Category: मुंबई

Mumbai news

वकीलावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाट

मुरबाड पोलिसांच्या तपासावर शंका राजीव चंदने मुरबाड : मुरबाड  तालुक्यातील सरळगांव  येथील आंबेडकर चळवळीतील अभ्यासू नामवंत वकील आणि ग्रुप ग्रामपंचायत सरळगावचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय रोकडे यांनी सरळगाव नाक्यावर म्हसा यात्रेकरीता येणा-या लोकांचे स्वागताचा पोस्टर लावत असताना तेथील गुंड प्रवृत्तीचे विष्णु सदाशिव घुडे, वैभव सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे यांनी जातीयद्वेष भावनेतून जातीय वाचक शिवगाळ करत बेदम मारहाण केली.याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी अक्षय घुडे, विष्णू घुडे, वैभव घुडे व इतर ५ ते ६ आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे मुरबाड पोलीस तपास यंत्रणेवर आंबेडकरी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र नव्याने आलेले पोलीस निरीक्षक गिते यांनी आरोपी दोन दिवसात अटक करतो अशा वलग्ना केल्या, माझ्यावर विश्वास ठेवा मात्र त्यांच्या वलग्ना हवेतच विरल्या. त्यामुळे पोलीस देखील आरोपीना पाठीशी घालत आहेत हे उघड झालं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेडकर चळवळीतील नामवंत वकील व ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांनी बाजारपेठेत म्हसा यात्रेतील भाविकांचे स्वागत करण्याचे बॅनर लावण्यासाठी तेथे आले. बॅनर लावत असताना आरोपी अक्षय घुडे यांनी यावर आमदार कथोरे यांचा फोटो आहे. त्यामुळे हा बॅनर लावू नये असा दम दिला. आणि तुमची लायकी नाही, म… समाजाच्या लोकांना बॅनर लावण्यासाठी ही जागा नाही. त्यावर संयम ठेवत ऍड रोकडे यांनी, आम्ही बॅनर बाजूला लावतो, असे सांगत असताना आरोपी विष्णू घुडे,यांनी धावत येत काहीही ऐकून न घेता अक्षय यास मारण्यास सुरवात केली. यावेळी ऍड रोकडे यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ऍड प्रफुल्ल रोकडे यांना देखील जातीय वाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, या मारहाणीत ऍड रोकडे व त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. व मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने तो खाली कोसळला. आरोपी विष्णू, वैभव, अक्षय त्यावरच न थांबता ऍड प्रफुल्ल व भाऊ अक्षय यांना फरफटत नेले. आणि ऍड प्रफुल्ल रोकडे यांचा गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटून त्यांनी मुरबाड पोलीस स्टेशनं गाठले. सदर घटना इतकी गंभीर असताना देखील, आणि पाच सहा दिवस उलटून गेले तरी मुरबाड पोलीस स्टेशनं चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते यांनी कोणतेही ऍक्शन न घेता आरोपीना पाठीशी घातले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आरोपी अटक करतो, काळजी करू नका असे बोलणाऱ्या मुरबाड पी आय गिते यांच्या तपास यंत्रनेवर आंबेडकरी समाजाला संशय निर्माण झाला आहे.येत्या दोन दिवसात आरोपी अटक केले नाहीत तर पोलिसांच्या अपयशाच्या आणि निक्रियतेच्या विरोधात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलनच्या माध्यमातून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत ऍड प्रफुल्ल रोकडे व भाऊ अक्षय रोकडे यांच्या हल्लेखोरांना अटक साठी मागणी करणार आहेत. 0000

कोपरखैरणे विभागातील मुख्य रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबई : सखोल स्वच्छतेव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर देत 30 डिसेंबरपासून 13 जानेवारी पर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सुट्टयांसह सलग 15…

मुंबई पोर्टच्या कलाकार योगिनी दुराफे यांना अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार

मुंबई :टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने  नुकताच  पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत  दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ…

 कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा सादर

Slug – मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक नाशिक : गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे १४ हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केवळ दोन वर्षांचा अवधी बाकी आहे. नियोजनाला विलंब होत असल्याने त्यास गती देण्याकरिता सिंहस्थाची विस्तृत स्वरुपाची बैठक घेण्याचे सुतोवाच कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच नाशिक दौऱ्यात केले होते. त्यानंतर लगोलग ही बैठक होत आहे. सिंहस्थासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्या कार्यरत आहेत. २०१५ मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे २३०० कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा ६९७८ कोटींचा आराखडा सादर केला आहे. आगामी सिंहस्थासाठी तपोवनमध्ये ४०० एकर क्षेत्रात साधुग्रामचे नियोजन असून तीन आखाड्यांचे सुमारे चार लाख साधू-महंत या ठिकाणी वास्तव्यास येण्याचा अंदाज आहे. एका पर्वणीत ८० लाख भाविक शहरात येतील. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेबरोबर त्र्यंबकेश्वर नगरपालिका व अन्य विभागांनी कामांचे नियोजन केले आहे. आगामी कुंभमेळ्यात सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य राहणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. 00000

सानपाड्यात सुयोग समूह परिवारातर्फे व्याख्यानमालेतून जीवन जगण्याचा मूलमंत्र

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८  मधील सुयोग समूह परिवार यांच्या वतीने ” ध्यास समाज प्रबोधनाचा ”  या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून  व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.  त्यानुसार यावर्षी ठाणे विद्यालयाच्या शिक्षिका…

नागरिक केंद्री प्रशासन ही भूमिका ठेवून काम करा – डॉ.कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : यापुढील काळात महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणा-या विविध सेवासुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘महानगरपालिका आपल्या दारी’ सारखा लोकांपर्यंत जाण्याचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देत नागरिककेंद्री प्रशासन ही भूमिका नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने काम करावे असे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले. नवी मुंबईकर नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित सर्व कामे सुलभ व सोप्या पध्दतीने विनासायास व्हावीत याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे विशेष लक्ष देत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यावर भर दिला जात आहे.यामध्ये ‘शून्य प्रलंबितता’ अर्थात ‘झिरो पेन्डसी’ हे सूत्र प्रमाण मानून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या नस्ती, कागदपत्रे यांचे डिजीटलायझेशन करण्याचे सूचित करण्यात आले असून कार्यालयांतील उपलब्ध अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे तसेच शासकीय नियमानुसार अ, ब, क, ड कागदपत्रे स्वरूपात वर्गीकरण करणे याबाबत मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच विहित कालावधीनंतर नष्ट करावयाची कागदपत्रे यांचे निर्लेखन करून ते नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी तसेच जतन करून ठेवावयाचा अभिलेख वर्गवारीनुसार स्वतंत्ररित्या जतन करण्यासाठी मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविण्याची कार्यवाही करण्याचीही प्रक्रिया जलद पूर्ण करून घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.सर्व कार्यालयांत अंतर्गत स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. त्यासोबतच जुन्या फर्निचरची योग्य रितीने विल्हेवाट लावावी असे सूचित करतानाच कार्यालय परिसराचीही स्वच्छता करावी व नीटनेटकेपणावर भर द्यावा तसेच अभ्यागत कक्षाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.कार्यालयांमध्ये कर्मचारी व नागरिकांसाठी स्वच्छ व शुध्द पिण्याची पाणी व्यवस्था व स्वच्छ प्रसाधनगृह व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित करभरणा करणे अथवा इतर कामे सहजपणे व विहित वेळेत व्हावीत यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क रहावे असे सूचित करीत अधिका-यांनी नागरिकांना कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करावी, ती ठळकपणे प्रदर्शित करावी व त्या वेळेत नागरिकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.नागरिकांना विविध लोकसेवा पुरविणारी सर्व विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रे तत्पर असावीत, त्याठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असे सूचित करीत नागरिकांना महापालिकेची वेबसाईट तसेच My NMMC ॲपव्दारे मोबाईलच्या एका क्लिकवर करभरणा करण्यापासून एखाद्या समस्येविषयी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमव्दारे तक्रार दाखल करण्यापर्यंत सर्व सुविधा घरबसल्या उपलब्ध आहेत याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेची बचत करण्यासाठी महानगरपालिका विविध ऑनलाईन सुविधा देऊन तत्पर आहे अशा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करणारे काम करा असे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.त्या अनुषंगाने कौपरखैरणे विभाग कार्यालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कार्यालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता आणि सुधारणा तसेच कार्यालयातील अभिलेखाचे नियमानुसार वर्गीकरण आणि नस्ती, कागदपत्रांची शासकीय सहा गठ्ठे पध्दतीने रचना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावर परिमंडळ उपआयुक्तांनी आठवडाभरात कार्यवाहीची प्रत्यक्ष तपासणी करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पुरविणे हे आपले कर्तव्य असून त्यादृष्टीने आपले नागरिकांशी सुसंवादी वर्तन असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत यामधूनच आपल्या कार्यालयाची प्रतिमा निर्माण होत असल्याने प्रत्येकाने ही आपल्याला लाभलेली लोकसेवेची संधी असल्याचे लक्षात घेऊन काम करावे असेही आयुक्तांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधताना सांगितले. या विभाग कार्यालयाच्या पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सर्वच विभागांमध्ये करण्यात यावी असेही निर्देशित करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारूळे, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त सुनिल काठोळे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे व संजय खताळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ०००००

२३ वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५

पुरूष विभागात अहमदनगर, पुणे ग्रामीण  तर महिला विभागात पुणे ग्रामीण बाद फेरीत बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे,  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत पुरूष विभागात अहमदनगर, महिला विभागात रत्नागिरी, पुणे ग्रामीण संघाने   धडक मारली आहे. वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या  तिसऱ्या दिवसाच्या  सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात   पुरूष विभागात ब गटात झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने वाशीम संघावर ३८-२१ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे २९-९ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या राहुल धनावडे व आशिष यादव यांनी आक्रमक खेळ करीत विजय सोपा केला. सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. वाशिम संघाच्या शेख अब्दुल शेख गुलाब याने काहीसा प्रतिकार केला. तर रघुनाथ पाटोळ याने पकडी घेतल्या. पुणे ग्रामीण संघाने अमरावती संघावर ४६-२६ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३२-१२ अशी २० गुणांची आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या अजित चौहान व शुभम शेळके यांनी चौफेर हल्ला चढवित अमरावतीच्या संघाला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. अनुज गावडे व  ओमकार लालगे यांनी चांगल्या पकडी घेत विजय सोपा केला. अमरावतीच्या अभिषेक पवार व ऋषिकेश तीवाडे यांनी कडवट प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तर सोमेश अजबले व राजा बेढेकर यांनी काही चांगल्या पकडी केल्या. महिलांमध्ये ब गटात रत्नागिरी संघाने अमरावती संघावर ५३-६ असा दणदणीत विजय मिळविला. मद्यंतराला रत्नागिरी संघाकडे ३६-५ अशी निर्मायक आघाडी होती. रत्नागिरीच्या समरिन बुरोंडकर सिध्दी चाळके यांनी चांगला खेळ केला. अमरावतीच्या संघाला मात्र या सामनन्यात कोणतीही चमक दाखविता आली नाही. मध्यंतरा नंतर अमरावती संघाने केवळ एकच गुणाची कमाई केली. अ गटात पुणे ग्रामीण संघाने नागपूर संघावर ५०-२२ अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३०-१० अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या किशोरी गोडसे हिने चौफेर चढाया करीत चांगला खेळ केला. तर वैभवी जाधव, मनशी बनसुडे, सलोनी गजमल यांनी चांगल्या पकडी घेतल्या. नागपूर शहरच्या ईश्वरी मूळणकर हिने चांगल्या चढाया केल्या. तर पूनम शाह हिने पकडी केल्या. 0000

 सिध्दीप्रभा फाऊंडेशन आणि गुड मॉर्निंग स्पोर्टस्,   यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक.

‘चिंतामणी चषक – २०२५’ कबड्डी स्पर्धा मुंबई : आकांक्षा क्रीडा, अमर क्रीडा, अंकुर स्पोर्टस्, नवोदित संघ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या “७व्या चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर प्रथम श्रेणी पुरुष गटात हा मान सिध्दीप्रभा फाऊंडेशन, गुड मॉर्निंग स्पोर्टस्, गोलफादेवी सेवा, बंड्या मारुती मंडळ यांनी पटकाविला. मुंबई चिंचपोकळी येथील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटात आकांक्षा मंडळाने यश क्रीडा मंडळाचा ४४-२५ असा पाडाव केला. आकांक्षाच्या शंकर साळुंखे, आर्यन पाटील यांनी पहिल्या डावात आक्रमक चढाई पकडीचा खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर २ लोण देत २४-११ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोच झंझावात कायम ठेवत १९ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. यश मंडळाच्या सोहम खोत, श्रावण पवार यांनी दुसऱ्या डावात थोडाफार प्रतिकार केला.पण तो निष्फळ ठरला. काळाचौकीच्या अमर मंडळाने श्री स्वामी समर्थचा ७०-२७ असा धुव्वा उडविला. सुरुवातीपासून तुफानी खेळ करीत अमरने प्रतिस्पर्ध्यावर ३लोण देत विश्रांतीला ४२-२९ अशी आघाडी घेतली. या पिछाडीने नामोहरम झालेल्या स्वामी समर्थवर विश्रांतीनंतर आणखी २लोण देत अमरने गुणांची सत्तरी गाठली. रमेश वायरकर, दर्शन गुरव यांच्या तुफानी चढाया, त्यांना विघ्नेश झावरे, यश दिसले यांची मिळालेली भक्कम पकडीची साथ यामुळेच अमरने ही किमया साधली. श्री स्वामी समर्थचा विराज कोंजवरने एकाकी लढत दिली. याच गटात अंकुर स्पोर्टस् ने ओम् ज्ञानदीप मंडळाचा प्रतिकार ५२-१४ असा सहज मोडून काढला. मध्यांतराला अंकुरने ३५-०७ अशी मोठी आघाडी घेतल्याने ओम् ज्ञानदीपने नंतर नांगी टाकली. आशिष बदड, दिपेश जोंधळे यांच्या नेत्रदीपक खेळाला अंकुरच्या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या सामन्यात नवोदित संघाने जय दत्तगुरु संघाला ५०-२६ असे पराभूत केले. पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात २०-१८ अशी नवोदित संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र नवोदितच्या अथर्व सुवर्णा, ऋषिकेश साळवी, रजत मुलांनी यांनी चौफेर खेळ करीत सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुकविला. जय दत्तगुरुच्या आदित्य घोडेराव, नयन मोहिते यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही. प्रथम श्रेणी पुरुषात गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने चुरशीच्या लढतीत विकास मंडळाचे आव्हान ४०-३७ असे संपविले. विश्रांतीला २०-१४ अशी आघाडी घेणाऱ्या गुड मॉर्निंगला विश्रांतीनंतर  विकासने विजया करीता चांगलेच झुंजविले. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. प्रफुल्ल कदम, साहिल राणे, तन्मय सावंत, शिवांग मगर गुड मॉर्निंग कडून, तर अवधूत शिंदे, अजित पाटील, विराज सिंग विकास कडून उत्कृष्ट खेळले. याच गटात सिद्धीप्रभा फाऊंडेशनने श्रीराम क्रीडा विश्वस्तला ३९-३२ असे चकवित आगेकूच केली. पहिल्या डावात १६-१४ अशी सिद्धीप्रभाकडे आघाडी होती. मिलिंद पवार, ओमकार पवार, रविकांत सिद्धीप्रभाकडून, तर भावेश महाजन, सौरभ माळी श्रीराम कडून उत्तम खेळले. गोलाफादेवी सेवाने सुनील स्पोर्टस् चा २८-१९ असा पाडाव केला. धनंजय सरोज, विनम्र लाड, अनिकेत झाब्रे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सुनील स्पोर्टस् ला अजूनही परेश चव्हाणच्या खेळावर अवलंबून राहावे लागते. त्याला अमेय दळवीने बरी साथ दिली.शेवटच्या सामन्यात बंड्या मारुतीने यंग प्रभादेवीला ३०-१३ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २२-०५ अशी आघाडी घेणाऱ्या बंड्या मारुतीने उत्तरार्धात सावध खेळ केला. ओमराज म्हसकर, शुभम चौगुले, गणेश सापते यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यंग प्रभादेवीचा शिवकुमार पाटील बरा खेळला.  अधिक माहितीकरिता प्रवीण राणे(सहसचिव) भ्रमणध्वनी क्रमांक ९७७३६६१२९३ यांच्याशी संपर्क साधावा. ०००

 कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना कॅन्सर संबधित उपचारांकरिता खाजगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते. त्या अनुषंगाने नमुंमपाच्या आरोग्य विभागाने गतीमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या समन्वयातून नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 10 रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनीट (Day Care Chemotheropy Unit ) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये काल  पहिला रूग्ण संदर्भित होऊन या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आला आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकिय समुहासह टाटा ॲक्ट्रेक यांचाही वैद्यकिय समुह उपस्थित होता. डे केअर केमोथेरपी ही सध्याची प्रभावी आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धती असून ज्यामुळे केमोथेरपीसाठी नियमित हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. त्यामुळे रुग्णाच्या वेळेची व साधनांची बचत होते. याच उद्देशाने नमुंमपाच्या आरोग्य विभागांतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांचे समन्वयाने 10 रुग्णखाटांचे डे केअर केमोथेरपी युनीट सुरु करण्यात आले आहे. नेरूळ रूग्णालयामध्ये हे डे केअर सेंटर सकाळी 8 वाजल्यापासून कार्यान्वित राहील. रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. हे डे केअर सेंटर सुरु करणेकरिता कॅन्सर उपचार संबधित सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना टाटा ॲक्ट्रेक, खारघर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले होते. सॉलीड ट्युमर्स (Solid Tumors) च्या रुग्णांवर या डे केअर सेंटर (Day Care center) मध्ये उपचार करण्यात येणार आहेत. सदर उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल (Haemodynamically stable) असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची (ICU) आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या (Chemotherapy) दुस-या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे. 00000

डोंबिवली क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत सागरचे २ धावांत ८ बळी

६८ वी शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धा ठाणे  : सागर मिमरोटची भेदक गोलंदाजी, प्रणव यादवच्या शतकी खेळीसह दुसऱ्या  बळीसाठी केलेली ११७ धावांच्या शतकी भागीदारीमुळे डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने  डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनचा २११…