Category: मुंबई

Mumbai news

आरक्षणप्रश्नी सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही: नाना पटोले

मुंबई  : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी…

अदानी विरोधात आज काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

मुंबई  : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ ७ टक्के असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ ३० टक्के आहे. एवढी…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ

कामकाज दिवसभरासाठी तहकूब   गदारोळात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या  मंजूर मुंबई   :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल  बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही…

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे वैद्यकीय पथक वारीत

मुंबई : वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या आतापर्यंतच्या आषाढी व कार्तिकीवारीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अलौकिक कार्याचा गौरव केला. या वारीत संस्थेचे २५० कार्यकर्ते व डॉक्टर रुग्णवाहिका, औषधांच्या…

 म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होणार १७१ कोटी

११२ दुकानांसाठी विक्रमी बोली     मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे आता या दुकानांच्या विक्रीतून मंडळाच्या तिजोरीत १७१ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. तर ११२ दुकानांना बोली लावण्यात आली आहे. ११२ दुकानांसाठी मंडळाने ९७ कोटी ७४ लाखांची बोली निश्चित केली होती. पण प्रत्यक्षात मात्र १७१.३८ कोटींची बोली लागली असून ही बोली विक्रमी मानली जात आहे. मंडळाच्या निश्चित बोलीपेक्षा ७३ कोटींनी अधिक बोली लागली आहे. त्यामुळे मंडळाला १७१ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. ई लिलावानंतर आता मंडळाने दुकानांच्या वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासून ११२ यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर दुकानांच्या एकूण बोलीच्या १० टक्के रक्कम भरून घेतली जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम भरून घेत दुकानांचे वितरण यशस्वी अर्जदाराला केले जाणार आहे. ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मुंबईतील प्रतीक्षा नगर, बिंबीसारनगर, मालाड, मालावणी आदी ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. जूनमध्ये ही प्रक्रिया संपुष्टात आली आणि २७ जून रोजी बोली लावण्यात आली. तर २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. 00000

राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी

 वरळी हिट अँड रन प्रकरण :   मुंबई : मुंबईतील वरळीच्या परिसरात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली होती. या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. मात्र, या प्रकरणानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. यानंतर राजेश शाह यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शाह याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय? मुंबईमधील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा होता. दरम्यान, हा अपघात घडला त्यावेळी मिहीर शाह याने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली होती. यानंतर मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप आहे. 00000

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपीचा वावर असलेल्या बारवर पालिकेचा हातोडा

अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त     मुंबई : जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केले.वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. त्यांनतर, दारूच्या नशेत असतानाही त्याने मोटार चालविली. बेदरकारपणे मोटार चालवत असताना वरळी येथे दुचाकीला धडक देऊन वृध्द दांपत्यास चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, कायद्याचे पालन न करता आरोपीला दारू दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 00000

 विद्यार्थ्यांची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात कृती

 सीवूड्सच्या एसएस हायस्कुलमध्ये वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या केल्या तयार   नवी मुंबई: स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला विघातक असणा-या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा विभाग कार्यालयांमार्फत तसेच परिमंडळ स्तरावरील पथकांमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस या ठिकाणी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री.  शशिकांत तांडेल आणि स्वच्छता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी विविध प्रकारची माहिती देत पटवून देण्यात आली तसेच प्लास्टिक पिशव्यांनी कापडी – कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणा-या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. थ्री आर ची संकल्पना राबविताना टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना कच-याचे घरापासूनच 3 प्रकारे वर्गीकरण करणे, कम्पोस्ट पीटव्दारे कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, थ्री आरचे महत्व अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली व त्याची स्वत:पासूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई यांचे बेलापूर विभाग कार्यालयाला अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील व श्रीम. ज्योत्स्ना नायर आणि शिक्षकवृंद तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 000

मंगळवारी पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे…