Category: मुंबई

Mumbai news

 ‘एचएमपीव्ही’ या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये!

ठाणे महापालिकेचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विशेष वॉर्ड तयार ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumo virus) साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३च्या तुलनेत डिसेंबर-२०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेष वॉर्ड तयार दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. हे करावे… खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या. काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे करु नये हस्तांदोलन करणे टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे…

अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1)  वसीम अकबर अली खान, रूम नं. 23, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई, व 2)  अंकुश नाना जगताप/ योगेश नाना जगताप, एस.एस. टाईप, रूम नं. 678, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी  वसीम अकबर अली खान यांचेकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी दंडात्मक शुल्क रू.10,000/- पावती क्र.248395, दि.06/01/2025 अन्वये वसूल करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 7 मजूर, इलेक्ट्रॉनिक हॅमर – 02, गॅस कटर – 01, पिकअप व्हॅन – 01 वापर करण्यात आले. ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे ब्रीज खालील 19 बेघर लोकांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आले. तसेच सेक्टर-19,20 व कोपरखैरणे गाव येथील शाळा परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू/पानविक्री/गुटखा विक्री करणा-या 03 टप-यांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आलेले आहे. या माहिमेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे, औदूंबर पाटील, त्यांचे विभागाकडील पोलिस उपस्थित होते. नवी  मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी  विभाग वाशी अंतर्गत  अफताब जाकारीया जानवेकर व परवेज जाकारीया जानवेकर, युनिट क्र. एस.एस/3-227, सेक्टर- 02, वाशी, नवी मुंबई यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी  विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 1(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले असल्यामुळे दि. 12/12/2024 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.25,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे. तदनंतर संबंधितांनी पुन्हा काम सुरु ठेवल्यामुळे दि. 06/01/2025 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत पुन्ह:श्च तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.10,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे.  या धडक मोहिमेसाठी सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त  सागर मोरे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थ‍ित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुर, 1 इलेक्ट्रिकल हॅमर, 1 गॅस कटर व पोकलन यांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण

  दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी   मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो. माउंट मेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यासाठीही आकर्षणाचा विषय आहे. सध्या सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या परवानगीकरिता संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली आहे. ०००००

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

२७ गावांसाठी ३५७ कोटींची पाणीपुरवठा योजना;

१०५ दलघमी साठवण क्षमता होणार निर्माण   कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट…

भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला आरंभ

हमाल, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाल्यांवर लक्ष केंद्रीत   मुंबई : राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी मुंबईसह राज्यभरात…

शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’…

शंभर दिवसांत बीकेसी ते वरळी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करा उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा अशा दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.…

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट

अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली   कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त…

सर्वच जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी संरचनात्मक सर्वेक्षण

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. मात्र ही यादी तयार करण्याआधी इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वच जुन्या इमारतींचे…