Category: मुंबई

Mumbai news

  जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात

अमर हिंद मंडळात आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय! मुंबई: दादरच्या अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार अक्षरशः शिगेला…

भारतातील  रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन

भारतातील  रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन रमेश औताडे मुंबई : हृदयविकार आणि नसांशी संबंधित आजारांसाठी एकाच गोळीमध्ये अनेक औषधांचे मिश्रण असलेले उपचार आता भारतात होणार आहेत. फ्रान्समधील औषध निर्मिती कंपनी  सर्वियर ने भारतात ‘ गॅटिन ‘ नावाचा एक जागतिक दर्जाचा उपक्रम सुरू करणार आहे. बऱ्याचदा गंभीर आजारांमध्ये रुग्णांना दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. यामुळे औषधे घेण्याचा कंटाळा येतो. “ एक गोळी, अनेक औषधे “ यामुळे रुग्णांना दररोज अनेक गोळ्या घेण्याऐवजी फक्त एकच गोळी घ्यावी लागेल. गॅटिनचे मुख्य ऑफिसर डॉ. क्षितिज पानसे म्हणाले की, आम्ही भारतातील तज्ज्ञ आणि सर्वियरचे जागतिक कौशल्य एकत्र करून रुग्णांना उच्च दर्जाची औषधे कमी वेळात उपलब्ध करून देणार आहोत. कार्यकारी उपाध्यक्ष  शार्लेट मार्मोसेझ यांनी सांगितले की, रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतात हा पहिलाच जागतिक प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तब्बल १३५ कोटी रुपये  ही कंपनी गुंतवणार आहे. ही औषधे भारतात तयार करून आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात केली जातील.

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे,  मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे व सदस्य दिलीप धारकर यांनी नवनिर्वाचित महापौर  रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ व १८ बाबत कल्पना दिली मुंबई मधील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्या बाबत मा महापौर रितू तावडे यांनी सकारात्म प्रतीसाद दिला व लवकरच मिटिंग घेणे बाबत सूचना दिल्या, ज्येष्ठाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल आम्ही आभार व्यक्त केले.

  नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे, तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस मंत्री उदयजी सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिषजी जैसवाल, आमदार दीपकजी केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम मुंबई : भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या विजय मल्याला आज मुंबई हायकोर्टाने भारतात परतण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. विजय मल्या याने भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला शेवटची संधी दिली. मध्यसम्राट मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त इशारा देताना स्पष्ट केले. भारतात कधी परतणार किंवा भारतात परणार आहात की नाही ? याबाबत मल्याला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश याआधी न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा मल्याला तो भारतात आल्यावरच त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मल्ल्याला फरारी घोषित केल्यानंतर आणि लंडनमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच त्याने एफईओएला आव्हान दिल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीने महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी केला. दुसरीकडे, कायद्याचे स्वरूप पाहता, मल्या हा प्रत्यक्ष भारतात परतल्याशिवाय त्याची बाजू ऐकली जाऊ शकते, असा दावा त्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.

क्षण आनंदाचा…अभिमानाचा!

क्षण आनंदाचा…अभिमानाचा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले.

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले रमेश औताडे मुंबई :  लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या मंत्रालयात अण्टी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीनं सापळा रचून एका क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले. अन्न व औषध प्रशासन…

चायनिज वर पिझ्झा भारी

चायनिज वर पिझ्झा भारी स्वाती घोसाळकर मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला.…

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ?

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ? राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार…

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…