Category: मुंबई

Mumbai news

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा

भाजपा राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन मुंबई : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी  बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, प्रकाश जावडेकर, खा. नारायण राणे, खा. अशोक चव्हाण तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्या निकालातून आम्ही बरेच काही शिकलो. त्या नैराश्यातून संघटनेला बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना आखली. पुण्यात झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक आपण जिंकणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत  बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्याचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत राज्यात पक्ष संघटनेतर्फे झालेल्या विविध अभियानांची माहितीही  बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी यावेळी संघटन पर्व अंतर्गत राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश – चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ जानेवारी रोजी ००.०१ वाजल्यापासून  ते  २६ जानेवारी २०२५ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी जिल्ह्यात मकर सक्रांत दिन साजरा केला जाणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी  आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी  बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक

रमेश औताडे मुंबई : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त यांच्या सोबत कामगार प्रतिनिधींची एक महत्वाची बैठक दिल्ली येथे  झाली. या बैठकीत देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन देण्याबाबत लवकरच श्रम मंत्रालयाला केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आहे. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू होईल. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या शिष्टमंडळाची १० जानेवारी २०२५ भेट झाली. कामगार नेते कॉम्रेड मोहन शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, बैजनाथ सिंग या कामगार नेत्यांच्या सोबत दिल्लीचे अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती या बैठकीत उपस्थित होते. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन ” लागू करण्याबाबत देशभरातील सूट दिलेले ट्रस्ट (Examtat trust) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत श्रम मंत्रालय केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होणार आहेत. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत पुढील कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

कल्याण : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलीसांनी उल्हासनगर येथुन अटक केली असून त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हददीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने हे…

बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात- उद्धव ठाकरे

मुंबई : महापौर बंगला ही वास्तू म्हणून आम्ही पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक…

शरद पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील

स्लग – मंत्री संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा मुंबई – खळबळजनक विधाने करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ नेहमीच चर्चेत असतात. आजही त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.लवकरच शरद पवार गट…

उद्धव ठाकरे आक्रमक

ब्लॅकमेल करणाऱ्यांना पक्षात थारा नाही मुंबई:  पक्ष अडचणीत असताना ब्लॅकमेल करणाऱ्यांना यापुढे पक्षात थार नाही अशी आक्रमक भुमिका ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे…

टॉरेसचे वचन पडले खोटे! यशस्विनी थोरात

मुंबई : टॉरेस ज्वेलर्स कंपनीने आपल्या आकर्षक गुंतवणूक योजनांसह अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि त्यांना उच्च परताव्याचे वचन दिले. मात्र, काही वेळातच हे वचन पाळले जाणार नाही हे उघड झाले आणि एक मोठा…

यांत्रिकांच्या सावल्या’ पुस्तकाचे केतकरांच्या हस्ते आज प्रकाशन

मुंबई : सदामंगल पब्लिकेशन या संस्थेतर्फे उद्या मुंबईत संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत भूपेश गुप्ता भवनात प्रज्ञा जांभेकर लिखित  ‘यांत्रिकाच्या सावल्या’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.  हे एक कौटुंबिक चित्रण असलं तरी त्यात महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास, स्वातंत्र्यचळवळ, त्याकाळचे समाजजीवनाचं…

क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा – वैभव देशमुख

अशोक गायकवाड पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे…