Category: मुंबई

Mumbai news

कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील गावांसाठी पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजुरी

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मानले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आभार अनिल ठाणेकर कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी  यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंचे यश

  मुंबई : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे कुस्तीच्या सरावा करिता येणाऱ्या , मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंनी पालघर…

अमित शहांनी त्या वक्तव्यातून अदानीला वाचवले

रमेश औताडे मुंबई : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय  करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला. त्यातून नवा वाद उभा करून इतर विषयावरील प्रश्न व चर्चा थांबवत त्यांनी अदानीला वाचवले. आणि लोकसभेत त अदाणी वरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली. असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष  डॉ. सुरेश माने यांनी केला. मुंबईतील धारावी येथे बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. सुरेश माने यांच्यासह दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या मेळाव्यात मार्गदर्शक होते. आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून भाजप पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे.  इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही ? असा सवाल यावेळी डॉ. सुरेश माने यांनी केला. प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक  आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी आशेचा किरण

  रमेश औताडे मुंबई : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन…

 बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सव

कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी मुंबई : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार, ४ जानेवारीपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै.  अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजतां परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महा आरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष असून रविवार, १२ जानेवारी २०२५ पर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजतां दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.

 सिडकोची अनधिकृत बांधकामांवर सन 2024 मध्ये प्रभावी कार्यवाही

2,102 अनधिकृत बांधकामांचे निष्कासन; 2 लाख चौ.मी. हून अधिक क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त     नवी मुंबई : विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता…

नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

 गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ हरिभाऊ लाखे नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया केली जात आहे. लवकरच खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकले जातील. या जलवाहिनीद्वारे पुढील ३० वर्षातील संभाव्य लोकसंख्येचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गंगापूर धरणातून सध्या बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सिमेंटच्या वाहिनीद्वारे पाणी आणले जाते. साधारणत: अडीच दशकांपूर्वी केलेली ही सिमेंटची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. गळतीमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य लोखंडी जलवाहिनी टाकण्याचे निश्चित केले होते. प्रारंभी या कामासाठी २१० कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. हे काम जिंदाल कंपनीला मिळाले. विविध कारणांस्तव रखडलेल्या या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. नव्या जलवाहिनीचे काम नऊ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. गंगापूर धरणातून शहरात येणाऱ्या उजवा तट कालव्याची जागा पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. त्या जागेत जुन्या वाहिनीला समांतर ही नवीन जल वाहिनी टाकण्यात येईल. या कामासाठी अवाढव्य लोखंडी पाईप नियोजित मार्गात आणण्यात आले आहेत. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकण्याचे काम सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले. क्षमता कशी विस्तारणार ? नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७५ टक्के पाणी गंगापूर तर २५ टक्के पाणी मुकणे धरणातून घेण्यात येते. सद्यस्थितीत एकूण ५५५ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. यातील गंगापूर धरणातून अस्तित्वातील वाहिन्यांची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष लिटर आहे. हे सर्व पाणी शहरातील सात केंद्रात शुद्धीकरण करून ११९ जलकुंभ आणि सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून वितरित केले जाते. गंगापूर धरण ते बारा बंगला ही नवीन जलवाहिनी जुन्या वाहिनीला समांतर असणार आहे. नवीन जलवाहिनीची क्षमता २२ तासात ४२५ दशलक्ष लिटर पाणी वहनाची आहे. ती २४ तास कार्यरत राहिल्यास ही क्षमता ४६० दशलक्ष लिटरपर्यंत जाऊ शकते. शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलवाहिनीचे नियोजन झाल्याचे अधिकारी सांगतात.

पनवेलमध्ये आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो

पनवेल : आरोग्यकिरण व कृष्णा इव्हेंटच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील गोखले सभागृहात दिनांक  ४ व ५ जानेवारी आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो २०२५ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे  उदघाटन शनिवार दिनांक ४ जानेवारीला…

कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे फलाट क्रमांक १२ आणि १३ ची पायाभूत कामे केली जात आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या…

कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पांना नवसंजीवनी

डोंबिवली : नववर्षाच्या प्रारंभी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. रखडलेल्या प्रकल्पांना नवसंजीवनी देण्यासाठी सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना…