Category: मुंबई

Mumbai news

कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

अशोक गायकवाड पनवेल : एमजीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कामोठे यांच्यामार्फ़त जागतिक क्षयरोग दिननिमित्त क्षयरोग याविषयी सीएमई एम.जी.एम.मेडिकल कॉलेजला डॉ.जी. एस.नरशेट्टी व रायगड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न झाला. एमजीएम हॉस्पिटल हे एमडीआर टीबी साठी हेड क्वार्टर असून टीबी च्या उपचाराकरिता रायगड जिल्हा क्षयरोग कार्यक्रम व एमजीएम मध्ये करार झाला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रसाद वैगनकर, जन वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख आणि डॉ.प्रदीप व्ही.पोतदर श्वसन रोग विभाग प्रमुख यांच्यामार्फत करण्यात आले. डॉ.ज्योति सालवे यांच्या द्वारे टीबी, एमडीआर विषयी माहिती, प्रतिबंधात्मक उपाय व जनजागृति यावर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पनवेल शहर क्षयरोग अधिकारी डॉ.उषा नाईक यांनी क्षयरोग शासकीय कार्यक्रम व या कार्यक्रम करिता डॉ.समीर पाचपुते, डॉ.निखिल राणे, डॉ.पल्लवी कदम, डॉ.देवदत्ता दाबोलकर, डॉ.श्रीजा नायर, डॉ.शमा शेटये आणि उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग अधिकारी यासारखी मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते. तसेच १०० हून अधिक एम.जी.एम व इतर हॉस्पिटल,मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली

राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मुंबई / रमेश औताडे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची  उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या  प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी  भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत. राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार ०४/०९/२०२५ व ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे. महसुलमंत्री यांच्या निर्देशाची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही.मा.उपअधिक्षक,भुमी-अभिलेख शिरूर यांनी सदर गटातील मोजणी प्रक्रीया होण्यासाठी दिलेल्या हरकत अर्जाची सुनावणी घेऊन आदेशावर २८/११/२०२५ ही तारीख असताना  जाणूनबुजून ०८/०४/२०२६ ला निकालाची समज उशिरा दिली व तातडीने १०/०४/२०२६ ला प्रतिवादी यांच्याशी संगनमत करून मोजणी करण्याचा खटाटोप केला असा आरोप नळकांडे यांनी निवेदनात केला आहे. महसुल मंत्री यांच्या आदेशाची अधिकारी अंमलबजावणी करीत नसतील तर न्याय कोठे मागायचा ? त्यामुळे तातडीने हद्द कायम करण्याची प्रक्रीया स्थगित करावी व सदर प्रकरणी मा.अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी सुनावणी होऊन निर्णय द्यावा यासाठी बुधवार १५ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब नळकांडे यांनी सांगितले.

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती

मुंबई,  (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड…

 महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य

मुंबई: व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि सागरी संपर्क या क्षेत्रांत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या विभाग –७ साठी विकास आणि व्यापारवृध्दीच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला  सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. या पाचही क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य होईल, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या  महाराष्ट्र – गोवा – गुजरात या विभाग –७ च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये “व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम” या विषयावर त्या बोलत होत्या. लोकसभा अध्यक्ष  ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ९ व १० एप्रिल, २०२६ रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती  हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे, महाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत आपले महत्वपूर्ण विचार मांडले. व्यापार क्षेत्राबाबत, महाराष्ट्र आणि गुजरात हे औद्योगिक इंजिन असून गोवा सेवा, पर्यटन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे सांगत त्यांनी अंतर्गत व्यापार मजबूत करण्यावर भर दिला. सूक्ष्म, लघु उद्योगांमध्ये महिलांचा मोठा वाटा असून, त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी तांत्रिक साधने आणि आर्थिक साक्षरता प्राप्त करुन देण्याची गरज आहे. मत्स्यव्यवसाय आणि पारंपरिक उद्योगांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. पर्यटन क्षेत्रात महिलाच संस्कृतीच्या प्रमुख संवाहक असल्याचे नमूद करत त्यांनी महिला नेतृत्वाखालील होम-स्टे, सहकारी संस्था आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. सुरक्षित आणि सन्मानजनक पर्यटन वातावरण निर्माण करणे ही राज्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहरीकरणाच्या संदर्भात, वाढत्या शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. महिला-अनुकूल अशी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृहे सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. पर्यावरण आणि सागरी संपर्काबाबत, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक पर्यावरण समित्या आणि सागरी मंडळांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. त्या पर्यावरण संवर्धनात प्रभावी भूमिका बजावू शकतात, याकडे उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलतांना पुढे सांगितले की विकास प्रक्रियेत ग्रामीण भागातील महिला, आदिवासी समाज, लघु – मध्यम क्षेत्रातील व्यापारी आणि असंघटित कामगार यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. संसदीय यंत्रणेमार्फत योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, महिलांकडे केवळ संख्यात्मक नव्हे तर निर्णयक्षम गुणात्मक नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. विभाग –७ चा विकास करताना समता, पर्यावरण संरक्षण आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना प्राधान्य देण्यात यावे. महिला नेतृत्वामुळे समाजाची सर्वांगीण प्रगती होत असते, हा मुद्या त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केला.

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर

   विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला पुरस्कार संजय डहाळे यांना मुंबई : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला येत्या २४, २५ आणि २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस आयोजित करण्यात आली असून या वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. रसिक श्रोत्यांनी या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. ०००००००

ठाणेची ५ सुवर्ण, ४ रौप्यांसह एकूण ९ पदकांची दिमाखदार कमाई!

राज्य अजिंक्यपद खुली बॅडमिंटन स्पर्धा ऋषिकेश जोगळेकर, विनय पाटील, मृणाल पोद्दार चमकले! मुंबई येथील पवई येथील आय आय टी येथील बॅडमिंटन कोर्टावर ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या आवाहन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली. विविध गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी केलेला दमदार खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे संपूर्ण स्पर्धेत ठाण्याचा दबदबा पाहायला मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, तसेच इतर सहाय्यक प्रशिक्षकांच्या सहकार्याने खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साकारली. पुरुष एकेरी गटात विनय पाटीलने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फेरीत शारविल तेंबुळकरला १५-३, १५-८ अशा सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत राफेल मस्कारेनहासला १५-१०, १५-७ अशा सरळ सेटमध्ये हरवले. उपांत्य फेरीत ऋतुराज चिपटविरुद्ध २१-१९, २१-१० असा प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात माजी ठाणे अकॅडमीच्या वरिष्ठ खेळाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरी गटात नव्याने तयार झालेल्या ऋषिकेश जोगळेकर व विनय पाटील या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित करत सुवर्ण पदक पटकावले. १६ फेरीत अथर्व बागवे व प्रथमेश कांबळे यांना १५-६, १५-४ अशा सहज पराभूत करत सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत सोहम फाटक व तेजस प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध १०-१५, १५-१२, १५-१३ असा थरारक विजय मिळवला. उपांत्य फेरीत ठाणे अकॅडमीच्याच माजी वरिष्ठ खेळाडू कृष्ण देसाई व पार्थिव नायर या जोडीविरुद्ध १८-२१, २४-२२, २१-१८ अशा दीर्घ आणि उत्कंठावर्धक सामन्यात विजय मिळवत सर्वांना थक्क केले. अंतिम फेरीत आर्यन वर्मा व कृष्णा मजेठिया या जोडीवर २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. महिला दुहेरी गटात मृणाल पोतदार हिने आपल्या जोडीदारासह उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम फेरीत ठाणे अकॅडमीच्या अनुभवी जोडी अनामिका सिंग व अनघा करंदीकर यांच्यावर २१-१९, १७-२१, २१-१६ अशा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव व अनामिका सिंग या जोडीने सुवर्ण पदक जिंकत ठाण्याच्या यशात भर घातली. अंतिम फेरीत त्यांनी कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर १७-२१, २१-१७, २१-१९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे फलित आहे. विशेषतः नव्या जोड्यांनी दिलेली कामगिरी आशादायक आहे आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर नक्कीच चमकतील.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचे नाव उंचावत आहेत. या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” ००००००००

कामे करा नाहीत घरी बसा’, कामचुकार नेत्यांना श्रीकांत शिंदेंची तंबी

आरती परब डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेबाबत सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेत मतदारांना नोंदणीसाठी आवश्यक मदत व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेत याबाबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण- डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा

महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ   हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि  कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या  कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात  विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने    नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव  केला . दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज‌ पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात  बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६  गुणांनी आरामात पराभव केला. तर भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली  विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत‌ दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने   तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला. ०००००००

एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२०  क्रिकेट स्पर्धा

धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले. विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२). ०००००००००

दुसऱ्या मानांकित सामंतला हरवून वर्तक उपांत्य फेरीत

जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने…