Category: मुंबई

Mumbai news

– रानभाज्या विक्रीसाठी दाखल!

– शहापूरात हिरव्यागार रानभाज्यांचा  बाजार फुलला आदिवासींना मिळाली रोजीरोटी ! अविनाश उबाळे ठाणे : शेवळी,तेलपाट,ससेकांद, कोळु ,अळू ,कोरडु ,पेंढरं खुरनासनी ,तेरा ,लोत,या दुर्मिळ अशा दाट जंगलात खास पावसाळ्याच्या मोसमातील मिळणाऱ्या रान…

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण आंदोलन निर्धार सभा

रमेश औताडे मुंबई: अनुसूचित जाती आरक्षणाचे ऊपवर्गीकरण लवकर करावे या करीता आझाद मैदान मुंबई येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी होत असलेल्या आंदोलनाचाआढावा घेण्यासाठी सकल मातंग समाजाची निर्धार बैठक शेगाव बुलढाणा येथे पार पडली. या संभाव्य आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे माहिती दिली. बैठकीचे अध्यक्षपद निमंत्रक विजयभाऊ आंभोरे यांनी भूषवले. बैठकीस राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर, सुदाम धुपे, पंडित सूर्यवंशी, कैलाश डाखोरे, ॲडव्होकेट राम चव्हाण,परिमल कांबळे, रणधीर कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, ल. सा. क. म. चे विश्वस्त अध्यक्ष ऊपाडे, सचिव  सुभाष तोंडारकर, प्रा. अंबादास सकट, ए टी अवचार, प्रदेश अध्यक्ष प्रा संजय गायकवाड, अविनाश  बागवे मातंग एकता आंदोलन प्रमुख, सुनिल बावकर, दयानंद आडागळे,विलास साबळे ,संजय कठाळे, संजय उबाळे जी, विनोद जोगदंड देवीलाल अवचार, ऍड नरसिंग सूर्यवंशी, मंदाकिनी चव्हाण, संजय कठाले,आणि डॉ. चंदन शिवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विभागीय बैठक, जिल्हा निहाय, तालुका निहाय बैठका घेत ऑगस्ट महिन्यात साहीत्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात अंदोलनाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाबूराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले.

आधारचा आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार

मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत…

भारतातील ३ कोटींहून अधिक नागरिकांवर मेंदू विकाराचे संकट

मिरा-भाईंदर जागतिक मेंदू दिनानिमित्त न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी नागरिकांना मेंदूच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, भारतात ३ कोटींहून अधिक नागरिक न्यूरोलॉजिकल विकारांनी प्रभावित असून देशाच्या एकूण आजारांच्या भारापैकी सुमारे १० टक्के भार या आजारांचा आहे. वाढता ताण, वायू प्रदूषण, बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढते वय यामुळे स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. पवन पै  यांनी सांगितले की, स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अचानक हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण, तीव्र किंवा वेगळी डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा दृष्टीत बदल ही मेंदूची गंभीर इशारे असू शकतात. याशिवाय, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मज्जातंतूंचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांची सुरुवात अनेकदा अत्यंत सौम्य लक्षणांनी होते. वारंवार डोकेदुखी, विस्मरण, हात-पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, हात थरथरणे, झटके येणे किंवा बोलण्यात अचानक अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. जनजागृती, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे लाखो नागरिकांना अपंगत्वापासून वाचवता येईल. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञांकडून उपचार सुरू केल्यास अनेक मेंदूविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णाला दीर्घकाळ निरोगी व स्वावलंबी जीवन जगणे शक्य होते. यामुळे आरोग्यावरील खर्च कमी होईल, देशाची उत्पादकता वाढेल आणि भारत अधिक निरोगी व सक्षम राष्ट्र बनण्यास मदत होईल.

 मिरारोडला स्वतंत्र शिधावाटप कार्यालयाला मंजुरी

अन्न,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी मिरा भाईंदर : मिरा रोड परिसरातील नागरिकांना रेशनसंदर्भातील कामांसाठी होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सूरू करण्यात यावे अशी मागणी आमदार नरेंद्र मेहता यांनी १३ मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून एक वचनपूर्ती पूर्ण झाली आहे.राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शासन निर्णय जारी केला आहे. मिरा-भाईंदर शहरासाठी मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप (रेशन) कार्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय २१ जुलै २०२६ रोजी अन्न नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मिरा-भाईंदरमधील ३९ अधिकृत रेशन दुकाने आणि अतिरिक्त ३ दुकाने, अशी एकूण ४२ दुकाने नव्या मिरा रोड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना किरकोळ दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, पत्ता बदल, तक्रारी तसेच इतर शिधावाटपाशी संबंधित कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. त्यामुळे शिधावाटप संबंधित नागरिकांना असणाऱ्या अडचणी दूर होणार असून एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला आहे. मिरारोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मिरा-भाईंदरमधील हजारो रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक ठरणार असून, शिधावाटप यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मीरारोड शिधावाटप कार्यालयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

मुंबई–ठाणे आता तास नाही, मिनिटांत!

 अवघ्या ४ तासांत उभारला १६० टनांचा भव्य गर्डर लाँचर मुंबई : मुंबई–ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)…

Heading – ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक अशोक गायकवाड ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती निलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, जिल्हा खो-खो संघटनेचे प्रतिनिधी विकास कोळी व कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

– अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून ठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम

वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती ठाणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील. वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती. दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदंराजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, असे नमूद करीत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील, असे प्रबोध डावखरे यांनी सांगितले. ००००००००  

मजूर ते उद्योजक प्रेरणा सन्मान उपक्रम

रमेश औताडे मुंबई : बांधकाम साहित्य क्षेत्रातील अदानी सिमेंट ने मजूर ते उद्योजक या प्रेरणा सन्मान उपक्रमात बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारे  मजूर ते उद्योजक असा प्रवास करणारे सुरेंदर चौहान यांचा प्रेरणा सन्मान उपक्रमात सन्मान केला. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंदर अधिक चांगल्या संधी आणि स्थिर भविष्यासाठी मुंबईत आले. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी बांधकाम तंत्र, कारागिरी आणि बांधकाम स्थळावरील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेल्यानंतर सुरेंदर यांनी स्वतंत्रपणे छोटे बांधकाम प्रकल्प स्वीकारण्यास सुरुवात केली. ०००००००००

 व्हॉट्सॲपवर बनावट संदेश व्हायरल

 निवडणूक आयोगाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ठाणे, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपवर भारत निवडणूक आयोग (@ecisveep) आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (@ceo_maharashtra) यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे. व्हायरल होत असलेल्या संदेशात, “SIR-२०२६ दरम्यान मतदाराच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली असून, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल,” असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट संदेशांना किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकांना प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. मतदार यादी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) किंवा मतदार ओळखपत्रासंबंधी कोणतीही माहिती केवळ भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पाहावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करत, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. ००००