्पत्ती होऊ नये याकरिता घराभोवती व घारंतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने, उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने झाकून ठेवणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे तसेच आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, घराभोवतालचे वा गच्चीवरील भंगार साहित्य, टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे, ताप येताच त्वरित डॉक्टरांना प्रकृती दाखवून त्यांचा सल्ला घेणे याबाबत जनजागृती करण्यात आली. नमुंमपा आरोग्य विभागामार्फत हिवताप / डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी जागरूक राहून आपल्या घरातील व घराभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर भंगार – टाकाऊ साहित्य पडलेले असल्यास त्यात पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती होऊ शकते हे लक्षात घेत ते नष्ट करावे आणि हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालण्यासाठी आपलेही सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला पावसाळी सहलीचा आनंद  गाणी, नृत्य खवय्यांची धूम धमाल मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांची पावसाळी सहल कर्जत येथील एंजल रिसॉर्ट येथे गेली होती. या सहलीसाठी गेलेल्या दोन बसमध्ये ५५ महिला व ४५ पुरुष सभासद असे एकूण १०० सभासद सहभागी झाले होते. सानपाडा येथील विरंगुळा केंद्राच्या कार्यालयाजवळून बस सुटण्यापूर्वी सहलीत सहभागी झालेल्या सर्वांना गुळाचा चहा देण्यात आला. बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाला पाण्याची बाटली व  थोडासा नाष्ता म्हणून सुकामेवा  देण्यात आला. महिलांचा सहभाग असल्यामुळे बसमध्ये अगदी आनंदाने गाणी म्हणत अडीच तासात कर्जत येथे रिसॉर्टवर बस पोहोचल्या. रिसॉर्टवर आगमन झाल्यानंतर  सर्वांनी नाष्ता घेतला. त्यानंतर तेथील सदनिकांमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर तरणतलावात बहुतेक सभासदांनी पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी चांगले नृत्य केले. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमांमध्ये महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला. मुंबईला परत निघण्यापूर्वी रिसॉर्ट मालकांनी सर्वांना गरम भजी आणि चहा दिला. सर्व ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीचा आनंद लुटत प्रवास करत नवी मुंबईला सुखरूपपणे पोहोचले. ज्येष्ठ नागरिकांच्या या एकदिवशीय सहलीमध्ये संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, नाट्यकलाकार, अभिनेते व संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर, संघाचे सचिव जगदीश एकावडे खजिनदार महादेव पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे सीमा बोराडे सहसचिव राजेंद्र कदम राजाराम घोलप,  संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ.  विजया गोसावी, माजी सचिव चंद्रकांत पारपिल्लेवार,  माजी खजिनदार विष्णूदास मुखेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

अगं आई अहो आई’मध्ये कौटुंबिक नात्यांचा हळवा प्रवास

 मराठीची नवी ओरिजिनल सीरिज २४ जुलैपासून संपदा सावंत Zee5 मराठीने आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज **‘अगं आई अहो आई’**चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, ही सीरिज २४ जुलै २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

 आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ मुंबई : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६–२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे. या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ‘पैलवान दत्तक योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.” गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना’ ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल. शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. दिग्गज मल्लांची उपस्थिती या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला. निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा  विश्वास व्यक्त केला. 0000

विद्यार्थी आरोग्य शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार

रमेश औताडे मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आरोग्य  शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंचरे, वाफगाव प्राथमिक केंद्र वाफगावच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.मेघना जाधव,खेड ता.भाजपचे उपाध्यक्ष दिलीप माशेरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे, खेड.ता.ख.वि.संघाचे संचालक संतोष गोरडे, ॲड.सुहास दौंडकर, प्रा.बाळासाहेब माशेरे, उद्योजक उमेश दौंडकर. भाऊसाहेब फुके, ॲड समीर गोडसे, नीलेश घोडके, समाजसेवक बाबा हजारे, पवना हाॅस्पीटलचे व्यवस्थापक भारत, दांगट आदी मान्यवर कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधायक उपक्रम राबवित असताना पवना हाॅस्पीटल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व स्टाफ यांचे आभार मानले.तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

– शिळफाटा- कल्याण फाटा चौकात लवकरच वाहतूक सिग्नल

 कोंडी व अपघातांवर उपाययोजना नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आरती परब दिवा: शिळफाटा-कल्याणफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर या दोन्ही महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा…