Category: मुंबई

Mumbai news

गीत संगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचे आवाहन

कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह…

 काशिगाव मेट्रो स्थानकातील वाहतूक कोंडीवर एमएमआरडीएला २ महिन्यांचा ‘अल्टिमेटम’!

– प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे. पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा

कल्याण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न…

 जिल्ह्यात ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत पाचपट वाढ

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा हरिभाऊ लाखे नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानातंर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील महिन्यात (फेब्रुवारी ते मार्च) शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व ऐतिहासिक प्रगती नोंदविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘लक्षित उपचारात्मक अध्यापन’ आणि ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असून ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. जिल्हा मूल्यांकन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील १,३९,७०१ विद्यार्थी ‘निपुण’ श्रेणीत पोहोचले असून, केवळ एका महिन्यात ५५,९९० नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ही वाढ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक मानली जात आहे. आकडेवारीनुसार, ‘सुपर निपुण’ शाळांची संख्या २३३ वरून थेट १,११३ पर्यंत वाढली आहे, तर ‘निपुण’ शाळांची संख्या ३५३ वरून १,४७१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अत्यंत कमी कामगिरी असलेल्या १३१ पैकी ९७ शाळांनी (७४ टक्के) आपली गुणवत्ता सुधारून ‘निपुण’ श्रेणी प्राप्त केली आहे. हे यश जिल्हा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या यशामागे जिल्हा परिषदेने राबवलेली ‘पंचसूत्री’ रणनीती महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये उपचारात्मक स्तराधारित कृतीपुस्तिकांचे वितरण, वाचन संस्कृतीला चालना देणारी ‘१०० दिवस वाचन मोहीम’, प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चिती, विद्यार्थी व अधिकाऱ्यांमधील थेट संवाद आणि क्षेत्रीय पातळीवरील नियमित भेटी यांचा समावेश आहे. उपचारात्मक शिक्षण उपक्रमांतर्गत ५,६२५ विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ‘उपचारात्मक संच’ उपलब्ध करून देण्यात आले. भाषा आणि गणित विषयांसाठी दररोज एक तास स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सुधारणा दिसून आली. ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे दररोज दोन डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या विशेष बैठका घेऊन कामाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले. तसेच, आव्हानात्मक भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळांना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यात आला.

शिक्षकांना मिळणार थकबाकी!

शिक्षकांना मिळणार थकबाकी! मुंबई पालिका प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या मान्य मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची जून-जुलैपासून थकबाकी देण्यात येणार आहे. त्याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून असलेली प्रवास भत्त्याची मागणीही मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यात याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात श्रमिक पालिका शाळेतील शिक्षकांना मासिक २,७०० प्रवास भत्ता मिळतो. तर प्राथमिक अनुदानित शाळेतील २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवघा ६०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. पण यावर तोडगा निघाला असून महापालिकेने प्रवास भत्ता देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार नेते प्रशांत पाटील यांनी दिली. उत्कर्ष सभा यांच्या पदाधिकाऱ्यांची कामगार नेते प्रसाद लाड, बाबा कदम, भालचंद्र साळवी, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने काही प्रलंबित मागण्या मान्य केल्या. पालिकेच्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आला. पण अद्याप सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. मात्र या बैठकीत जून-जुलैपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे मान्य केले आहे.

इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास महायुती सरकारकडून वेळकाढूपणा, ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब- वर्षा गायकवाड.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत…

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा, प्रभादेवी-२०२६.

मुंबईतील वरळी येथे आजपसून होणाऱ्या पहिल्या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. वरळीकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडू्नच्या खेळाची मेजवानी पुढील चार दिवस मिळणार. मुंबई :- ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ एप्रिलला सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा संध्याकाळी ६ ते १० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेची तयारी जोमाने सुरु असून स्पर्धेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून ओम् ज्ञानदीप मंडळाचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली. पुरुष व्यावसायिक गट विभागणी :- १) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोष्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्. २) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.…

वाशी येथे राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सुरुवात

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे ६० व्या सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेला आज सकाळी ९…

बालवीर स्पोर्ट्स क्लब चेंबूर, अंबिका सेवा मंडळ कुर्ला संघ विजेते

कुमार गट प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा मुंबई : राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि कुर्ला क्रीडा केंद्र कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी…

क्रॉस मैदानावर रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या टी-२० स्पर्धेला दमदार सुरुवात उपशीर्षक :

उद्घाटन सोहळा बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर व प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते संपन्न मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष/महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ ला आज १३ एप्रिल रोजी चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर…