Category: मुंबई

Mumbai news

मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक-उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे…

चेंबूर जिमखान्याच्या वतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई: चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जुलै २०२४ दरम्यान चेंबूर जिमखाना, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई – ७१…

सेवानिवृत व दिवंगत पोलिसांच्या घरांसाठी आंदोलन

रमेश औताडे     मुंबई : सेवेत असतानाही त्रास व सेवानिवृत्ती नंतर तर जास्त त्रास सरकारकडून होत आहे. वेळोवेळी सरकार आश्वासन देते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे आम्ही आता आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. असा इशारा सेवानिवृत्त पोलिसांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदानात दिला आहे. वरळी येथील पोलीस बी. डी. डी. चाळ क्रमांक ६४ ते ७४ व ७७ मधील सेवानिवृत व दिवंगत यांना सेवा ज्येष्ठते नुसार पहिल्या टप्प्यामध्ये घरे मिळावीत अशी मागणी करत करत सरकारच्या फसव्या घोषणा व आश्वासनांचा तीव्र प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत असे ठरले होते की,  वरळी बी. डी. डी. चाळी मध्ये राहत असलेल्या पोलीस रहिवाशांना ज्येष्ठ सेवा निवृत्त व दिवंगत यांना सेवाज्येष्ठतेनुसार पहिल्या टप्यामध्ये घरे देऊ. म्हाडाला याबाबत सर्व माहिती व आदेश दिले असताना अद्यापही काहीच हालचाल झाली नाही. म्हणून नाईलाजास्तव आझाद मैदान येथे उपोषण व आंदोलन करण्यास बसावे लागत आहे असे आंदोलनकर्ते सांगत होते. आता तरी सरकारने  सहानभूतीपूर्वक विचार करून लॉटरी व करार त्वरित सुरू करावेत व उर्वरीत पोलीस रहिवाशांच्या दुसऱ्या टप्याकरिता लॉटरी काढून एकाच वेळी करारनामे करण्यास सुरूवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हरियाणा राज्याप्रमाणे कंत्राटदार विरहीत रोजगार द्या

 वीज कंत्राटी कामगार आझाद मैदानात रमेश औताडे       मुंबई : वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दती प्रमाणे  कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आम्ही कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलन करित आहोत मात्र अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नसल्याने आझाद मैदानात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारने जर याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला  आहे. विधीमंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला.रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवले आहे. फक्त कायम  कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. या अगोदर आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केली होती. तेव्हाही सरकारला व वीज कंपनीला जाग आली नाही,  त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करत आहे असे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले. वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा , कायम कामगारांच्या प्रमाणे वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणाली प्रमाणे सन्मानजनक वेतनवाढ करावी, दोषी कंत्राटदार ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी, आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी सचिन मेंगाळे यांनी यावेळी केली. 00000

माझा प्रभाग माझी जिम्मेदारी

माजी नगरसेविकेचे राहिवाश्यांकडून आभार मुंबई : प्रभाग क्रमांक 20 (अ ) येथे ठाणेकर वाडी कन्हैया नगर येथील मार्गावरती राजश्री शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच टीकम सोसायटी, संत…

अंबानीचे कर्ज माफ करू शकता, मग सर्वसामान्यांचे का करत नाही ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल रमेश औताडे मुंबई : मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचे ५ हजार कोटी कर्ज माफ करणारे सरकार सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. कर्जमाफी दूरच मात्र दिलेली आश्वासनही पाळत नाही. तीन महिन्यात माहाविकास आघाडीचे सरकार आले की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार. असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना दिले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात राज्य परिवहन कामगार, अंगणवाडी, आशा सेविका, गट प्रवर्तक, बचत गट प्रशिक्षण देणारे उमेद चे कामगार, शिक्षक, असे अनेक घटक आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. सर्वांनी आप आपले मंडप टाकले आहेत. नाना पटोले प्रत्येक मंडपात जाऊन आश्वासने देत टाळ्या घेत आहेत. भर पावसात चिखल झाला आहे. माश्या घोंगावत आहेत. मेट्रो चे बांधकाम व मुलांचा क्रिकेट सराव सुरू असल्याने मैदान अपुरे पडत आहे. त्यामुळे दाटीवाटीने आंदोलनकर्ते एकच गर्दी करून मैदानात आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आले आहेत. अधिवेशन जस जसे संपत जाते तस तसे आंदोलनकर्ते गर्दी करत असतात. आता या सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनकर्ते राज्यभरातून आले आहेत. सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत महिला आक्रमक झाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मैदानात महिलांनी आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या  बाटल्यांचा खच पडला होता. सरकारने आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून आम्ही काय करू ते कळेलच असा इशारा यावेळी दिला.

मला एक रुपयाचाही निधी दिला नाही-आव्हाड

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मी अजित पवारांच्या पीएला १०० वेळा फोन केले, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…

मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच ऑगस्टपर्यंत तहकूब

आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ मुंबई :  राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू…

आयएएस पुजाचा बोगसपणा उघड ?

मुंबई : अपंग असल्याचा बोगस दाखला देतानाचा ओबीसीचेही बोगस प्रमाणपत्र दाखल करीत आयएएस बनल्याचा पुजा खेडेकर यांच्यावर आरोप होत असून त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या…

वरळी हिट अँण्ड रनप्रकरणी आरोपी मिहीरला ७ दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच येत्या १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अधिक तपास करायचा असून अपघात ज्या गाडीने…