Category: मुंबई

Mumbai news

आयडियल १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत ९२ खेळाडूंमध्ये आज चुरस

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ वयोगटामधील विजेतेपदासाठी एकूण ९२ खेळाडूंमध्ये १८ जुलै रोजी चुरस राहील. आंतरराष्ट्रीय…

 गांडूळवाड येथे घरावर वीज पडून घराचे नुकसान

 कुटुंबाची मदतीची मागणी ठाणे : शहापूर तालुक्या मध्ये डोलखांब विभागतील परिसरात बुधवारी विजांच्या कडकडास पाऊस झाला गांडूळवाड येथील  बुधा धर्मा हंबीर यांच्या घरावर वीज पडून शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी साकाळच्या सुमारास घडली. ठाणे जिल्ह्यासह डोलखांब परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने. याचा फटका हंबीर कुटुंबीयांना बसला. बुधवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरावर वीज पडताच मोठा आवाज झाला  घरामध्ये बुधा हंबीर व दोन महिला व लहान मुलं इतर सदस्य होते. घरातील एका पुरुषाला आणि दोन महिलांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही.

अजितदादा पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे…

रमेश म्हात्रेंच्या मुलाच्या अटकेसाठी तक्रारदाराचे कल्याणमध्ये बेमुदत उपोषण

कल्याण : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामुळे मागील वर्षभरापासून फरार आहेत. सतत पाठपुरावा करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत म्हणून…

ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या

– माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी कल्याण : कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन – संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भटाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच परिसरात पूर्वी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी विस्तीर्ण भटाळे तलाव अस्तित्वात होता. मात्र कालांतराने या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने तसेच अतिक्रमण झाल्याने तलावाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले असून आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच तलावामध्ये हळूहळू बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे सांगत जनावरांचे मलमूत्र तसेच सांडपाणीही सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित झाले असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्व असलेल्या या तलावाचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तलावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावांचे पुनरुज्जीवन आणि विकास कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ०००००

ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा पुरस्काराने गौरव

कल्याण : कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या ‘कबड्डी दिन’ सोहळ्यात ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार भाई जगताप आणि…

डोंबिवलीत टोईंग व्हॅन सुरु करण्याची माजी नगरसेवकाची मागणी

०००००००००००० कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेतील स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. चुकीच्या पद्धतीने वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सुरु करण्याची मागणी माजी…

 वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणारी महिला दलाल अटकेत

 दोन पीडित महिलांची सुटका अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ठाणे पश्चिम येथील हॉटेल रोहेलो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, शंभुजी हॉटेलजवळ, विजय गार्डन रोड, कावेसर येथे काही महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १६ जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत एका महिला दलालाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १४३(१), १४३(३) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील कांदिवली येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जुन्या वादातून कल्याण पूर्वेत तरुणाची धारधार शस्त्राने हत्या

कल्याण : जुन्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडली आहे. कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हि धक्कादायक हत्याकांडाची…

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतावर होणाऱ्या परिणामांवर आज मुंबईत सार्वजनिक चर्चा

अनिल ठाणेकर मुंबई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध व त्याचा भारतावर होणारा परिणाम’ या विषयावर सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत टिळक भवन ऑडिटोरियम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुख्यालय, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. या चर्चासत्रात जागतिक युद्धनीती व संरक्षणविषयक अभ्यासक तसेच ‘फोर्स’ मासिकाचे संपादक प्रवीण साहनी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उतगी हे जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, त्याचे जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा तसेच भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितांवर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा या चर्चासत्रात घेतला जाणार असून, विविध क्षेत्रांतील अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००००