Category: मुंबई

Mumbai news

  ‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मनीषा शर्मा यांनी स्वीकारला पुरस्कार मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक,…

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  मुंबई : मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला.  आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यायला हवीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करत असतील, तर ते देशात आले कसे? देशाच्या पूर्व टोकापासून दक्षिण-पश्चिम भागापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून ते कसे प्रवास करून पोहोचले? गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असताना हे लोक इतका काळ देशात कसे राहिले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेतील अपयश, गुप्तचर यंत्रणांची चूक की प्रशासनातील त्रुटी आहे का, असा सवाल उपस्थित केला. जर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असेल, तर ती थांबवण्यात आणि संबंधितांना ओळखून देशाबाहेर पाठवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आदित्ययांनी थेट भाजपवर निशाणा साधत, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा राजकीय पातळीवर उचलण्याऐवजी त्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार !

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी  पक्षाचे रिक्त असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसात सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर  चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी निवड…

मुख्यमंत्री दिल्लीत…

मुख्यमंत्री दिल्लीत… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली भेटीत भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान हा ब्लॉक असेल. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लाॅक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. तसेच खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे…

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न मुंबई: मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

 बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड

बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी BEST, पोलीस वसाहतसह विविध विषय सविस्तरपणे मांडले मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे…

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट…

  चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला

चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला लोकमान्यचा रजाक खान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला मुंबई: चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने सचिन्द्र आयरे फाऊंडेशनच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे…