Category: मुंबई

Mumbai news

बोरीवली येथील जनरल करिअप्पा  उड्डाणपुलाच्या  दुरुस्तीकरण कामाचे भूमिपूजन

बोरीवली येथील जनरल करिअप्पा  उड्डाणपुलाच्या  दुरुस्तीकरण कामाचे भूमिपूजन सहा महिन्यांत नवीन पूल होणार उपलब्ध मुंबई : बोरिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा जनरल करिअप्पा उड्डाणपूल हा बोरिवलीकरांसाठी सर्वात महत्त्वाचा दुवा समजण्यात येतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरील पदपथ (फुटपाथ), कठडे (रेलिंग), तसेच या उड्डाणपुलावर असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनचालकांना डोकेदुखी ठरत होते. आमदार संजय उपाध्याय यांच्या पुढाकाराने व निर्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे नूतनीकरण/दुरुस्तीकरण करण्याचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार संजय उपाध्याय व मुंबई आर मध्य विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल्ल दिनेश तांबे यांच्या उपस्थितीत आज पार पडला. मुंबई महानगरपालिकेतर्फे आता या पुलाचे रोड सर्फेसिंग (पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण), रेलिंग व उखडलेले फुटपाथ तसेच पूर्व व पश्चिम दिशेला पुलावरून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यांची देखील दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरू होईल. किमान सहा महिन्यांत हा पूल नव्याने उपलब्ध होणार आहे. हे काम होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका ॲड्. सीमा शिंदे, नगरसेविका राणी द्विवेदी निघूट व माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग, विधानसभा संयोजक  दिनेश झाला, भारतीय जनता पक्षाचे बोरिवली मंडळ अध्यक्ष देवसिंग, सुधीर परांजपे, विजयानंद पेडणेकर, प्रभाग अध्यक्ष धर्मवीर ठाकूर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता (पूल विभाग) स. वा. सोने, गडबाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला शिवांजलीचा दुसरा पुरस्कार!

ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला शिवांजलीचा दुसरा पुरस्कार! मुंबई – शिवांजली मराठी साहित्य पीठच्या विद्यमाने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रौढ साहित्य सन्मान,ज्येष्ठकथा लेखक काशिनाथ माटल यांनी लिहिलेल्या “सावट” या कथासंग्रहाला(विभागून) मिळाला आहे. “सावट” या  कथासंग्रहाला फेब्रुवारी महिन्यात फलटण येथील धर्मवीर छत्रपती साहित्य पुरस्कार मिळाला होता.तेथील ऍग्रोन्यूज परिवार ट्रस्टच्या वतीने मराठी भाषा दिनी हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला होता. तसेच ख्यातनाम साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात काशिनाथ माटल यांचा गिरणगावातील कथालेखक म्हणून स्वामीराज प्रकाशनच्या वतीने पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला होता. वरील पुरस्कार ३३ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे. हा साहित्य सन्मान सौ. मोनिका अण्णासाहेब मटाले पुरस्कृत आणि सौ. बबनराव मटाले स्मृती प्रित्यर्थ काशिनाथ माटल त्यांच्या “सावट” आणि सोलापूरचे लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्या “खरा वारस” या दोन्ही उत्कृष्ट पुस्तकांना विभागून देण्यात आला आहे. या पुरस्कारासह अन्य पुरस्कार येत्या २ मे रोजी, राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य नगरी, पिंपळवाड,तालुका जुन्नर येथे संपन्न होणार आहे.

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी केले कौतुक मुंबई: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन…

आझाद मैदानातील आंदोलनाची तातडीने दखल

आझाद मैदानातील आंदोलनाची तातडीने दखल रमेश औताडे मुंबई: स्थानिक पातळीवर सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याने मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केले की मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होतात. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील महसुल प्रशासनाशी निगडीत विविध विषयांवर ६ एप्रिल पासून आझाद मैदान मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशीच तातडीने महसुल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांची भेट आझाद मैदान पोलीसांनी दिली आहे. देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून  तातडीने प्रलंबित अहवाल पाठविण्यास सांगितले आहे तसेच महसुल विभाग ज-५ कार्यासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले आहे. आझाद मैदान येथे अशोकराव टाव्हरे यांच्यासह सुदाम बोरकर, मंगेश नढे, संतोष लोहोकरे, विशाल खाताळे, रामराव लिंबोळे, राहुल अभंग, योगेश भामरे आंदोलनात सहभागी झाले आहेत. चांडोली, तालुका खेड. जिल्हा पुणे येथील गट नं १२६ प्रकरणी तत्कालीन तहसीलदार यांनी जानेवारी २०२० मध्ये भोगावटा २, मधून भोगावटा १ ची कार्यवाही अनाधिकाराने केली आहे. महसुल विभाग ज-५ यांनी एक वर्षापुर्वी तीन पत्रे देऊनही अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनास पाठविला नाही. १५५ अन्वये एका प्रकरणी उपजिल्हाधिकारी कुळकायदा पुणे यांनी मे २०२५ मध्ये उपविभागीय अधिकारी, प्रांत खेड यांना पत्र दिले. जुलै २०२५ मध्ये त्यांनी तहसीलदार खेड यांना पत्र दिले परंतु आजतागायत तहसीलदार यांनी अहवाल पाठविला नाही. उपविभागीय अधिकारी खेड यांनी एका प्रकरणी दोन आदेश पारित केले आहेत. अनेक प्रकरणी सुनावणी संपूनही वर्षभर निकाल दिले जात नाही. या सर्व प्रकरणी ठोस कार्यवाही होईपर्यंत व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई: भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई  : पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एक ची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे  यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी १ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे व तसे निवेदन संबधितांना दिले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात.काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही.जुन्नर-आंबेगाव चे प्रांत यांच्यावर शुक्रवारी झालेली कारवाई काय अधोरेखित करीत आहे? १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी,खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही असे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे. एका प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांचा आदेश नऊ वर्षापुर्वी रद्द करूनही आजतागायत अंमल नाही.अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांच्या आदेशात स्पष्ट बाबी नमुद असुनही राजकीय दबावातून नोव्हेंबर २०२५ मध्ये तहसीलदार खेड यांचेकडील चौकशी पुर्ण होऊनही अर्जदारांना न्याय नाही.खेडमधील महसुल विभागातील एक मोठा अधिकारी व त्याची केबिन एजटांसाठी खुली असते.  एजंट,पुढारी आले का ते थेट अँटी चेंबरमध्ये साहेबाला न विचारता जातात व नंतर साहेबही अँटी चेंबरमध्ये जातात व खुप वेळ गोपनीय चर्चा होत असते, नागरिक मात्र वाऱ्यावर अशी स्थिती आहे असा आरोप अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी? उपविभागीय अधिकारी खेड कार्यालयात अनेक सामान्य नागरिकांच्या केस सुनावणी पुर्ण होऊनही निकाल पुर्ण होत नाही.दोन महिन्यापुर्वी काहींनी सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी उपविभागीय अधिकारी,प्रांत खेड यांची भेट घेतली तर अपिल विभागाचे क्लार्क यांना केस नं व माहिती सांगा ,आठवड्यात होईल असे सांगितले,त्यांना अनेकदा भेटल्यानंतर माहित नाही,फाईल पाठविली अशी उत्तरे दिली जात आहेत असे टाव्हरे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन १ एप्रिलपासून करणार असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले असून जर प्रशासनावर कोणताही अंकुश नसेल,महसुलमंत्री तीन महिन्यात आदेश झाले पाहिजे किंवा नागरिकांसाठी तातडीने जिल्हाधिकारी यांना देखी निर्देश देतात,परंतु अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी विशद केले आहे.

अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धा

श्रेयांश, पलाशचा विजयी फॉर्म कायम मुंबई, ३० मार्च: श्रेयांश सोमैयाने (३ गुण) सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला.  पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने पुन्हा एकदा काळ्या सोंगट्यांनी खेळताना अथर्व पोलेकरवर (२ गुण) मात दिली. पाचव्या बोर्डवर, पलाश मापाराने (३ गुण) काळ्या सोंगट्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (२ गुण) पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. एएफएम सोहम पवारने (३ गुण) देखील अनिश एस कश्यपचा (२ गुण) पराभव करत तिसरा गुण मिळवला. निकाल – दुसरी फेरी (टॉप-10): अथर्व पोळेकर (2) पराभूत वि. श्रेयांश सोमय्या(3) – 0-1;तनुज, दयाल (2.5) बरोबरी वि. एआयएम आकाशकुमार यादव (2.5) – 0.5-0.5; दीपक सोनी (2) पराभूत वि. आश्वी अंकित अग्रवाल (3)- 0-1; एएफएम सोहम पवार (3) विजयी वि. अनिश एस कश्यप (2) – 1-0; प्रेयस वाघमारे (2) पराभूत वि. पलाश मापारा (3)- 0-1; तिस्या अपूर्वा पट्ट (2) पराभूत वि. प्रतीक यादनिक (3)- 0-1; ईशान जथान (2) पराभूत वि. एजीएम राजवीर नहार (3)– 0-1; मेहुल तांडेल (२) पराभूत वि. अनिरुद्ध आनंद अय्यर(३) – ०-१; अहान कातरुका (3) विजयी वि. अभिजय बरुआ (2) – 1-0; पंकज बोरसे (2.5) बरोबरी एएफएम ओंकार विश्वास गायकवाड (2.5) – 0.5-0.5. 00000000

आम्ही सातारकर उद्योजक संघाचा ४ एप्रिलला भव्य व्यावसायिक मेळावा

मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संलग्न आम्ही सातारकर उद्योजक संघाचा भव्य व्यावसायिक मेळआवा ४ एप्रिलला होणार आहे. हा मेळावा मनोहर जोशी हायस्कूल, निसर्ग उद्यानासमोर, धारावी, मुंबई येथे सकाळी १०…

‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचा प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सहभाग

अनिल ठाणेकर मुंबई, प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सागर जोंधळे आणि अनीता म्हात्रे, ‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचे मालक म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही प्रतिष्ठित स्पर्धा ३१ मार्च २०२६ पर्यंत सुंदर उमियम वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये एकूण १४ टीम्स, १८२ सहभागी, ८ देश आणि ५८ आंतरराष्ट्रीय सेलर्स सहभागी झाले आहेत जे या स्पर्धेचा जागतिक दर्जा आणि भव्यता दर्शवतात. ‘मुंबई मेरिडियन्स’ टीमची खासियत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधता. या टीममध्ये रशिया, मलेशिया आणि मुंबई येथील उत्कृष्ट खेळाडू सहभागी आहेत, जे एकत्र येऊन जागतिक स्पर्धात्मकता आणि टीमवर्क दाखवत आहेत. प्रशिक्षक, वर्ल्ड चॅम्पियन कोच विकास कपिला यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एशियन चॅम्पियन टीम मॅनेजर शिल्पा ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहोत. ‘मुंबई मेरिडियन्स’ ही केवळ एक टीम नाही ती एक मिशन आहे. ‘मुंबई मेरिडियन्स टीमला सपोर्ट करा, आणि चला एकत्र येऊन भारताला जागतिक नौकानयन मंचावर उजळून टाकूया.भारतामध्ये नौकानयन खेळाला नवीन उंचीवर नेण्याचं, आणि युवा पिढीला या साहसी खेळासाठी प्रेरित करण्याचे सर्व क्रीडाप्रेमींना आणि देशवासियांना आवाहन सागर जोंधळे यांनी केले आहे. 00000000

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा (राजेंद्र साळसकर) मुंबई- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक ‘पंजाब मेल’ (ट्रेन क्रमांक १२१३७/१२१३८) च्या ‘ट्रेन महोत्सवा’चे आयोजन करत असल्याची घोषणा मोठ्या  अभिमानाने केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच ३० मार्च २०२६ रोजी  संध्याकाळी ६.३५ वाजता, या उत्सवाला सुरुवात होईल. या गाडीला वारसा-आधारित  नक्षीकाम आणि दृश्यांनी सुशोभित करण्यात येईल; जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करेल. हा सोहळा ‘पंजाब मेल’च्या प्रवासाचा लक्ष  वेधून घेईल, जी भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे,. ‘ट्रेन महोत्सव’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘पंजाब मेल’ची ऐतिहासिक मोहिनी अबाधित राखतच, प्रवाशांचा आराम व सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने या गाडीचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे: आतील भाग (प्रथम वातानुकूलित), उत्तम सौंदर्यासाठी कूपै आणि आयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग. बाहेरील ब्रँडिंगमध्ये प्रथम वातानुकूलित-  द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंगने केले गेले आहे. पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत. वातानुकूलित कोचच्या  आत वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.  सर्व वातानुकूलित कोचमध्ये नवीन पडदे पुरवले आहेत. ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद. सामायिक जागा: अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि शौचालयांमध्ये विनाइल रॅपिंग. फलक: सर्व कोचमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक. फायनल टच: अधिक सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा फायनल टच-अप करण्यात आला आहे. पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.बॅलार्ड पिअर मेल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मोलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. ‘पंजाब मेल’ ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यान- पिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या ‘मध्य रेल्वे’च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतिक म्हणून उभी आहे.  मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगती यांच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते.