Category: मुंबई

Mumbai news

मुख्यमंत्री असणाऱ्या भावाकडे आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आझाद मैदानातील बहिणींची भर पावसात झालेली अवस्था

माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई : मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना प्रवास करताना दररोज विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या धीम्या रेल्वे मार्गाच्या रुळाला शुक्रवारी दुपारी १.०५ वाजेच्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे लोकलचा वेग मंदावला. संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर, माटुंगा येथे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी १.३९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

पंढरपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत डॉ.राजेश मढवीकडून माऊलींचे सेवाकार्य….

माऊलीच्या चरणी सेवा योग!   मुंबई : महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरिचा वास! चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन विठोबाचे! या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत;अशी भागवत संप्रदयाची धारणा आहे. अशा या पंढरपुर वारीत यंदा ४० व्या वर्षात डॉ.विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा देतात. सालाबादप्रमाणे यंदाही  डॉ.राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने डॉ.राजेश मढवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथिल आरोग्य शिबीरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबीरात हजाराच्यावर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप,अतिसार,उच्च रक्तदाब,जुलाब, अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे,पाय दुखी साठी तेलवगैरेने मसाज अशा सेवा देण्यात आल्या.यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉ.विश्वास सापटणेकर डॉ. राजेश मढवी,डॉ. बेके,डॉ. राव, डॉ. बापट, ज्योती हर्डीकर,रवींद्र कराडकर, विनय नाफडे,निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते. ००००

म्हाडाच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या छताचा भाग कोसळल्याने रहिवाशी संतप्त

रमेश औताडे       मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींबाबत सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असतानाच काही ठिकाणी इमारतींमधे छताचा भाग कोसळणे तर काही ठिकाणी ईमारत खाचने, पडणे अशा घटना घडत आहेत. मानखुर्द येथील पी एम जी पी कॉलनीत जीर्ण झालेल्या  इमारतीचा छताचा भाग कोसळल्याने भयभीत झालेले रहिवाशी संतप्त झाले आहेत. ईमारत क्रमांक २० मधील पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. पहाटे घटना घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यापूर्वीही अशा छोट्या घटना घडल्या असल्याने तात्पुरती मलमपट्टी करून प्लास्टर करण्यात येत होते. अशी तात्पुरती मलमपट्टी अजून किती दिवस करत राहायची ? असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमचा जीव गेल्यावर सरकार लक्ष देणार आहे का ? निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात व आश्वासन देऊन जातात.छताचा भाग पाडून आमचा जीव जाणार आहे. लोकप्रतिनिधींचा नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी देत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारे नाले योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात छताचा भाग कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे. पुनर्विकास होण्यासाठी येथील काही रहिवाशी प्रयत्न करत आहेत मात्र काही रहिवाशी त्यांना सहकार्य करत नसल्याने नवीन टॉवर मध्ये राहण्याचे स्वप्न पाहून एक पिढी वयोवृध्द झाली आहे. त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्यासाठी व छताचा भाग कोसळून जीवित हानी होण्याअगोदर सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत. ०००००

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे विठ्ठल भक्तिपर गीतांचा सांगीतीक कार्यक्रम

मुंबई- मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ ही संस्था सातत्याने ११ वर्षे वाद्यवृंद निर्माते व कलावंताच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने बुधवार  दि .१७ जुलैला सायंकाळी ५ वाजता  अण्णाभाऊ साठे…

05 ऑगस्टला नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

मुंबई –  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे ऑगस्ट 2024 महिन्याचा लोकशाही दिन दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 जुलै 2024 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे. सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 0000

सर्व प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज नोंदणी कक्ष

तातडीने सुरु करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश     नवी मुंबई : “मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने”ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 8 विभाग कार्यालयांप्रमाणेच महानगरपालिका वा शासकीय इमारतींमध्ये सर्व प्रभागांत अर्ज नोंदणी कक्ष तात्काळ सुरु करावेत व त्याची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक स्वरुपात प्रसिध्द करावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश योजनेच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जाहीर करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ 1 अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला ह्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाईन अर्ज भरु शकतात, तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने स्थापित केलेल्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणी कक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 1 असे 111 नोंदणी कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे योजनेसाठी पात्र महिलांच्या सुविधेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशाप्रकारे 2 सत्रात असावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. योजनेकरिता भरण्यात येणारे अर्ज बिनचूक भरावेत व शासन निर्णयात नमूद केलेली पुराव्यांची आवश्यक ती योग्य कागदपत्रे तपासून अपलोड करावीत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. एकही पात्र लाभार्थी महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अर्जात भरली जाणारी माहिती आधारकार्ड पायाभूत मानून त्यानुसार भरावी व अर्ज भरतानाच तो पूर्णपणे योग्य प्रकारे भरला जाईल याची विशेष काळजी घेण्याची आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने फलक लावण्यात यावेत, हस्तपत्रके वितरीत करावीत, सर्व सोशल माध्यमांचा वापर करावा, अर्ज भरणा सुविधा केंद्रांची यादी जास्तीत जास्त माध्यमांतून प्रसिध्द करावी तसेच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांच्‍यामार्फत त्यांच्‍या घरांपर्यंत योजनेची माहिती पोहचावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बालवाडी शिक्षिका/सेविका, आशा वर्कर तसेच समाजविकास विभागातील समुह संघटक यांच्यामार्फतही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घराघरात या योजनेची प्रसिध्दी करावी अशा सूचना देण्यात आल्या. विभाग कार्यालयांप्रमाणेच शाळा, रुग्णालये याठिकाणीही होर्डिंग – बॅनर्सव्दारे योजनेची प्रसिध्दी करण्याचे सूचित करण्यात आले. लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे घ्यावेत व ऑफलाईन घेतलेल्या अर्जांची पोहोच लाभार्थ्यांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. बालविकास विभागाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 226 अंगणवाड्या सुरु असून त्याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी नोंदणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री – लाडकी बहीण” योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशाप्रकारे कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या…

गणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार- आदिती तटकरे

मुंबई : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन     मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नाना पटोले, दीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.