Category: देश

National-News

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी, वॉटर पोलो-रग्बीत दणदणीत विजय डेहराडून  ः  उत्तराखंड येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला. डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला. रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वाटर पोलो मध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.

महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25 आदिती, ओमला कांस्य, रिले शर्यतीतही रूपेरी कामगिरी हल्दवानी  ः  उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आज पदकाची चौकर झळकविला.  2 रौप्य व 2 कास्य पदके जिंकून महाराष्ट्राने…

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाची विजयी सलामी

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हल्दवणी, उत्तराखंड : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाने यजमान उत्तराखंडवर दणदणीत डावाने विजय मिळवित 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची विजयी सलामी दिली.  गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्टस्‌‍ संकुलात मंगळवारी सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे  (2.20 मिनिटे नाबाद व 2.10 मिनिट संरक्षण व 8 गुण) महिला संघाने  उत्तराखंडवर 37-14 असा 23 गुण व 1 डाव राखून विजय मिळविला. आश्विनी शिंदे (2.30मि.) व सानिका चाफे (2.20 मिनिटे) यांनी तिला संरक्षणात साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत एकाकी लढत दिली. पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला 37-22 असे 15 गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात 8 गडी बाद करीत संरक्षणात 1.46 मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने 2.10 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून प्रींस कश्यप व राहूल शर्मा यांनी प्रत्येकी 6 गडी बाद करीत लढत दिली. अन्य निकाल ः पुरुषः  ओडीसा  विजयी विरुद्ध छत्तीसगड 43-34, 9 गुण व 6.25 मिनिटे राखून. महिला ः ओडीसा वि.वि. तामिळनाडू 36-18, 18 गुण व एक डावाने.

मराठमोळे नेमबाज सज्ज, दहा मीटर एअर रायफलमध्ये पदकाची आशा

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५ डेहराडून : गतवेळी केवळ एका पदकावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेमबाजी चमूकडून यावेळी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किमान १५ पदकांची अपेक्षा आहे. डेहराडून येथील त्रिशूल शूटींग रेंजवर २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय. जागतिक पदकविजेती कोल्हापूरची सोनम म्हसकर, तिचीच शहर सहकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणारी शांभवी क्षीरसागर व राष्ट्रीय पदकविजेती नाशिकची आर्या बोरसे हे त्रिकूट नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अचूक वेध साधण्यासाठी एकाग्रचित्त होतील. या प्रतिभावान नेमबाजांकडून महाराष्ट्राला उद्या पदकांची अपेक्षा असेल. मागील गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राला नेमबाजीतील एकमेव पदक जिंकून दिले होते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राचे नेमबाज किती पदके जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदा ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.

आज पासून ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाला सुरवात 

 दिल्लीत खो-खोचा जल्लोष, जगभरातील संघ दाखल नवी दिल्ली, : भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून खो-खो विश्वचषक २०२५ ला भव्य सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत २० पुरुष आणि १९ महिला संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत. दिल्लीतील वातावरण क्रीडारसिकांच्या उत्साहाने भरले असून, खो-खोचा जल्लोष आजपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. दिल्लीत जणू जागतिक क्रीडा महोत्सवाला आज पासून सुरवात झाली असून आज भारताच्या राजधानीत खो-खो चा आवाज घुमणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील संघांचे दिल्लीत आगमन झाले आहे. पारंपरिक भारतीय क्रीडाप्रकार असलेल्या खो-खोचा आधुनिक ग्लोबल स्वरूप आज या स्पर्धेत पहायला मिळणार आहे. दिल्लीत खो-खोचा कुंभमेळा राजकीत वाटचालीत अनेक दिग्गज नेते एकमेकांना खो देत आपले राजकारण साधत असतात पण त्याच राजकीय राजधानीत खो-खो पहायला व तो आवाज ऐकायला क्रीडा रसिकांना मात्र स्वर्गीय आनंद मिळणार आहे. पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषकासाठी जगभरातून संघ दाखल झाले असले तरी खरा आनंद खो-खो क्रीडा कार्यकर्त्यांच्या तोंडावर भरभरून वाहताना दिसतोय. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम या ऐतिहासिक स्पर्धेचे साक्षीदार होणार आहे, जिथे भारतीय परंपरेतून उगम पावलेल्या या खेळाचा जागतिक व्यासपीठावर एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी खो-खो साठी आख्खी हयात घालवली आज त्यांना कोण आनंद होत असेल हा विचारच खूप काही सांगून जातो. एक काळ असा होता कि खो-खोचे कीट (बनियन व हाफ पँट) हे मिळवणे व ते अंगावर घालणे यात खूप कष्ट तर होतेच पण त्याचा अभिमान सुध्दा खूप असायचा. काही खेळाडू तर फक्त या कीट साठी खेळायचे. आज खो-खो च रूपड पालटलं आहे. खेळाडूंना भरभरून सुविधा उपलब्ध होत आहेत. आज खेळाडू खेळाडूंवर भरभरून बक्षिसे मिळत आहेत. खेळाडू विमानाने प्रवास करू लागले आहेत. हजारो, लाखो नव्हे तर आता करोडो रुपयांचे बक्षीस मिळवताना खो-खो खेळाडू दिसणार आहेत. एकेकाळी अत्यंत साध्या स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. यामुळे खो-खो खेळाच्या प्रगतीचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. संघांचे आगमन : पहिल्यांदा श्रीलंका आणि पेरू हे संघ दिल्लीमध्ये दाखल झाले. ११ जानेवारीला जवळजवळ १४ देशांचे संघ दाखल झाले. तर काल पर्यंत २३ पैकी एखाद दुसरा देश वगळता सर्वच संघ दिल्लीत पोहचल्याचे भारतीय महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले. आशियाई संघांची जबरदस्त उपस्थिती आशियाई संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. इराण, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि दक्षिण कोरिया हे संघ आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात आपल्या देशातून प्रशिक्षक दिले होते व त्या-त्या देशात खो-खो सुरु झाला व आता ते संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे. पाश्चात्त्य देशांची नवी वाटचाल,  खो-खो ची मुसंडी पाश्चात्त्य देशांमध्ये अमेरिका, पोलंड, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. या देशांमध्ये खो-खो हा खेळ नव्याने सुरु झाला असला तरी त्यांचा सहभाग त्या-त्या देशांमध्ये खो-खो खेळाला सरावाने आपला करू लागले आहेत.  याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी भारत व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती. त्यामुळेच इंग्लंडचा सहभाग या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवताना दिसतो. संघांचे आगमन आणि सराव सत्र: दिल्लीमध्ये आगमन झालेल्या सर्व संघांचे सराव सत्र सुरू झाले आहेत. त्या-त्या संघांचे प्रशिक्षक या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंच्या रणनीतींवर काम करत आहेत. या सरावाच्या निमित्ताने स्टेडियमच्या परिसरात उत्साह निर्माण झाला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पारंपरिक भारतीय सजावटीसह विविध देशांच्या रंगांनी नटले आहे. या सोहळ्यात खेळाडूंच्या सांस्कृतिक आदान-प्रदानाची झलक पाहायला मिळणार आहे.

मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच

श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अंबरनाथ : नावात आईचे नाव समाविष्ट करणे, मालमत्तांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र गावठाण हद्दीतील मालमत्ता नोंद मोहिमेत महिला वर्ग वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गावठाण भागांचे सर्वेक्षण सुरु असून त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता नोंदी देण्यात येत आहे. मात्र या नोंदींमध्ये घरातील फक्त पुरुषांची नावे असून महिलांचे यात नाव टाकण्यात आली नाही. याबाबत श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत या नोंदींमध्ये कुटुंबातील पतीसह पत्नीचेही नाव नोंदविण्याची मागणी संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागातील सर्व गावठाणांमधील घरांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. त्या सर्व्हेच्या आधारे प्रत्येक घराचा तपशील आणि नकाशासह सनद तयार करून तिचे वाटप करण्यात येणार आहे. त्या सनदींचे काही नमुने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. त्या सर्व सनदींवर कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचेच नाव असून त्यावर महिलांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांवर शासनाने केलेला हा मोठा अन्याय आहे असे मत श्रमिक मुक्ती संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. शासनाने शिधापत्रिकेवर महिलेचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ सालच्या वनहक्क मान्यता कायद्यामध्ये वनहक्काची सनद पती आणि पत्नी दोघांच्या नावे करण्याची तरतूद आहे. तर २० नोव्हेंबर २००३ च्या निर्णयानुसार घर पती आणि पत्नी दोघांच्या नावे केले जात आहे. असे असताना ग्रामीण भागातील मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिलांना का वगळले, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच प्रगतशील आणि पुरोगामी असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्राचे हे धोरण प्रतिगामी असल्याची टीका श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मुरबाडमधील महिलांच्या सामूहिक स्वाक्षऱ्या असलेले निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या नोंदींमध्ये कुटुंबातील महिलांचे नाव घ्यावे अशी मागणीही यावेळी केली आहे.

खर्चिक प्री-वेडींगला आगरी समाजाचा विरोध

बदलापूर : दिमाखदार लग्न सोहळ्यासोबतच गेल्या काही वर्षात प्री-वेडींग अर्थात लग्नपूर्व चित्रण करण्याची पद्धत वाढली. यात मोठा पैसा खर्च होतो. तसेच हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे आगरी विवाहांमध्ये असे…

जलद बुद्धिबळात हम्पी जगज्जेती

न्युयॉर्क : बुद्धिबळातील भारताची जागतिक वर्चस्व आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. क्लासिक बुद्धिबळात भारताच्या गुकेशने पुरुष विभागात नुकतेच जगज्जेतेपद पटकावले होते. त्यापाठोपाठ आज वर्षाचा शेवट गोड करताना भाराताची महीला ग्रँडमास्टर…

“कायदे पतीकडून खंडणीसाठी नाही”; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले. कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि…

मुंबई, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च

केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे प्रकल्पाला गती देणार – खासदार नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, मुंबई, डोंबिवली, ठाणे, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च…