Category: पालघर

palghar news

मुरबाड तहसील कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचा बिऱ्हाड मोर्चा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू वाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे तेथील शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुचंबना होत आहे, देश स्वातंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले  परंतु या कातकरी आदिवासी, वाडीला रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यानां तोंड दयावे लागत आहे, मुरबाड तहसीलदार यांच्या कडे अनेकदा रस्ता आणि स्मशाना संदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी मुरबाड तहसील कार्यलयावर बिऱ्हाड मोर्चा काढत सोबत जनावरे, अन्न धान्य, कपडे  घेऊन तहसील कार्यलयाच्या पटांगणात आपले संसार मांडून प्रशासनाच्या कामचुकारपणा बाबत खंत व्यक्त केली, या बिऱ्हाड मोर्चेला ठाणे जिल्हा परिषदचे मा. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता, आपण केलेली मागणी रास्त असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या येत्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करेन,आणि आपण मोर्चेला पूर्णविराम दयावा. अशी ग्रामस्थांना विनंती केली, बिऱ्हाड मोर्चेला अनेक राजकीयपक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखीपत्र देत सात दिवसाची मुदत मागण्यात आली व मोर्चा थांबविण्यासाठी विनंती केली याबिऱ्हाड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे, शहापूर तालुका सचिव मन्सूर शेख, ता. अध्यक्ष मारुती वाघ, चिंतामण भांगरथ आमआदमी पार्टीचे शरद पवार, जिजाबाई दंवड, लक्ष्मण खंडवी, प्रसाद वाघमारे, भीमा वाघ, व ई. कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.

पत्रकाराच्या मुलीने फडकाविला भुवन शाळेचा तिरंगा

राजीव चंदने   मुरबाड : भारतिय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन देशभर जल्लोषात साजरा होत असताना, मुरबाड शहरासह तालुक्यातही धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये इयत्ता 10 वी ,…

डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ भुईसपाट करण्यास न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील राधाई बेकायदा इमारत भुईसपाट करण्यास कल्याण डोंबिवली पालिकेला काही तांत्रिक अडथळे येत असल्याने ही इमारत भुईसपाट करण्यास दोन आठवड्याची मुदत वाढवून देण्यास मुंबई…

माधवी घाग पाठांतर श्लोक स्पर्धेत अव्वल

डोंबिवली : गोविंदानंद सरस्वती न्यास (हर्डी -राजापूर, रत्नागिरी ) संचालित श्रीमदभगवदगीता पठण समिती डोंबिवली (विश्वस्त -विश्वास वामन नवरे ) या न्यासातर्फे घेण्यात आलेल्या श्रीमदभगवदगीतेच्या 18 व्या अध्यायातील श्लोक पाठांतर स्पर्धेत…

मुरबाडच्या महामार्ग वाहतूक समस्येत वाढ सरळगावमार्गे सुध्दा करावा लागतो खड्ड्यांतून प्रवास

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड ते कल्याणच्या खड्डेमय तीस किलोमीटर प्रवासाला बेजार झालेल्या प्रवासी वर्गाच्या तक्रारी संपत नसतांना आता मुरबाड ते माळशेज घाट दरम्यानच्या महामार्गावरील वाढत्या खड्डयांना देखील तोंड द्यावे…

दिनदयाळ चौकातील रेल्वे आरक्षण केंद्राचे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर स्थलांतर

डोंबिवली: डोंबिवली पूर्व फलाट क्रमांक एकवरील दिनदयाळ चौक भागातील रेल्वे आरक्षण केंद्र आणि रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी सुविधा फलाट क्रमांक एकवरच कल्याण बाजुला सुरू करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यापासून…

डोंबिवलीकर भगिनी बांधणार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना राखी

एक राखी जवानांसाठी माजी नगरसेवक मंदार हळबे यांचा अनोखा उपक्रम डोंबिवलीकर भगिनींनी जवानांसाठी बनवल्या हजारो राख्या   डोंबिवली : भारतीय सैनिक देशांच्या सीमांचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा…

उल्हासनगर रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

आयुक्तांकडून पाहणी     उल्हासनगर : बृहमुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोमवारी नेताजी चौकातील खड्डे भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी खड्डे भरण्याची पाहणी केली. उल्हासनगरातील रस्त्याची अवस्था दैयनिय झाली असून वाहन चालकासह नागरिक हैराण झाले. वाहन चालक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई, ठाणे शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली. हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरलेतर, हे तंत्रज्ञान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं वापरणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली. याच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुल, चालीया चौक, श्रीराम चौक, धोबीघाट रस्ता व शहाड रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिली.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान

डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नुतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी ३० किलो ९०० ग्रॅम वजनाची चांदीची…

 डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीतील रहिवाशांना

३० सप्टेंबरपर्यंत दिलासा     डोंबिवली : पावसाळा सुरू असल्याने घरे खाली करून अन्यत्र जाणे शक्य होणार नसल्याने डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारतीमधील रहिवाशांनी ३० सप्टेंबरपर्यंत इमारतीवर…