Category: मुंबई

Mumbai news

देखाव्यातून उलगडला मूकनायकचा प्रवास

कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते. मात्र पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय…

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच

कल्याण : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी इको गाडीचा अपघात होऊन ११ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर आरटीओ आणि वाहतूक पोलीस…

उल्हासनगरात ‘चार साहिबजादे’ एमआरआय-सिटी स्कॅन केंद्राचे उद्घाटन, स्वस्त दरात आधुनिक आरोग्यसेवा

आमदार कुमार आयलानी यांच्या उपक्रमाचे शहरात स्वागत; गरजूंना मोठा दिलासा सुनील इंगळे उल्हासनगर :उल्हासनगरात धीरज कुमार आयलानी यांच्या स्मरणार्थ ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्रा’चे भव्य उद्घाटन मंगळवारी सेंट्रल हॉस्पिटलजवळील…

 उल्हासनगरातील सुभाष टेकडीत मोफत पाणीपुरी वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हंसराज जामणीक व सुरेश…

 ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे कल्याणमध्ये आयोजन

शिस्त, सलोखा आणि क्रीडाभावनेचा अद्वितीय संगम कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली २५ व्या ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई झोन अंतर्गत राजीव गांधी स्टेडियम, बेलापूर येथे १७, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबईतील सेवादल क्षेत्र I ते VII, डोंबिवली, वसई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, खरसई (रायगड), नागपूर, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चिपळूण आणि गोवा येथील एकूण २१ निवडक संघ सहभागी होत आहे. उल्लेखनीय म्हणजे निरंकारी सेवादल आणि श्रद्धाळू भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतनेसह मानवी मूल्यांचा व क्रीडाभावनेचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे आयोजन केवळ स्पर्धात्मकतेपुरते मर्यादित न राहता, खेळाच्या माध्यमातून शिस्त, एकता आणि सलोखापूर्ण वातावरणाची निर्मिती व्हावी, या दिव्य हेतूने सन २००० मध्ये बाबा हरदेव सिंहजी यांनी मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेची पायाभरणी केली. सुरुवातीला सन २०११ पर्यंत ही स्पर्धा केवळ मुंबई परिक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु सन २०१२ पासून या स्पर्धेचे महाराष्ट्रातील विविध झोनमध्ये आयोजन केले जाऊ लागले, ज्यामुळे अधिकाधिक सेवादल सदस्य आणि श्रद्धाळू भक्त या उपक्रमाशी जोडले गेले. मंडळाच्या नेरुळ सेक्टरचे संयोजक वसंत गोड यांनी माहिती देताना सांगितले, की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा, मेंबर इंचार्ज (वित्त व लेखा) जोगिंदर मनचंदा तसेच मेंबर इंचार्ज (प्रचार-प्रसार) मनमोहन छाबडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. याशिवाय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची उपस्थितीही या सोहळ्याला अधिक विशेष बनवेल. निरंकारी स्पोर्ट्स कमिटी (महाराष्ट्र) तर्फे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक आणि सुनियोजित तयारी करण्यात येत आहे. हि स्पर्धा युवकांमध्ये आत्मिक जागरूकतेसोबतच मानवी मूल्यांचे संवर्धन तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे प्रभावी माध्यम ठरेल. या माध्यमातून सहभागी युवावर्ग दिव्य गुण आत्मसात करून केवळ संतुलित, सुंदर आणि यथार्थ जीवनच जगणार नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या जीवनाचे वास्तविक मुख्य ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतील.

राज्य अजिंक्य कॅरम स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे सुरु असलेल्या ६० व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या संघाने ठाण्याच्या संघाचा २-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. पुण्याच्या अनिल…

अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेस खेळाडूंचा चांगला प्रतिसाद

मुंबई – येत्या १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुंबई विभागस्तरीय अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेत ४० संघातून ७०० हून जास्त खेळाडूंनी  नोंद केली आहे. बोरीवली पश्चिम स्थित सुविद्या प्रसारक संघ, स्कूल…

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली स्वाती घोसाळकर मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी…

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी   मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला…

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.