Category: मुंबई

Mumbai news

 जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात

जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात मुंबई: विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३…

मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा उत्सव अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला. १५ जानेवारी २०२५ रोजी नागरिकांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी…

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली शिवसेनेने करुन दिली देवाभाऊंना आठवण मुंबई :  ५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ…

महिलांना बेस्टचे हाफ तिकीट

   महायुतीचा ‘वचननामा‘ जाहीर ० ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत ० २४ तास पाणी ०   लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपा, एकनाथ शिंदें यांची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आरपीआय यांच्या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही कायकाय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. आम्ही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असा…

महाराष्ट्र नव्हे ‘अदानीस्तान’?

भाजपाने अख्खी मुंबई विकायला काढली आहे, अशा शबदात राज ठाकरे यांनी भाजपाच्या अदानी प्रेमाचा बुरका टराटरा फाडला. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर एका व्यक्तीने माहिती दिली, माझी रिसर्च टिम कामाला लागली. आत्ता हे सगळं मी तुम्हाला…

‘शिवतिर्था’वरून ठाकरेंची महाराष्ट्राला साद आता चुकलात तर कायमचे संपलात…

स्वाती घोसाळकर मुंबई : मराठी मनाचा हुंकार म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतिर्थावरून आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यां ठाकरें बंधूनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातलीय. आता चुकलात तर…

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ थरार, चपळाई आणि इतिहासनिर्मितीचा संगम! मुलींच्या गटात रा. फ. नाईकची सरशी, मुलांच्या गटात ज्ञानविकास विद्यालयाची ऐतिहासिक बाजी मुंबई . दादरच्या अमर हिंद मातीत च्या उसळले खो-खोचे रण. धुळीचे लोट उडवत, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पकडी, सेकंदाच्या फरकाने दिलेल्या हुलकावण्या आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ दादरच्या ऐतिहासिक अमर हिंद मंडळाच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेने अक्षरशः क्रीडाप्रेमींना वेड लावले! कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबई, उपनगर व ठाण्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदवत खो-खोची परंपरा, वेग आणि डावपेच यांचा अप्रतिम संगम सादर केला. प्रत्येक सामना म्हणजे जिद्दीची चाचणी आणि कौशल्याची कसोटी ठरली. उद्घाटनाचा मंगल शंखनाद. प्रेरणेची स्फूर्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन अमर हिंद मंडळाचे माजी राज्यस्तरीय व विद्यापीठीय खेळाडू तसेच सध्या ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले अमित चिखलकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली. स्पर्धेत १२ मुलींचे व १५ मुलांचे संघ विजयाच्या ध्यासाने मैदानात उतरले. मुलींचा अंतिम रणसंग्राम , रा. फ. नाईकचे वर्चस्व मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे विरुद्ध ज्ञानविकास विद्यालय, ठाणे यांच्यात चुरशीची लढत झाली. रा. फ. नाईकने ९–५ असा १ डाव राखून ४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. श्रुती चोरमारे (४ मि. संरक्षण व ३ गुण) वैष्णवी जाधव (४ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणिती जगदाळे (२.३० मि. संरक्षण १ गुण) अशी सलग व ठोस कामगिरी नोंदली. पराभूत ज्ञानविकासकडून समृद्धी कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रांजल पाटे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), श्रावणी मोरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र रा. फ. नाईकच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुलांचा थरार . ज्ञानविकासची ‘किंगमेकर’ बाजी मुलांच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, ठाणे संघाने महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे संघावर १०–७ असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला. ज्ञानविकासच्या साहिल शिंदे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), विनायक भणगे (३.५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज बैकर (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक वांगडे (३.५० मि. संरक्षण व १ गुण) अशी निर्णायक कामगिरी नोंदवली. तर पराभूत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तन्मय पूजारे (१ मि. संरक्षण व २ गुण), बाळकृष्ण हरळे (१.४० व १.१० मि. संरक्षण), संदेश गोमणी (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेला लढा कौतुकास्पद ठरला. सन्मानाचा क्षण . विजेत्यांचा गौरव…

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू आमदार मिहिर कोटेचा यांची बीएमसीच्या उपमुख्य अभियंता नवनाथ घाडगे यांच्या निलंबनाची मागणी मुंबई: मुलुंडमध्ये डंपरच्या धडकेत एका रहिवाशाचा मृत्यू झाल्यानंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी…

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा आज सानपाडा येथे करण्यात आले आहे आयोजन मुंबई, दि. (प्रतिनिधी ) : नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने   १०  जानेवारी  २०२६ रोजी  दुपारी २ ते  सायंकाळी ७ या दरम्यान केमिस्ट भवन, सेक्टर ८,  सानपाडा, नवी मुंबई येथे  १६ वा मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित  करण्यात आला आहे.  मराठा विकास प्रतिष्ठान  ही संस्था २००६  पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २०  वर्षे सातत्याने कार्यरत आहे. सध्याच्या काळात समाजामध्ये विवाहासाठी योग्य वधू-वर जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन संस्थेमार्फत वधू-वर सूचक केंद्र चालविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विवाह जुळविण्यात  संस्थेला यश आले आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथील भव्य वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ८ लाखांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. विजेत्याला रोख रुपये १ लाख पन्नास हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार व चषक, चौथ्या क्रमांकासाठी ५० हजार शिवाय उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी प्रत्येकी १० हजार व उपउपांत्यपूर्व फेरी अगोदरच्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूस प्रत्येकी रुपये ५ हजारांचे ईनाम जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस रोख रुपये १ हजारांचे बक्षीस तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस रुपये २ हजार ठेवण्यात आले. आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना विशेष उत्तेजन देण्यासाठी सामना खेळून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १ हजार, तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये २ हजार, चौथ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस ४ हजार, पांचव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रुपये ८ हजार तर सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १५ हजारांचे अतिरिक्त ईनाम जाहिर करण्यात आले आहे. सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वर हे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेली दोन वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून खेळाडूंच्या चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा जरी सर्वांसाठी खुली असली तरीही स्पर्धेत मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भाग घेणाऱ्या राज्यातील इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नावे नोंदविण्यासाठी खेळाडूंनी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन. पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी  चौकजवळ, शिवाजी पार्क, दादर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.