Category: मुंबई

Mumbai news

कैद्यांनाही साधता येणार कुटुंबासोबत फोनवर संवाद

मुंबई : कारागृहात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कैद्यांना लवकरच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे. राज्यभरातील कैद्यांना ई-मुलाकात आणि स्मार्ट कार्ड कॉलिंग सुविधा दिल्या जातील अशी माहिती सरकार कडून आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसे प्रतिज्ञापत्रात न्यायालयात सादर करण्यात आले. याची दखल घेत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सदर याचिका निकाली काढली. जुलै २०२० मध्ये कोविडच्या काळात, कारागृहामध्ये कैद्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, ही सुविधा २०२१ मध्ये अचानक बंद करण्यात आली. २०१६ साली जारी केलेल्या मॉडेल प्रिझन मॅन्युअलनुसार, प्रत्येक कारागृहाच्या अधीक्षकाने कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिलांशी संपर्क साधण्यासाठी पैसे देऊन टेलिफोन आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देण्यात आली होती. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल सुविधा बंद करण्याचा सरकारच्या निर्णयामुळे कैद्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा, राज्य सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले सरकारच्या भूमिकेचे आम्ही कौतुक करतो. २३ मार्च २०२४ च्या परिपत्रकातील तरतुदीची राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये अंमलबजावणी केली जाईल अशी आशा बाळगून आम्ही याचिका निकाली काढतो असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकील ऍड रेबेका गोन्साल्विस यांनी अशीही तक्रार केली की जे कैदी पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना सुविधांमधून वगळण्यात आले होते आणि त्यांना वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावर आव्हान देण्यासाठी दुसरी याचिका दाखल करण्यास सांगितले.

कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद

मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला फुटल्यामुळे गळती सुरू झाली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या करणास्तव मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तर, नौदलास रात्री होणारा पुरवठा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने होणार आहे. महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो. तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टिने पालिकेने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे. या कामासाठी सकाळी ९ वाजल्यापासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजल्यापासून केले जाईल. कुलाबा, कोळीवाडा येथे शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा विलंबाने होणार आहे.

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवडी आणि भायखळा विभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच ठिकठिकाणी महिलांनी पुढे येऊन त्यांचे औक्षण केले तर सार्वजनिक मंडळांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवडी विभागात सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठीकठिकाणी आमदार यामिनी जाधव यांचे महिलांनी औक्षण केले. अनेक इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे भायखळा विभागात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महायुतीतील नेते मिलिंद देवरा, रोहिदास लोखंडे, मनसेचे संजय नाईक आणि शलाका हरयान आदी महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेतले. अफाट गर्दी , लोकांच्या उत्साहात झालेल्या या रॅलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामिनी जाधव यांचे स्वागत केले. आमदार यामिनी जाधव आल्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी यामिनी जाधव यांना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मंडळांनी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक व्यक्तीचा आशावादी चेहेरा आणखी ताकदीने लढायला संघर्ष करायला ऊर्जा देत आहे, बळ देत असल्याचे यावेळी यामिनी जाधव यांनी सांगितले.

निवडणूकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील दोन वर्षात विविध…

मेलो तरी चालेल पण कमळावर लढणार नाही !

मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी…

राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर

मुंबई : लाव रे तो व्हिडीयोने २०१९ची निवडणूक मोदीविरुध्द प्रचाराने ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर महायुतीच्या उमेदावारांच्या प्रचाराची सभा घेणार आहे. या सभेला…

शिक्षक, पदवीधर मतदारासंघासाठी निवडणूका जाहीर

मुंबई  : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १०…

जनतेची लूट व आरोग्याशी खेळ सुरूच  ऍ!

रमेश औताडे मुंबई : सरकारचे कायदे  असताना आज अनेक ठिकाणी मनमानी कारभार करत अवैध पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अधिवेशन काळात सरकारने याबाबत ठोस पावले…

मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान: प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचा नावलौकिक आहे परंतु मागील १० वर्षात मुंबईच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. मुंबईचे महत्व सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न केला, मुंबईचे विमानतळ, मुंबईतील मोकळ्या जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहेत. धारावीसह शहराच्या झोपडपट्टीतील गरिबांना बेघर करून अदानीला मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत. मुंबई ही मुंबईकरांची आहे व मुंबईकरांचीच राहिली पाहिजे यासाठी मुंबई शहर अदानीला विकणाऱ्या भाजपा-शिंदे सरकारला धडा शिकवा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे हे कोणीही नाकरू शकत नाही. मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेसचे सरकार असतानाच झाली. मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन क्षेत्रांची भरभराट काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मुंबई मेट्रो, वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू, चेंबूर FCLR लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार आणि केंद्रातील डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना करण्यात आली. मुंबईतील कायदा सुव्यवस्था जागतिक पातळीवरची राहिली आहे परंतु भाजपा सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदारच खुलेआम धमक्या देत आहेत, गोळीबार करत आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मुंबईतील कायदा सुव्यवस्था हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. धारावी व मुंबईतील महत्वाचे भूखंड सर्व नियम व अटी बाजूला ठेवून अदानी व भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचीही शिंदे-भाजपा सरकारने वाट लावली, मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर धनदांडग्या लोकांसाठी आखली जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. मुंबईकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या महाभ्रष्टयुतीला लोकसभेच्या निवडणुकीत जागा दाखवा व इंडिया आघाडीला विजयी करा, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज वांद्रे पूर्व भागात चेतना कॉलेजजवळ निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले, यावेळी माजी मंत्री व शिवसेना नेते अनिल परब उपस्थित होते. वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब ते भारत नगर आणि कुर्ला पूर्व भागात स्वदेशी चाळ ते तक्षशिला नगर जनसंवाद यात्रा काढण्यात आली. टिळकनगर येथील बुद्ध विहाराला भेट दिली व कुर्ला पूर्व भागातील शिवसेना शाखा क्रमांक १६९ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच कुरेशी नगरमधील समाज बांधवांशी संवाद साधला.

गायक नंदेश उमपही निवडणुकीच्या मैदानात

ईशान्य मुंबईत बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांसह इतरही अनेक पक्षांचे, अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रसिद्ध गायक नंदेश उमप हेही निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र असलेले नंदेश उमप यांच्या उमेदवारीमुळे ईशान्य मुंबई मतदार संघ चर्चेत आला आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने नंदेश यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात अटीतटीची लढाई होणार आहे. पूर्व उपनगरांचा समावेश असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने संजय दीना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीने मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच या मतदार संघासाठी गेल्या आठवड्यात ३ मे रोजी प्रसिद्ध मराठी लोकगायक नंदेश उमप यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र म्हणून नंदेश यांची ओळख आहेच त्याचबरोबर ते स्वत:ही गायक असल्यामुळे त्यांचीही वेगळी ओळख आहे. मात्र आता कलेच्या क्षेत्रातून त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही यानिमित्ताने प्रवास सुरू केला आहे. याबाबत नंदेश उमप यांनी लोकसत्ताला सांगितले की, गाणे हा माझा श्वास आहे. ते सुरूच राहणार आहे. मात्र समाजातील उपेक्षितांसाठी आपल्याला संविधानिक मार्गातून काही करता आले तर त्याचा मला आनंद वाटेल. यामुळे ही निवडणूक लढवत आहे. कलाकारांचे प्रश्न, अपंगांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. सध्या तरी समाज माध्यमांवरून प्रचाराला सुरूवात केली असून एक दोन दिवसात पक्षाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितले.