Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या संवर्धनाकरीता दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सुपूर्द केला ५ वर्षांसाठी ९५ लाखांचा धनादेश* अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को…

आ.नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

माथाडी कामगार मेळावा संपन्न राजेंद्र साळसकर मुंबई-महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, माजी आमदार व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)…

छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान टिकविला;

शिवभक्त राजू देसाई यांनी वाहिली आदरांजली मुंबई : शहाजीराजांनी भगवाध्वज  छत्रपती शिवाजी महाराज यांना दिला याच ध्वजाला घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभे केले आणि हाच भगवा समर्थपणे पेलणाऱ्या दोनच महान व्यक्ती…

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या…

मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही- अशोक जाधव

राजेंद्र साळसकर मुंबई : मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल परंतु काही झाले तरी मी मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, असे उदगार म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी नुकतेच येथे काढले.ते म्युन्सिपल मजदूर युनियनने संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा व नपा च्या कामगाराच्या वारसा हक्क लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल  परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यासमोर बोलत होते. याप्रसंगी अॅड.हरिष बाली, अॅड.बळीराम शिंदे,संजय वढावकर,अॅड.सुरेश ठाकूर,म्युन्सिपल मजदूर युनिययनचे सरचिटणीस वामन कविस्कर,कार्याध्यक्ष यशवंत देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव तसेच अनिल पाटील,गौतम खरात व संतोष पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मुंबई मनपा कामगारांच्या बोनसबाबत बोलणी करण्यासाठी आयुक्त चहल यांच्याकडे गेलो होतो तेव्हा  चहल साहेब आम्हाला म्हणाले की,तुम्हाला आता बोनस देऊ परंतु एक वर्षानंतर पगार,बोनस व पेन्शन द्यायला मिळणार नाही.तेव्हा आम्ही त्यांना बोललो की,साहेब असं का बोलता.त्यावर ते म्हणाले की, सरकारने आम्हाला अडीच लाख हजार कोटींची भांडवली कामे सांगितली होती पण ख-या अर्थाने आता दोन लाख ऐंशी हजार कोटींची कामे आता काढायला सा़गितली आहेत. परिणाम काय झाला, त्यांनी हवा तसा पैसा ओतण्याचं काम केलं.कोस्टल रोडला पंधरा हजार कोटी रूपये टाकले,एमएमआरडीए ला दहा हजार, पंचवीस हजार टाकले, बँकेतून ९२हजार कोटी काढून घेतले.आज महापालिका अस्तित्वात आल्यापासून एक रूपयाही कर्ज घेतलं नव्हतं त्या महापालिकेनं आता दीडलाख हजार कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे.मग मला सांगा त्या बँकेचं कर्ज पहिलं भरणार की तुमचा पगार देणार ? असं जर घडलंं तर तुम्हाला एक तारखेला जो पगार मिळतो तो तुम्ही एकमेकांना विचाराल आठ तारीख,दहा तारीख आली,तुझ्या खात्यात पगार आला काय? या सरकारने गिरणी कामगारांचं वाटोळं केलं पण तुमचा मी गिरणी कामगार व्हायला देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.भले मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण मी तुमचा  गिरणी कामगार व्हायला देणार नाही.त्यासाठी आता आम्ही संघटनेचे पदाधिकारी एकत्र बसून एक तारीख ठरवून मनपा आयुक्तांना नोटीस देणार आहोत,भांडवली काम हटाव आणि महापालिका कामगार बचाव,असे आवेशपूर्ण उदगार  त्यांनी यावेळी काढले.

एसटी महामंडळाचा भाड्याच्या बसेसला आता रामराम

स्वमालकीच्या ५ हजार बसेस खरेदी करणार ० परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा   मुंबई  : वाढत्या अपघाताच्या आणि दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर आता एसटी महामंडळ भाड्याच्या बसेसना रामराम ठोकणार असून यापुढे आता स्वमालकीच्या…

ध्वज विजयाचा उंच धरा रे…

भारताचा झेंडा जगात फडकावणाऱ्या जगज्जेत्या खेळाडूंन देशातील सर्वोच्च अशा अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा ऑलिम्पक कास्यपदक विजेता खेळाडू स्वप्निल कुसेळेला अर्जुन तर त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडेला द्रोणाचार्य…

अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…

लाडक्या बहिणी प्रमाणे लाडक्या भावाना आधार दया – माजी खासदर हरिभाऊ राठोड

ठाणे : १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी झाले होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून सरकार मायबापाने…

कल्याण लोकसभा क्षेत्रातील प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक पडली पार कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ  आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला. सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रशांत काळे, निलेश शिंदे, नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.  बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करण्याची सूचना केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना दिल्या. उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. 00000