Category: पालघर

palghar news

मुरबाड मध्ये महास्वच्छता अभियान

मुरबाड मध्ये महास्वच्छता अभियान डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम राजीव चंदने मुरबाड : महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त व पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दुत आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १ मार्चला  संपूर्ण देशात भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी जनकल्याण, लोकसेवा व आदर्श नागरिक घडावा या उद्देशाने श्रीमतदासबोधा सारख्या महान ग्रंथाच्या निरूपणाच्या माध्यमातून समाजसुधारणेचा वृक्ष ९३ वर्षापुर्वी लावला त्याचे वटवृक्ष झाल्याचे आपण पाहत आहोत.बैठकिच्या माध्यमातून संपूर्ण राज्य, देश,व परदेशात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य अविरतपणे आजही सुरु आहे.निरूपणाच्या माध्यमातून मानवाच्या भौतिक स्वच्छते बरोबरच अंतर्मनातील स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.यामुळे देश विदेशातही कार्याचा गौरव होत आहे.प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान,रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन यासारख्या अनेक समाजपयोगी कार्यातून कार्याचा ठसा उमटविला आहे.बैठकीच्या माध्यमातून निरूपणाद्वारे  मानसिक स्थिती हरवलेल्या माणसाला सुस्थित आणण्याचे महत्वपूर्ण काम होत आहे. मुरबाड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात म्हसा, धसई, टोकावडे, सरळगाव, किन्हवली या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्या पासून श्रीसदस्यांनी स्वच्छतेला सुरवात केली.मुरबाड शहरातील सार्वजनिक ठिकाणे  ग्रामीण रूग्णालय मुरबाड, पंचायत समिती कार्यालय, मुरबाड पोलीस स्टेशन,तहसिलदार कार्यालय,शास्त्रीनगर तलाव, कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेत शहरातील मुख्य रस्त्यांची साप सफाई यावेळी करण्यात आली. या अभियानात १९५५ श्रीसदस्यांनी  सहभाग घेऊन एकुण ११ टन ओला कचरा व ३६ टन सुका कचरा जमा केला. हा जमा केलेला कचरा ट्रक्टर, टेंम्पोच्या व घंटागाडीच्या साह्याने शहरा बाहेर टाकण्यात आला. यावेळी श्रीसदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने मास्क,हॅन्डग्लोज, पाणी,चहा बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती.

प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील चर्चेत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे १६ तारखेला कार्यरत डॉ. उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे.…

 स्विफ्ट कारमधून अवैध मद्याची तस्करी

स्विफ्ट कारमधून अवैध मद्याची तस्करी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नऊ लाखांचा ऐवज जप्त योगेश चांदेकर पालघरः दादरा नगर हवेली व दीव दमण परिसरात विक्रीसाठी असलेले स्वस्त दरातील मद्य महाराष्ट्रात आणून ते विकण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील पथकाने तसेच पालघरच्या भरारी पथकाने उघडकीस आणून मारुती स्विफ्ट कारसह आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला. पालघर हा दादरा नगर हवेली व दीव दमणला लागून असलेला जिल्हा आहे. या दोन केंद्रशासित प्रदेशात मद्यावर सीमाशुल्क अतिशय कमी असते. त्यामुळे हे मद्य स्वस्त पडते. सीमाशुल्क चुकवून असे मद्य महाराष्ट्रात आणून त्याची विक्री केली जात असते. यापूर्वी महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील वाहनांचा वापर अवैध मद्य आणण्यासाठी केला जात असे. आता गुजरातमधील वाहनांचा वापर सुरू करण्यात आला असल्याचे नव्या कारवाईतून उघड झाले आहे. तलासरी तालुक्यात कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, अभिजीत मानकर आदींचे भरारी पथक तलासरी तालुक्यात गस्त घालत असताना त्यांनी गुजरात राज्यातील मारुती स्विफ्ट कार (क्रमांक जीजे १५ पीपी ९६१५) ही थांबून तिची तपासणी केली, तेव्हा त्यात मद्याची तस्करी होत असल्याचे आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्याचे अठरा बॉक्स जप्त केले. हे मद्य दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी होते; परंतु कर चुकवून तस्करीच्या मार्गाने ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कारसह अवैध मद्याचे बॉक्स असा मिळून आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ‘यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे आयुक्त प्रदीप पवार, पालघरचे उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांना संदीप अहिरे, सत्यवान चोरघे, अमोल नलावडे, दीपक शेवाळे, प्रदीप गांगुर्डे, शशिकांत पाटील आदींनी मदत केली.

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.…

  पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन

पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणातील आरोपी प्रमोद मौळे यास कल्याण सत्र न्यायालय येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला.…

मराठी व्यावसायिकांनो गुजरात काबीज करा

 पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ०  ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्‌घाटन योगेश चांदेकर पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर…

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी राजीव चंदने मुरबाड :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या रोमहर्षित वातावरणात विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मुरबाडचा भूमिपुत्र शिवळे आंबेळे गावचा जलसाकार निखिल वाघचौडे हे उपस्थित होते त्यांच्या  दोनच राजे इथे गाजले या गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले गेले. शिवजयंती निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गितगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी सुरेख असे इशस्तवन व स्वागत गीत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनीनी सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ प्रा.आर. ए. सुरवसे यांनी स्वीकारले तर सुरेख असे सूत्रसंचालन इयत्ता-८ वी च्या विद्यार्थिनीं सोनल शिंगोळे, हेमलता शिंगोळे, नेहा पष्टे, अनन्या पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता देवयानी शिंगोळे हिने आभार मानून केले.

 २० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ;

२० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; पालघरमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचा आंदोलनाचा इशारा योगेश चांदेकर जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने ‘आऊटसोर्सिंग’ (बाह्य स्त्रोत) धोरण राबवत ६० महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अल्प मानधनावर केली २० वर्षे सेवा बाधित महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांनी सुरुवातीला केवळ ३० ते ४० रुपये प्रतिदिन इतक्या अत्यल्प मजुरीवर काम सुरू केले होते. आज २० वर्षांनंतर त्यांना ६०० रुपये वेतन मिळत असताना, प्रशासनाने अचानक एकत्रित ठेक्याचे धोरण अवलंबले. यामुळे या स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताचे काम हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची घेतली भेट या गंभीर अन्यायाविरोधात सर्व महिलांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची भेट घेऊन या महिलांची कैफियत मांडली. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख व जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, विजय राऊत, स्वप्नील जाधव आणि सर्व कामगार महिला होत्या. भूमिपुत्र एल्गार संघटनेची भूमिका संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. “स्थानिक महिलांनी आपले आयुष्य या आश्रमशाळांच्या सेवेसाठी वेचले, त्यांना न्याय देण्याऐवजी शासन बाह्य संस्थांना ठेका देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावत आहे. हा भूमिपुत्रांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 राज्य माहिती आयोगाचा जनसेवा शिक्षण संस्थेला दणका

राज्य माहिती आयोगाचा जनसेवा शिक्षण संस्थेला दणका खुलासा करा अन्यथा दंड भरा राजीव चंदने मुरबाड : संस्थेची माहिती टाळण्यासाठी माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी पदावर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणुक न करता…

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास…