Category: देश

National-News

इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात

इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात टीम इंडियाची ‘सुपर ८’मध्ये धडक कोलंबो- महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इशान किशनने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टीवर अक्षरशः तांडव करत धावांचा ‘अग्निवर्षाव’ केला आणि पाकिस्तानला भस्मसात केलं. इशांतच्या बॅटीतून उसळणाऱ्या अग्नीलोळाला थांबविण्याचे धाडस पाकिस्तानच्या…

मुख्यमंत्री दिल्लीत…

मुख्यमंत्री दिल्लीत… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली भेटीत भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.

तब्बल वीस वर्षांनी बांगलादेशमध्ये बीएनपी सत्तेत

तब्बल वीस वर्षांनी बांगलादेशमध्ये बीएनपी सत्तेत  ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. बीएनपीने २९९ पैकी २०९ जागा जिंकल्या आहेत, ज्यामुळे बहुमताचा १५० गुणांचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत २८६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीने ७० जागा जिंकल्या. जवळजवळ २० वर्षांनंतर देशात बीएनपीने सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीनाची अवामी लीग २००८ ते २०२४ पर्यंत सत्तेत होती. या विजयासह, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांचे पंतप्रधानपद जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तारिक यांनी दोन जागा लढवल्या आणि दोन्ही जिंकल्या. ते गेल्या डिसेंबरमध्ये १७ वर्षांनी देशात परतले होते.       बांगलादेशच्या निवडणुकीत कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामीचा दारुण पराभव झाला. त्यांच्या युतीला फक्त ७० जागा मिळाल्या. बांगलादेशी लोकांनी शेख हसीनाचे सरकार पाडणारा विद्यार्थी पक्ष नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) लाही नाकारले.

प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तिर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले. प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा…

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? – वर्षा गायकवाड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? – वर्षा गायकवाड मुंबईला देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का? नवी दिल्ली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते पण कोणताच प्रकल्प पुर्ण करत नाही व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का? असा प्रश्न काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत विचारला आहे. मुंबईला देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत प्रश्न विचारले. खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रश्नात असे विचारले आहे की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मुंबईला दिल्ली, नगर, पुणे आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या या प्रकल्पांमध्ये वारंवार विलंब होत असून खर्च वाढत आहे. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत सरकारकडे काही निश्चित रोडमॅप आहे का, या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतूक, बंदर कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन प्रवाशांवर परिणाम झाला आहे का, आणि मुंबईला इतर प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रकल्पांची जबाबदारी, गुणवत्ता मानके आणि जलद पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी कोणती सुधारात्मक पावले उचलली जात आहेत? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की, मुंबई (पनवेल) ते गोवा/महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग (एनएच) क्रमांक ६६ ची लांबी अंदाजे ४८५ किमी आहे. या राष्ट्रीय महामार्गाला चारपदरी मार्गाच्या कामास डिसेंबर २०११ मध्ये सुरूवात झाली असून १२ प्रकल्प पॅकेजेसमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले व आजपर्यंत, ४६५ किमीचे चार पदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. जमिनीची अडचण, मंजुरींना होणारा विलंब आणि काही कंत्राटदारांच्या संथ प्रगतीमुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य सरकारने विकसित केला आहे, हा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मुंबईला जोडणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारांसह सर्व भागधारकांसोबत नियमित बैठका घेतल्या जातात जेणेकरून प्रगतीला गती मिळेल आणि सर्व प्रकल्प लवकर पूर्ण करता येतील. दिल्ली-मुंबई प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे १३५० किमी असून, भूसंपादन, वृक्षतोडीच्या परवानग्यांमध्ये विलंब होत आहे. काही पॅकेजेसना युटिलिटीजच्या स्थलांतरातील विलंब आणि सवलतीधारक डिफॉल्टशी संबंधित समस्यांमुळे विलंब झाला आहे. आतापर्यंत, अंमलबजावणीचा खर्च एकूण कॉरिडॉरच्या मंजूर खर्चाच्या आत आहे. एक्सप्रेसवेचा सुमारे ८७५ किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शिवाय, गुजरातमध्ये तीन प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAI) वरील काम वगळता, जे २०२७-२८ आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दिल्ली ते वडोदरा विभागासाठी मे २०२६ आणि वडोदरा ते मुंबई विभागासाठी जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी

‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी भाजपा खासदार निशिकांत दुबेंच खाजगी प्रस्ताव  निवडणूक लढण्यास कायमची बंदी घाला नवी दिल्ली : अमेरिका ट्रेड, मेजर जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रात चीनची झालेली घुसखोरी आणि एप्स्टिन फाईलमधिल भारतीय राजकारण्यांची आलेली नावे यामुळे संसद दणाणून…

‘जन गण मन’च्या आधी ‘वंदे मातरम’ सक्तीचे !

‘जन गण मन‘च्या आधी ‘वंदे मातरम’ सक्तीचे ! नवी दिल्ली : केंद्र सरकारने “वंदे मातरम्” बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, “वंदे मातरम्” आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळेतील कार्यक्रम आणि…

लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार: एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ

लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार: एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ नवी दिल्ली : एपस्टिन फाईलच्या दबावाखाली पंतप्रधान मोदी असून त्यामुळेच भाजपाने देश अमेरिकेला विकला असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला…

 शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन  यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार संदीपान भुमरे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शायना एनसी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. भेटी दरम्यान संसदेमध्ये सुरु असलेले अधिवेशन आणि केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील स्थिती या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  नितिन नवीन  यांनी यावेळी एनडीएचे घटक पक्ष म्हणून नेहमी शिवसेनेच्या पाठिशी खंबिर उभे राहण्याचा शब्द शिवसेनेच्या सर्व खासदारांना दिला.

ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधीना बोलू दिले जात नसल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे,  त्यांच्या विरोधात ११८ खासदारांना अविश्वासाच्या ठरावावर स्वाक्षरी केली आहे. लोकसभेच्या अध्यंक्षाविरोधात…